शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

विरोधकांचा प्रश्नांचा मारा आणि मुख्यमंत्र्यांनी सावरले मंत्र्यांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:51 IST

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना या अधिवेशनात खऱ्या अर्थाने कॅप्टनची भूमिका पार पाडताना वेळोवेळी हस्तक्षेप करून मंत्र्यांना सावरावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध मर्मभेदी प्रश्नांचा भडिमार करून सरकारची कोंडी करण्यात विरोधक अजिबात कमी पडले नाहीत. दुसरीकडे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना या अधिवेशनात खऱ्या अर्थाने कॅप्टनची भूमिका पार पाडताना वेळोवेळी हस्तक्षेप करून मंत्र्यांना सावरावे लागले.

स्व. भाजप सरकारच्या काळात, २०१२ नंतर लोकांनी एक कालखंड असा पाहिला आहे, जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक नवख्या सर्व मंत्र्यांना विरोधक एक एक करून लक्ष्य करायचे आणि त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र, मुख्यमंत्री पर्रीकर वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती निभावून न्यायचे. याचा परिणाम असाही व्हायचा की मुख्यमंत्री सांभाळतील म्हणून काही काही मंत्री गृहपाठ करण्याविषयी गंभीरही नसायचे. ही गोष्ट जेव्हा पर्रीकर यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी प्रत्येक मंत्र्याचा सर्ववेळी कैवार घेणे सोडून दिले होते. यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत हे बहुतेकवेळा मंत्र्यांनाच उत्तर देण्यास भाग पाडायचे. मात्र, यावेळी त्यांनी पवित्रा बदलला.

एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्वच मंत्र्यांच्या ते मदतीला धावले आणि परिस्थिती सांभाळून नेली, मग ते कृषिमंत्री रवी नाईक असोत, महसूलमंत्री बाबूस मोन्सेरात किंवा मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर. नगर नियोजन खात्याशी संबंधीत प्रश्नांवर विरेश बोरकर यांनी नेवरा येथील लोकांचा मुद्द उपस्थित केला, तेव्हाही मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून बोरकर यांना शांत करावे लागले.

नेहमी जोशपूर्ण कामगिरी बजावणारे आरजीचे आमदार विरेश बोरकर यांचे एक नवीन रुप सभागृहाने अनुभवले. अत्यंत अभ्यासपूर्ण कामगिरी बजावताना त्यांनी विविध सामाजिक विषयांवर सत्ताधाऱ्यांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. नवखा आमदार असूनही एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करा करावा, त्याचे ते अत्यंत बोलके उदाहरण ठरावे. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आपला प्रभाव दाखवल्याचे म्हटले जाते.

विरोधकांची दमदार कामगिरी

विरोधी आमदार संख्येने कमी असले तरी त्यांनी आपले प्रश्न लावून धरले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुने गोवेतील वादग्रस्त बांधकामाच्या मुद्द्यावरून कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. तो मुद्दा जुनाच असला तरी यावरून आपण एकजूट दाखवू शकतो हे विरोधकांनी दाखवून दिले. विरोधकांच्या वैयक्तिक कामगिरीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई यांनी नेहमीप्रमाणे सरकारची मर्मस्थळे शोधून वार करण्याची शैली कायम ठेवली. सत्ताधारी आमदारांच्या खांद्यावरून सरकारवर तीर मारण्याचे कसब दाखवताना सरदेसाईंनी कधी गोविंद गावडे यांचे मंत्रिपद जाण्याचा वापर केला तर कधी नीलेश काब्राल यांच्या. एल्टन डिकॉस्ता, वेंझी हेसुद्धा कमी पडले नाहीत.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण