शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

ऑनलाईन शिक्षण सक्तीचे नाही; प्रमोद सावंत यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:43 IST

ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत.

पणजी: शिक्षण खात्याने राज्यात कुठेच ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केलेली नाही. ऑनलाईन शिक्षणाविषयी समस्या येतात याची कल्पना सरकारला आहे. मात्र मोबाईल टॉवरला गावांमध्ये विरोध करणारे काही लोक देखील या स्थितीला कारणीभूत आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.

आझाद मैदानावर गोवा क्रांती दिन सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत. मात्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांविषयी सरकारला जास्त चिंता आहे. आम्ही त्यावर उपाय काढू. नियमित विद्यालये किंवा वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरकारने अजून घेतलेला नाही. त्याविषयी यापुढे निर्णय होईल. सध्या नेटवर्कची समस्या गावांमध्ये वगैरे येते, कारण मोबाईल टॉवर उभे राहत होते तेव्हा त्या टॉवरना लोक विरोध करत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा राज्याच्या सीमा सील करा अशी मागणी विरोधक करत असल्याविषयी पत्रकारांनी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, की सीमा सिल करा असे सांगणो सोपे असते. गोमंतकीयांनाच दुसऱ्या ठिकाणहून गोव्यात यायचे असते. सिल केल्या तर तेही गोव्यात येऊ शकणार नाहीत. जेव्हा सीमा सिल होत्या तेव्हा भाजी व जीवनावश्यक वस्तू येत नाहीत म्हणून जे विरोध करत होते तेच आता सीमा सिल करा अशी मागणी करतात.

सरकारने खर्चात कपात सुरू करावी अशी मागणी जे करत होते, तेच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृह कर्ज योजना बंद केली म्हणून टीका करतात. खर्च कपातीसाठीच्या उपाययोजनांचाच तो एक भाग आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अनेक खासगी उद्योगांनी कर्मचाऱ्यांचे पगार कापले, त्यांना कामावरून कमी केले हे सर्वानी लक्षात ठेवावे. गोव्याच्या सीमेवर पोलिस व आरोग्य कर्मचारी हे दोन्ही घटक चोवीस तास असतात. सीमेवर पहारा आहे. कोरोनाची लक्षणो दाखविणाऱ्यांची चाचणी होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोवा स्वयंपूर्ण करूया: मुख्यमंत्री

दरम्यान, गोवा क्रांतीदिनाच्यानिमित्ताने आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाराला राज्यपाल सत्यपाल मलिक व मुख्यमंत्री सावंत यांनी पुष्पचक्र वाहिले. हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. गोवा मुक्तीसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले. राममनोहर लोहिया, लवंदे, मिनेङिास ब्रागांझा आदी अनेकांनी त्याग केला. त्यांच्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी व गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आजच्या युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली.

राममनोहर लोहिया यांनी गोमंतकीयांना लढण्यासाठी स्फुर्ती दिली. पंतप्रधान मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवूया असे म्हटले आहे. आम्ही त्याचप्रमाणो गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया, यासाठी सरकारला लोकसहभागाची व युवकांच्या योगदानाची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षणStudentविद्यार्थीPramod Sawantप्रमोद सावंत