शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

'खाणप्रश्‍नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 16:25 IST

बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले

पणजी - राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरु करण्यासाठी भाजपकडे कोणताही तोडगा नाही. २०१२ मध्ये पर्रीकर मुख्यमंत्री असताना भाजपनेच खाणी बंद केल्या. हा पक्ष यावर मुळीच तोडगा काढू शकणार नाही, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसने केला आहे. पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. यतिश नायक यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढाच वाचला. 

ते म्हणाले की, बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले. जीएसटी, नोटाबंदीने खाजगी उद्योगही मारून टाकले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती  त्याची पुनरावृत्ती आता केली जात आहे. २०१४ मध्येही खाणी सुरू करू, असे आश्‍वासन भाजपने दिले होते. परंतु आज २०१९ उजाडला तरी हे आश्वासन भाजप पूर्ण करू शकला नाही. पुन्हा पुन्हा फसवून घ्यायला गोव्याचा मतदार मूर्ख नव्हे, असे नायक म्हणाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की 'खाण प्रश्न सोडवणार असे आश्वासन देणाऱ्या भाजपने हा प्रश्न नेमका कसा सोडवणार? त्यांच्याकडे काय तोडगा आहे? हे स्पष्ट केलेले नाही. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कोणतेही ठोस धोरण आणि स्पष्टता भाजपकडे नाही. आज लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार खाण पट्ट्यातील मतदारसंघांमध्ये फिरतात तेव्हा त्यांना अवलंबित याचा जाब विचारतात, परंतु भाजपच्या या उमेदवारांकडे उत्तर नसते. मध्यंतरी अवलंबितांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रश्नावर केवळ 'देखता हूँ', असे म्हणून बोळवण केली.

केंद्रीय आयुषमंत्री तथा भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत खाण प्रश्‍नावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवाल नायक यांनी केला. भाजप जनतेकडे खोटारडेपणा करत आहे. लोकांची फसवणूक करत आहे, असे आरोप त्यांनी केले. देशभरात जीएसटी, नोटाबंदी आणून भाजपने खाजगी क्षेत्रही मारून टाकले. यामुळे बेकारी प्रचंड वाढलेली आहे आणि त्याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप नायक यांनी केला. ते म्हणाले की, 'अच्छे दिन आयेंगे', असे २०१४ च्या निवडणुकीत भाजप म्हणत होता. आता अच्छे दिन आलेही म्हणत नाही आणि अच्छे दिन येतील असे म्हणत नाही. आता त्यांनी 'चौकीदारा'चा जयघोष चालवला आहे, अशी टीका करत लोक त्यांना स्वीकारणार नाहीत, गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या तिन्ही जागा काँग्रेस उमेदवारच जिंकतील, असा दावा नायक यांनी केला. केंद्रात आणि कालांतराने राज्यातही काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय पै, साळगांव गटाध्यक्ष अतुल नाईक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकर