शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

ऑनलाईन शिक्षण सक्तीचे नाही; प्रमोद सावंत यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:43 IST

ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत.

पणजी: शिक्षण खात्याने राज्यात कुठेच ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केलेली नाही. ऑनलाईन शिक्षणाविषयी समस्या येतात याची कल्पना सरकारला आहे. मात्र मोबाईल टॉवरला गावांमध्ये विरोध करणारे काही लोक देखील या स्थितीला कारणीभूत आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.

आझाद मैदानावर गोवा क्रांती दिन सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत. मात्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांविषयी सरकारला जास्त चिंता आहे. आम्ही त्यावर उपाय काढू. नियमित विद्यालये किंवा वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरकारने अजून घेतलेला नाही. त्याविषयी यापुढे निर्णय होईल. सध्या नेटवर्कची समस्या गावांमध्ये वगैरे येते, कारण मोबाईल टॉवर उभे राहत होते तेव्हा त्या टॉवरना लोक विरोध करत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा राज्याच्या सीमा सील करा अशी मागणी विरोधक करत असल्याविषयी पत्रकारांनी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, की सीमा सिल करा असे सांगणो सोपे असते. गोमंतकीयांनाच दुसऱ्या ठिकाणहून गोव्यात यायचे असते. सिल केल्या तर तेही गोव्यात येऊ शकणार नाहीत. जेव्हा सीमा सिल होत्या तेव्हा भाजी व जीवनावश्यक वस्तू येत नाहीत म्हणून जे विरोध करत होते तेच आता सीमा सिल करा अशी मागणी करतात.

सरकारने खर्चात कपात सुरू करावी अशी मागणी जे करत होते, तेच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृह कर्ज योजना बंद केली म्हणून टीका करतात. खर्च कपातीसाठीच्या उपाययोजनांचाच तो एक भाग आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अनेक खासगी उद्योगांनी कर्मचाऱ्यांचे पगार कापले, त्यांना कामावरून कमी केले हे सर्वानी लक्षात ठेवावे. गोव्याच्या सीमेवर पोलिस व आरोग्य कर्मचारी हे दोन्ही घटक चोवीस तास असतात. सीमेवर पहारा आहे. कोरोनाची लक्षणो दाखविणाऱ्यांची चाचणी होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा स्वयंपूर्ण करूया: मुख्यमंत्री

दरम्यान, गोवा क्रांतीदिनाच्यानिमित्ताने आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाराला राज्यपाल सत्यपाल मलिक व मुख्यमंत्री सावंत यांनी पुष्पचक्र वाहिले. हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. गोवा मुक्तीसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले. राममनोहर लोहिया, लवंदे, मिनेङिास ब्रागांझा आदी अनेकांनी त्याग केला. त्यांच्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी व गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आजच्या युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली.

राममनोहर लोहिया यांनी गोमंतकीयांना लढण्यासाठी स्फुर्ती दिली. पंतप्रधान मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवूया असे म्हटले आहे. आम्ही त्याचप्रमाणो गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया, यासाठी सरकारला लोकसहभागाची व युवकांच्या योगदानाची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षणStudentविद्यार्थीPramod Sawantप्रमोद सावंत