शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

'ओडीपी' वादाचा मंत्र्यांमध्ये उडाला भडका! सकाळच्या नाट्यावर सायंकाळी पडला पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2024 09:47 IST

सकाळी झालेल्या या वादावर सायंकाळी पडदा पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना ओडीपींच्या विषयावरुन सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये भडका उडाला. परंतु सकाळी झालेल्या या वादावर सायंकाळी पडदा पडला.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नगरनियोजन खाते ओडीपींच्या बाबतीत आमदार किंवा मंत्र्यांना विश्वासात घेत नाही. तसेच पीडीएच्या बैठकाच होत नाहीत. पीडीए वाऱ्यावर सोडल्यासारखाच प्रकार असल्याचा आरोप करुन नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर काल सकाळी निशाणा साधला. म्हापशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही बाबूश या प्रश्नावरुन आक्रमक बनले होते- भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी काल सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नगर नियोजना खात्याच्या कारभारावर टीका केली. परंतु सायंकाळी मात्र हा वाद मिटल्याचे दिसून आले.

पणजीचा ओडीपी चार वर्षे झाली तरी पूर्ण होऊ शकलेला नाही. फाइल्स येतात तेव्हा आम्हीही गोंधळात पडतो ओडीपींच्या बाबतीत पारदर्शकता हवी असे बाबूश म्हणाले. एकदा ओडीपी तयार केला की दहा वर्षे त्याला हाता लावता येत नाही. ताळगावचा ओडीपी २०१९ मध्ये तयार केला. या ओडीपीमध्ये २०२९ पर्यंत कोणतेही बदल करु नयेत, असे ते म्हणाले.

मतभेद नाहीत...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता मंत्रिमंडळातील कोणाही मंत्र्यांमध्ये मतभेद नाहीत. आम्ही सर्व एक परिवार आहोत, असे त्यांनी सांगितले.

नावे उघड करीन

राणे म्हणाले की, काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी टीक करणे त्यांचे कामच आहे. परंतु एक मात्र निक्षून सांगतो की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही माझ्या खात्याकडून त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मदत घेतलीय. या सर्वांची नावे विधानसभेत उघड करीन.

आम्ही एकाच भाजप कुटुंबातले

मंत्री विश्वजित राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, ओडीपींबाबत काही मुद्दे होते त्यावर चर्चेने तोडगा काढला. आमच्यात कोणतीही कटूता राहिलेली नाही. आम्ही दोघेही एकाच भाजप कुटुंबातले आहोत.

आमच्यात कटुता नाही

सायंकाळी पत्रकारांनी बाबूश यांना पुन्हा विचारले असता 'विश्वजीत हे माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. आम्ही एकाच परिवारातील आहोत. मी किंवा ते दोघेही राजकारणात येण्याआधीपासून आमचे संबंध आहेत. ओडीपींच्या याबाबतीत त्यांच्याशी बोललो व काही गोष्टींमध्ये पारदर्शकता असायला हवी, एवढेच सांगितले. आमच्यामध्ये कोणतीही कटूता राहिलेली नाही.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण