शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2024 09:19 IST

कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'मी पणजी कदापि सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत', असे म्हणत स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यानी अप्रत्यक्षपणे उत्पल पर्रीकर यांना टोला लगावला आहे.

ताळगाव पंचायत निवडणुकीतील भरघोस यशानंतर बाबूश यांचा उत्साह आणखी व्दिगुणीत झालेला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, 'ताळगाव माझ्याकडे आहेच. मी पणजीदेखील कदापि सोडणार नाही. काहीजण पणजीवर राज्य करण्याची स्वप्ने पाहत आहेत. मी असेपर्यंत त्यांना ते कधीच शक्य होणार नाही.'

या लोकांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मला सामोरे जावे, असे आव्हान आणखी एकदा काल बाबूश यांनी दिले. '२०२७ च्या निवडणुकीत भाजपने पणजीत अन्य कोणाला तिकीट दिले तर तुम्ही काय करणार?' असा प्रश्न केला असता बाबूश म्हणाले की, 'ज्याच्याकडे जिंकण्याची ताकद आहे, त्यालाच पक्ष उमेदवारी देतो. त्यामुळे या गोष्टीची मी पर्वा करत नाही. भाजपमध्ये गेल्यापासून मी निष्ठेने या पक्षाचे काम करीत आहे. कधीही विरोधात काम केलेले नाही. त्यामुळे पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही याची खात्री मला आहे.'

ताळगांवमध्ये मार्केट इमारत बांधून देण्यासाठी माझे प्राधान्य राहील. त्यासाठी भूसंपादन झालेले असून, मुख्यमंत्र्यांना भेटून जीएस- आयडीसीकडून या कामाला चालना दिली जाईल, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले. दुसरीकडे, पणजीला लागलेली साडेसाती पुढील निवडणुकीत आम्हाला दूर करावी लागेल. त्याला अद्याप उशीर आहे, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली आहे.

एक तरी शेतजमीन रूपांतरित केल्याचे दाखवा : बाबूश

एका प्रश्नावर बाबूश म्हणाले की, 'लोक जमिनी विकताहेत, त्यांना आम्ही अडवू शकत नाही. जे विरोधक माझ्यावर आरोप करतात, त्यांनी माझ्या नावे एक तरी शेतजमीन असल्यास दाखवावी किंवा मी शेतजमीन रूपांतरित केली असल्यास सिद्ध करावे. लोक जर शेतजमिनी विकत असतील तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. ताळगावची ९९ टक्के कृषी जमीन कोमुनिदादीच्या मालकीची आहे.

स्वतःला बलाढ्य म्हणवणाऱ्याने आताच नांगी टाकली : उत्पल

बाबूश मोन्सेरात यांनी लगावलेल्या टोल्यास प्रत्युत्तर देताना उत्पल पर्रीकर म्हणाले की, मुख्य म्हणजे ही निवडणूक पणजीची नव्हती, तर ताळगाव पंचायतीची होती. पणजीला लागलेली साडेसाती आम्ही भोगतोय. ही साडेसाती आम्हालाच दूर करावी लागणार आहे, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे. स्वतःला बलाढ्य म्हणवणाऱ्याने आताच नांगी टाकली, फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची तिकीट किवा चिन्ह मिळाले नसते तर या माणसाची काय गत झाली असती, हे सर्वांनाच त्यावेळी निकालावरून कळले.'

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणUtpal Parrikarउत्पल पर्रिकर