शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

विरोधकांचा प्रश्नांचा मारा आणि मुख्यमंत्र्यांनी सावरले मंत्र्यांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:51 IST

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना या अधिवेशनात खऱ्या अर्थाने कॅप्टनची भूमिका पार पाडताना वेळोवेळी हस्तक्षेप करून मंत्र्यांना सावरावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध मर्मभेदी प्रश्नांचा भडिमार करून सरकारची कोंडी करण्यात विरोधक अजिबात कमी पडले नाहीत. दुसरीकडे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना या अधिवेशनात खऱ्या अर्थाने कॅप्टनची भूमिका पार पाडताना वेळोवेळी हस्तक्षेप करून मंत्र्यांना सावरावे लागले.

स्व. भाजप सरकारच्या काळात, २०१२ नंतर लोकांनी एक कालखंड असा पाहिला आहे, जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक नवख्या सर्व मंत्र्यांना विरोधक एक एक करून लक्ष्य करायचे आणि त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र, मुख्यमंत्री पर्रीकर वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती निभावून न्यायचे. याचा परिणाम असाही व्हायचा की मुख्यमंत्री सांभाळतील म्हणून काही काही मंत्री गृहपाठ करण्याविषयी गंभीरही नसायचे. ही गोष्ट जेव्हा पर्रीकर यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी प्रत्येक मंत्र्याचा सर्ववेळी कैवार घेणे सोडून दिले होते. यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत हे बहुतेकवेळा मंत्र्यांनाच उत्तर देण्यास भाग पाडायचे. मात्र, यावेळी त्यांनी पवित्रा बदलला.

एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्वच मंत्र्यांच्या ते मदतीला धावले आणि परिस्थिती सांभाळून नेली, मग ते कृषिमंत्री रवी नाईक असोत, महसूलमंत्री बाबूस मोन्सेरात किंवा मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर. नगर नियोजन खात्याशी संबंधीत प्रश्नांवर विरेश बोरकर यांनी नेवरा येथील लोकांचा मुद्द उपस्थित केला, तेव्हाही मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून बोरकर यांना शांत करावे लागले.

नेहमी जोशपूर्ण कामगिरी बजावणारे आरजीचे आमदार विरेश बोरकर यांचे एक नवीन रुप सभागृहाने अनुभवले. अत्यंत अभ्यासपूर्ण कामगिरी बजावताना त्यांनी विविध सामाजिक विषयांवर सत्ताधाऱ्यांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. नवखा आमदार असूनही एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करा करावा, त्याचे ते अत्यंत बोलके उदाहरण ठरावे. एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आपला प्रभाव दाखवल्याचे म्हटले जाते.

विरोधकांची दमदार कामगिरी

विरोधी आमदार संख्येने कमी असले तरी त्यांनी आपले प्रश्न लावून धरले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुने गोवेतील वादग्रस्त बांधकामाच्या मुद्द्यावरून कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. तो मुद्दा जुनाच असला तरी यावरून आपण एकजूट दाखवू शकतो हे विरोधकांनी दाखवून दिले. विरोधकांच्या वैयक्तिक कामगिरीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई यांनी नेहमीप्रमाणे सरकारची मर्मस्थळे शोधून वार करण्याची शैली कायम ठेवली. सत्ताधारी आमदारांच्या खांद्यावरून सरकारवर तीर मारण्याचे कसब दाखवताना सरदेसाईंनी कधी गोविंद गावडे यांचे मंत्रिपद जाण्याचा वापर केला तर कधी नीलेश काब्राल यांच्या. एल्टन डिकॉस्ता, वेंझी हेसुद्धा कमी पडले नाहीत.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण