शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'ओडीपी' वादाचा मंत्र्यांमध्ये उडाला भडका! सकाळच्या नाट्यावर सायंकाळी पडला पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2024 09:47 IST

सकाळी झालेल्या या वादावर सायंकाळी पडदा पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना ओडीपींच्या विषयावरुन सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये भडका उडाला. परंतु सकाळी झालेल्या या वादावर सायंकाळी पडदा पडला.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नगरनियोजन खाते ओडीपींच्या बाबतीत आमदार किंवा मंत्र्यांना विश्वासात घेत नाही. तसेच पीडीएच्या बैठकाच होत नाहीत. पीडीए वाऱ्यावर सोडल्यासारखाच प्रकार असल्याचा आरोप करुन नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर काल सकाळी निशाणा साधला. म्हापशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही बाबूश या प्रश्नावरुन आक्रमक बनले होते- भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी काल सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नगर नियोजना खात्याच्या कारभारावर टीका केली. परंतु सायंकाळी मात्र हा वाद मिटल्याचे दिसून आले.

पणजीचा ओडीपी चार वर्षे झाली तरी पूर्ण होऊ शकलेला नाही. फाइल्स येतात तेव्हा आम्हीही गोंधळात पडतो ओडीपींच्या बाबतीत पारदर्शकता हवी असे बाबूश म्हणाले. एकदा ओडीपी तयार केला की दहा वर्षे त्याला हाता लावता येत नाही. ताळगावचा ओडीपी २०१९ मध्ये तयार केला. या ओडीपीमध्ये २०२९ पर्यंत कोणतेही बदल करु नयेत, असे ते म्हणाले.

मतभेद नाहीत...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता मंत्रिमंडळातील कोणाही मंत्र्यांमध्ये मतभेद नाहीत. आम्ही सर्व एक परिवार आहोत, असे त्यांनी सांगितले.

नावे उघड करीन

राणे म्हणाले की, काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी टीक करणे त्यांचे कामच आहे. परंतु एक मात्र निक्षून सांगतो की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही माझ्या खात्याकडून त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मदत घेतलीय. या सर्वांची नावे विधानसभेत उघड करीन.

आम्ही एकाच भाजप कुटुंबातले

मंत्री विश्वजित राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, ओडीपींबाबत काही मुद्दे होते त्यावर चर्चेने तोडगा काढला. आमच्यात कोणतीही कटूता राहिलेली नाही. आम्ही दोघेही एकाच भाजप कुटुंबातले आहोत.

आमच्यात कटुता नाही

सायंकाळी पत्रकारांनी बाबूश यांना पुन्हा विचारले असता 'विश्वजीत हे माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. आम्ही एकाच परिवारातील आहोत. मी किंवा ते दोघेही राजकारणात येण्याआधीपासून आमचे संबंध आहेत. ओडीपींच्या याबाबतीत त्यांच्याशी बोललो व काही गोष्टींमध्ये पारदर्शकता असायला हवी, एवढेच सांगितले. आमच्यामध्ये कोणतीही कटूता राहिलेली नाही.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण