शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

'ओडीपी' वादाचा मंत्र्यांमध्ये उडाला भडका! सकाळच्या नाट्यावर सायंकाळी पडला पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2024 09:47 IST

सकाळी झालेल्या या वादावर सायंकाळी पडदा पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना ओडीपींच्या विषयावरुन सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये भडका उडाला. परंतु सकाळी झालेल्या या वादावर सायंकाळी पडदा पडला.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नगरनियोजन खाते ओडीपींच्या बाबतीत आमदार किंवा मंत्र्यांना विश्वासात घेत नाही. तसेच पीडीएच्या बैठकाच होत नाहीत. पीडीए वाऱ्यावर सोडल्यासारखाच प्रकार असल्याचा आरोप करुन नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर काल सकाळी निशाणा साधला. म्हापशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही बाबूश या प्रश्नावरुन आक्रमक बनले होते- भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी काल सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नगर नियोजना खात्याच्या कारभारावर टीका केली. परंतु सायंकाळी मात्र हा वाद मिटल्याचे दिसून आले.

पणजीचा ओडीपी चार वर्षे झाली तरी पूर्ण होऊ शकलेला नाही. फाइल्स येतात तेव्हा आम्हीही गोंधळात पडतो ओडीपींच्या बाबतीत पारदर्शकता हवी असे बाबूश म्हणाले. एकदा ओडीपी तयार केला की दहा वर्षे त्याला हाता लावता येत नाही. ताळगावचा ओडीपी २०१९ मध्ये तयार केला. या ओडीपीमध्ये २०२९ पर्यंत कोणतेही बदल करु नयेत, असे ते म्हणाले.

मतभेद नाहीत...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता मंत्रिमंडळातील कोणाही मंत्र्यांमध्ये मतभेद नाहीत. आम्ही सर्व एक परिवार आहोत, असे त्यांनी सांगितले.

नावे उघड करीन

राणे म्हणाले की, काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी टीक करणे त्यांचे कामच आहे. परंतु एक मात्र निक्षून सांगतो की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही माझ्या खात्याकडून त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मदत घेतलीय. या सर्वांची नावे विधानसभेत उघड करीन.

आम्ही एकाच भाजप कुटुंबातले

मंत्री विश्वजित राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, ओडीपींबाबत काही मुद्दे होते त्यावर चर्चेने तोडगा काढला. आमच्यात कोणतीही कटूता राहिलेली नाही. आम्ही दोघेही एकाच भाजप कुटुंबातले आहोत.

आमच्यात कटुता नाही

सायंकाळी पत्रकारांनी बाबूश यांना पुन्हा विचारले असता 'विश्वजीत हे माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. आम्ही एकाच परिवारातील आहोत. मी किंवा ते दोघेही राजकारणात येण्याआधीपासून आमचे संबंध आहेत. ओडीपींच्या याबाबतीत त्यांच्याशी बोललो व काही गोष्टींमध्ये पारदर्शकता असायला हवी, एवढेच सांगितले. आमच्यामध्ये कोणतीही कटूता राहिलेली नाही.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण