शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

'ओडीपी' वादाचा मंत्र्यांमध्ये उडाला भडका! सकाळच्या नाट्यावर सायंकाळी पडला पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2024 09:47 IST

सकाळी झालेल्या या वादावर सायंकाळी पडदा पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना ओडीपींच्या विषयावरुन सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये भडका उडाला. परंतु सकाळी झालेल्या या वादावर सायंकाळी पडदा पडला.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नगरनियोजन खाते ओडीपींच्या बाबतीत आमदार किंवा मंत्र्यांना विश्वासात घेत नाही. तसेच पीडीएच्या बैठकाच होत नाहीत. पीडीए वाऱ्यावर सोडल्यासारखाच प्रकार असल्याचा आरोप करुन नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर काल सकाळी निशाणा साधला. म्हापशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही बाबूश या प्रश्नावरुन आक्रमक बनले होते- भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी काल सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नगर नियोजना खात्याच्या कारभारावर टीका केली. परंतु सायंकाळी मात्र हा वाद मिटल्याचे दिसून आले.

पणजीचा ओडीपी चार वर्षे झाली तरी पूर्ण होऊ शकलेला नाही. फाइल्स येतात तेव्हा आम्हीही गोंधळात पडतो ओडीपींच्या बाबतीत पारदर्शकता हवी असे बाबूश म्हणाले. एकदा ओडीपी तयार केला की दहा वर्षे त्याला हाता लावता येत नाही. ताळगावचा ओडीपी २०१९ मध्ये तयार केला. या ओडीपीमध्ये २०२९ पर्यंत कोणतेही बदल करु नयेत, असे ते म्हणाले.

मतभेद नाहीत...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता मंत्रिमंडळातील कोणाही मंत्र्यांमध्ये मतभेद नाहीत. आम्ही सर्व एक परिवार आहोत, असे त्यांनी सांगितले.

नावे उघड करीन

राणे म्हणाले की, काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी टीक करणे त्यांचे कामच आहे. परंतु एक मात्र निक्षून सांगतो की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही माझ्या खात्याकडून त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मदत घेतलीय. या सर्वांची नावे विधानसभेत उघड करीन.

आम्ही एकाच भाजप कुटुंबातले

मंत्री विश्वजित राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, ओडीपींबाबत काही मुद्दे होते त्यावर चर्चेने तोडगा काढला. आमच्यात कोणतीही कटूता राहिलेली नाही. आम्ही दोघेही एकाच भाजप कुटुंबातले आहोत.

आमच्यात कटुता नाही

सायंकाळी पत्रकारांनी बाबूश यांना पुन्हा विचारले असता 'विश्वजीत हे माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. आम्ही एकाच परिवारातील आहोत. मी किंवा ते दोघेही राजकारणात येण्याआधीपासून आमचे संबंध आहेत. ओडीपींच्या याबाबतीत त्यांच्याशी बोललो व काही गोष्टींमध्ये पारदर्शकता असायला हवी, एवढेच सांगितले. आमच्यामध्ये कोणतीही कटूता राहिलेली नाही.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण