शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

'खाणप्रश्‍नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 16:25 IST

बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले

पणजी - राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरु करण्यासाठी भाजपकडे कोणताही तोडगा नाही. २०१२ मध्ये पर्रीकर मुख्यमंत्री असताना भाजपनेच खाणी बंद केल्या. हा पक्ष यावर मुळीच तोडगा काढू शकणार नाही, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसने केला आहे. पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. यतिश नायक यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढाच वाचला. 

ते म्हणाले की, बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले. जीएसटी, नोटाबंदीने खाजगी उद्योगही मारून टाकले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती  त्याची पुनरावृत्ती आता केली जात आहे. २०१४ मध्येही खाणी सुरू करू, असे आश्‍वासन भाजपने दिले होते. परंतु आज २०१९ उजाडला तरी हे आश्वासन भाजप पूर्ण करू शकला नाही. पुन्हा पुन्हा फसवून घ्यायला गोव्याचा मतदार मूर्ख नव्हे, असे नायक म्हणाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की 'खाण प्रश्न सोडवणार असे आश्वासन देणाऱ्या भाजपने हा प्रश्न नेमका कसा सोडवणार? त्यांच्याकडे काय तोडगा आहे? हे स्पष्ट केलेले नाही. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कोणतेही ठोस धोरण आणि स्पष्टता भाजपकडे नाही. आज लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार खाण पट्ट्यातील मतदारसंघांमध्ये फिरतात तेव्हा त्यांना अवलंबित याचा जाब विचारतात, परंतु भाजपच्या या उमेदवारांकडे उत्तर नसते. मध्यंतरी अवलंबितांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रश्नावर केवळ 'देखता हूँ', असे म्हणून बोळवण केली.

केंद्रीय आयुषमंत्री तथा भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत खाण प्रश्‍नावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवाल नायक यांनी केला. भाजप जनतेकडे खोटारडेपणा करत आहे. लोकांची फसवणूक करत आहे, असे आरोप त्यांनी केले. देशभरात जीएसटी, नोटाबंदी आणून भाजपने खाजगी क्षेत्रही मारून टाकले. यामुळे बेकारी प्रचंड वाढलेली आहे आणि त्याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप नायक यांनी केला. ते म्हणाले की, 'अच्छे दिन आयेंगे', असे २०१४ च्या निवडणुकीत भाजप म्हणत होता. आता अच्छे दिन आलेही म्हणत नाही आणि अच्छे दिन येतील असे म्हणत नाही. आता त्यांनी 'चौकीदारा'चा जयघोष चालवला आहे, अशी टीका करत लोक त्यांना स्वीकारणार नाहीत, गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या तिन्ही जागा काँग्रेस उमेदवारच जिंकतील, असा दावा नायक यांनी केला. केंद्रात आणि कालांतराने राज्यातही काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय पै, साळगांव गटाध्यक्ष अतुल नाईक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकर