शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2024 09:19 IST

कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'मी पणजी कदापि सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत', असे म्हणत स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यानी अप्रत्यक्षपणे उत्पल पर्रीकर यांना टोला लगावला आहे.

ताळगाव पंचायत निवडणुकीतील भरघोस यशानंतर बाबूश यांचा उत्साह आणखी व्दिगुणीत झालेला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, 'ताळगाव माझ्याकडे आहेच. मी पणजीदेखील कदापि सोडणार नाही. काहीजण पणजीवर राज्य करण्याची स्वप्ने पाहत आहेत. मी असेपर्यंत त्यांना ते कधीच शक्य होणार नाही.'

या लोकांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मला सामोरे जावे, असे आव्हान आणखी एकदा काल बाबूश यांनी दिले. '२०२७ च्या निवडणुकीत भाजपने पणजीत अन्य कोणाला तिकीट दिले तर तुम्ही काय करणार?' असा प्रश्न केला असता बाबूश म्हणाले की, 'ज्याच्याकडे जिंकण्याची ताकद आहे, त्यालाच पक्ष उमेदवारी देतो. त्यामुळे या गोष्टीची मी पर्वा करत नाही. भाजपमध्ये गेल्यापासून मी निष्ठेने या पक्षाचे काम करीत आहे. कधीही विरोधात काम केलेले नाही. त्यामुळे पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही याची खात्री मला आहे.'

ताळगांवमध्ये मार्केट इमारत बांधून देण्यासाठी माझे प्राधान्य राहील. त्यासाठी भूसंपादन झालेले असून, मुख्यमंत्र्यांना भेटून जीएस- आयडीसीकडून या कामाला चालना दिली जाईल, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले. दुसरीकडे, पणजीला लागलेली साडेसाती पुढील निवडणुकीत आम्हाला दूर करावी लागेल. त्याला अद्याप उशीर आहे, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली आहे.

एक तरी शेतजमीन रूपांतरित केल्याचे दाखवा : बाबूश

एका प्रश्नावर बाबूश म्हणाले की, 'लोक जमिनी विकताहेत, त्यांना आम्ही अडवू शकत नाही. जे विरोधक माझ्यावर आरोप करतात, त्यांनी माझ्या नावे एक तरी शेतजमीन असल्यास दाखवावी किंवा मी शेतजमीन रूपांतरित केली असल्यास सिद्ध करावे. लोक जर शेतजमिनी विकत असतील तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. ताळगावची ९९ टक्के कृषी जमीन कोमुनिदादीच्या मालकीची आहे.

स्वतःला बलाढ्य म्हणवणाऱ्याने आताच नांगी टाकली : उत्पल

बाबूश मोन्सेरात यांनी लगावलेल्या टोल्यास प्रत्युत्तर देताना उत्पल पर्रीकर म्हणाले की, मुख्य म्हणजे ही निवडणूक पणजीची नव्हती, तर ताळगाव पंचायतीची होती. पणजीला लागलेली साडेसाती आम्ही भोगतोय. ही साडेसाती आम्हालाच दूर करावी लागणार आहे, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे. स्वतःला बलाढ्य म्हणवणाऱ्याने आताच नांगी टाकली, फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची तिकीट किवा चिन्ह मिळाले नसते तर या माणसाची काय गत झाली असती, हे सर्वांनाच त्यावेळी निकालावरून कळले.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणUtpal Parrikarउत्पल पर्रिकर