शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

आता कृषी जमीन हस्तांतरणास ‘लगाम’; जमीन न कसल्यास सरकार घेणार ताबा, कायदा लागू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 09:12 IST

गोवा कृषी जमीन हस्तांतरण प्रतिबंध कायदा कालपासून लागू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोवा कृषी जमीन हस्तांतरण प्रतिबंध कायदा कालपासून लागू झाला आहे. गेल्या विधानसभेत संमत झालेल्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिली असून, कायदा खात्याने अधिसूचनाही जारी केली आहे.

भात लागवडीखाली असलेली कृषी जमीन बिगर कृषी कामासाठी विक्री, दानपत्र करून किंवा लीजवर हस्तांतरित करता येणार नाही. कृषी लागवडीसाठी जमीन हस्तांतरित केल्यानंतर ती घेणाऱ्याने तीन वर्षांच्या आत कोणतीही लागवड न केल्यास जमीन ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला असेल.

जमीन कृषी आहे की नाही याबाबत वाद असल्यास मामलेदार त्यावर चौकशी करुन निर्णय घेऊ शकतात. सरकारच्या कुठल्याही प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करीत असल्यास हा कायदा लागू नाही. कायद्याचे उल्लंघन करून कृषी जमीन बिगर शेती कामासाठी हस्तांतरित केल्यास कलम ३चा भंग केल्याचा ठपका ठेवून हस्तांतरित करणाऱ्याला व जमीन घेणाऱ्याला जमिनीचा जो बाजारभाव आहे. त्याच्या तिप्पट दंड भरावा लागेल.

उद्योजक किंवा व्यावसायिक आस्थापनांना जर जमीन कृषी लागवडीखाली आणायची असेल तरच हस्तांतरित करता येईल. सहकार कृषी संस्था, ज्यांना लागवड करायची आहे, त्यांना जमीन हस्तांतरित करता येईल. ज्या व्यक्तीला जमीन हस्तांतरित केली जात आहे त्या व्यक्तीची जमीन कसण्याची क्षमता असायला हवी अशा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.

जमीन होणार जप्त

बेकायदा हस्तांतरण प्रकरणात एखादी तक्रार आल्यानंतर किंवा स्वेच्छेने जिल्हाधिकारी कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करू शकतात. चौकशीअंती कायद्याचा भंग केल्याचे निष्पन्न झाल्यास जिल्हाधिकारी ही जमीन जप्त करून कोणत्याही नुकसानभरपाईविना सरकारच्या ताब्यात ही जमीन देऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये चौकशीचा अधिकारी जिल्हाधिकारी व मामलेदार यांनाच आहे. जिल्हाधिकारी किंवा लवादाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्याची मुभा आहे.

विधेयक अपूर्ण: खलप

माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप म्हणाले की, विधानसभेत संमत केलेले विधेयक अपूर्ण आहे. केवळ भातशेती जमिनीपुरतेचे ते मर्यादित आहे. कृषी जमिनींबाबत व्यापक स्वरुपाचे विधेयक संमत होणे आवश्यक आहे. २०१२ साली पर्रीकर मुख्यमंत्री असताना कायदा आयोगाचे अध्यक्ष या नात्याने मी कृषी जमीन व जलस्रोत संवर्धन विधेयक त्यांना दिले होते. गेली १२ वर्षे ते शीतपेटीत आहे. या विधेयकात कृषी जमिनींबाबत व्यापक तरतुदी होत्या. भू सुधारणा कायदा अस्तित्वात आहे. तो प्रभावी व्हायला हवा. १९७६ साली कुळांना कसत असलेल्या जमिनीचे मालकी हक्क दिले. या जमिनी विकण्यास तेव्हाही प्रतिबंध करण्यात आला. भू-सुधारणा विधेयक आणखी काही कड़क दुरुस्त्या करून अंमलात आणता येईल, असेही ते म्हणाले.

- राज्यात भात लागवडीखालील जमीन क्षेत्र घटत चालले आहेत. लोक शेतजमीन बिगर शेती वापरासाठी विकत आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारने हा कायदा आणला आहे.

- महसूल खात्याच्या अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी मंगळवारपासून (दि. १८) लागू झाल्याचे अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाagricultureशेती