शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बाबुश यांच्या प्रचारासाठी पणजीत काँग्रेस नेत्यांचा डेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 14:34 IST

बाबुश मोन्सेरात यांच्या प्रचारासाठी काँग्रेसी नेत्यांनी पणजीत डेरा टाकला आहे. पक्षाचे विधिमंडळ नेते बाबू कवळेकर तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घरोघर गाठीभेटी सुरू केल्या आहेत. 

ठळक मुद्देविधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवार अनिष बकाल यांनी माघार घेतली. बाबुश मोन्सेरात यांच्या प्रचारासाठी काँग्रेसी नेत्यांनी पणजीत डेरा टाकला आहे. पक्षाचे विधिमंडळ नेते बाबू कवळेकर तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घरोघर गाठीभेटी सुरू केल्या आहेत. 

पणजी - विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवार अनिष बकाल यांनी माघार घेतली. यामुळे आता ६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. राजधानीतील प्रचारानेही वेग घेतला आहे. बाबुश मोन्सेरात यांच्या प्रचारासाठी काँग्रेसी नेत्यांनी पणजीत डेरा टाकला आहे. पक्षाचे विधिमंडळ नेते बाबू कवळेकर तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घरोघर गाठीभेटी सुरू केल्या आहेत. 

गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत होती. अपक्ष उमेदवार अनिष बकाल यानी अर्ज मागे घेतल्याने आता काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात, भाजपाचे सिध्दार्थ कुंकळ्येंकर, गोसुमंचे सुभाष वेलिंगकर, आपचे वाल्मिकी नायक तसेच दोन अपक्ष दिलीप घाडी आणि विजय मोरे मिळून ६ जण रिंगणात राहिले आहेत. 

भाजपचे उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पणजीतील मतदारांशी संवाद साधला. काँग्रेसी उमेदवार बाबुश मोन्सेरात यांच्यासाठी गिरीश चोडणकर व बाबू कवळेकर यांनी मळा येथून घरोघरी भेटीगाठी सुरू केल्या. यावेळी गिरीश म्हणाले की, ‘बाबुश हे स्वत: फिरत आहेतच शिवाय काँग्रेसी आमदार, पदाधिकारीही आजपासून त्यांच्या प्रचारासाठी घरोघर फिरतील. मळ्यातील अनेक कामे रखडलेली आहे. गेल्या २५ वर्षात येथील कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. मळा तलावाचे सौंदर्यीकरण, मार्केट प्रकल्प रखडला आहे. हे एक डास पैदास केंद्र बनले आहे.’

बांदोडकर समाधीस्थळी टाळे ; वेलिंगकरांनी गेटवर चढून मिळवला प्रवेश 

दरम्यान, गोसुमंचे उमेदवार सुभाष वेलिंगकर हे मिरामार येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर गेले तेव्हा तेथे त्यांना फाटकाला टाळे ठोकलेले आढळले. वेलिंगकर यांनाह गेटवर चढून आत प्रवेश करावा लागला. भाऊसाहेबांच्या समाधीला वंदन करुन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. वेलिंगकर म्हणाले की, ‘सरकारने गोव्याच्या या भाग्यविधात्याला बंदिस्त करुन नजरकैदेत ठेवले आहे, ते योग्य नव्हे. समाधी लोकांसाठी दर्शनाकरिता खुली असली पाहिजे. सकाळी ठराविक वेळेत ती उघडी ठेवावी. तेथे हवे तर सुरक्षा रक्षक नेमावेत. भाऊसाहेबांनी गोमंतकीयांना मोकळा श्वास घेऊ दिला तसा सरकारने भाऊसाहेबांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. आपली राजकारणे चालू ठेवण्यासाठी असले प्रकार करू नयेत.’

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण