शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2024 09:19 IST

कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'मी पणजी कदापि सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत', असे म्हणत स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यानी अप्रत्यक्षपणे उत्पल पर्रीकर यांना टोला लगावला आहे.

ताळगाव पंचायत निवडणुकीतील भरघोस यशानंतर बाबूश यांचा उत्साह आणखी व्दिगुणीत झालेला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, 'ताळगाव माझ्याकडे आहेच. मी पणजीदेखील कदापि सोडणार नाही. काहीजण पणजीवर राज्य करण्याची स्वप्ने पाहत आहेत. मी असेपर्यंत त्यांना ते कधीच शक्य होणार नाही.'

या लोकांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मला सामोरे जावे, असे आव्हान आणखी एकदा काल बाबूश यांनी दिले. '२०२७ च्या निवडणुकीत भाजपने पणजीत अन्य कोणाला तिकीट दिले तर तुम्ही काय करणार?' असा प्रश्न केला असता बाबूश म्हणाले की, 'ज्याच्याकडे जिंकण्याची ताकद आहे, त्यालाच पक्ष उमेदवारी देतो. त्यामुळे या गोष्टीची मी पर्वा करत नाही. भाजपमध्ये गेल्यापासून मी निष्ठेने या पक्षाचे काम करीत आहे. कधीही विरोधात काम केलेले नाही. त्यामुळे पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही याची खात्री मला आहे.'

ताळगांवमध्ये मार्केट इमारत बांधून देण्यासाठी माझे प्राधान्य राहील. त्यासाठी भूसंपादन झालेले असून, मुख्यमंत्र्यांना भेटून जीएस- आयडीसीकडून या कामाला चालना दिली जाईल, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले. दुसरीकडे, पणजीला लागलेली साडेसाती पुढील निवडणुकीत आम्हाला दूर करावी लागेल. त्याला अद्याप उशीर आहे, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली आहे.

एक तरी शेतजमीन रूपांतरित केल्याचे दाखवा : बाबूश

एका प्रश्नावर बाबूश म्हणाले की, 'लोक जमिनी विकताहेत, त्यांना आम्ही अडवू शकत नाही. जे विरोधक माझ्यावर आरोप करतात, त्यांनी माझ्या नावे एक तरी शेतजमीन असल्यास दाखवावी किंवा मी शेतजमीन रूपांतरित केली असल्यास सिद्ध करावे. लोक जर शेतजमिनी विकत असतील तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. ताळगावची ९९ टक्के कृषी जमीन कोमुनिदादीच्या मालकीची आहे.

स्वतःला बलाढ्य म्हणवणाऱ्याने आताच नांगी टाकली : उत्पल

बाबूश मोन्सेरात यांनी लगावलेल्या टोल्यास प्रत्युत्तर देताना उत्पल पर्रीकर म्हणाले की, मुख्य म्हणजे ही निवडणूक पणजीची नव्हती, तर ताळगाव पंचायतीची होती. पणजीला लागलेली साडेसाती आम्ही भोगतोय. ही साडेसाती आम्हालाच दूर करावी लागणार आहे, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे. स्वतःला बलाढ्य म्हणवणाऱ्याने आताच नांगी टाकली, फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची तिकीट किवा चिन्ह मिळाले नसते तर या माणसाची काय गत झाली असती, हे सर्वांनाच त्यावेळी निकालावरून कळले.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणUtpal Parrikarउत्पल पर्रिकर