शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

आता कृषी जमीन हस्तांतरणास ‘लगाम’; जमीन न कसल्यास सरकार घेणार ताबा, कायदा लागू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 09:12 IST

गोवा कृषी जमीन हस्तांतरण प्रतिबंध कायदा कालपासून लागू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोवा कृषी जमीन हस्तांतरण प्रतिबंध कायदा कालपासून लागू झाला आहे. गेल्या विधानसभेत संमत झालेल्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिली असून, कायदा खात्याने अधिसूचनाही जारी केली आहे.

भात लागवडीखाली असलेली कृषी जमीन बिगर कृषी कामासाठी विक्री, दानपत्र करून किंवा लीजवर हस्तांतरित करता येणार नाही. कृषी लागवडीसाठी जमीन हस्तांतरित केल्यानंतर ती घेणाऱ्याने तीन वर्षांच्या आत कोणतीही लागवड न केल्यास जमीन ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला असेल.

जमीन कृषी आहे की नाही याबाबत वाद असल्यास मामलेदार त्यावर चौकशी करुन निर्णय घेऊ शकतात. सरकारच्या कुठल्याही प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करीत असल्यास हा कायदा लागू नाही. कायद्याचे उल्लंघन करून कृषी जमीन बिगर शेती कामासाठी हस्तांतरित केल्यास कलम ३चा भंग केल्याचा ठपका ठेवून हस्तांतरित करणाऱ्याला व जमीन घेणाऱ्याला जमिनीचा जो बाजारभाव आहे. त्याच्या तिप्पट दंड भरावा लागेल.

उद्योजक किंवा व्यावसायिक आस्थापनांना जर जमीन कृषी लागवडीखाली आणायची असेल तरच हस्तांतरित करता येईल. सहकार कृषी संस्था, ज्यांना लागवड करायची आहे, त्यांना जमीन हस्तांतरित करता येईल. ज्या व्यक्तीला जमीन हस्तांतरित केली जात आहे त्या व्यक्तीची जमीन कसण्याची क्षमता असायला हवी अशा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.

जमीन होणार जप्त

बेकायदा हस्तांतरण प्रकरणात एखादी तक्रार आल्यानंतर किंवा स्वेच्छेने जिल्हाधिकारी कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करू शकतात. चौकशीअंती कायद्याचा भंग केल्याचे निष्पन्न झाल्यास जिल्हाधिकारी ही जमीन जप्त करून कोणत्याही नुकसानभरपाईविना सरकारच्या ताब्यात ही जमीन देऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये चौकशीचा अधिकारी जिल्हाधिकारी व मामलेदार यांनाच आहे. जिल्हाधिकारी किंवा लवादाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्याची मुभा आहे.

विधेयक अपूर्ण: खलप

माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप म्हणाले की, विधानसभेत संमत केलेले विधेयक अपूर्ण आहे. केवळ भातशेती जमिनीपुरतेचे ते मर्यादित आहे. कृषी जमिनींबाबत व्यापक स्वरुपाचे विधेयक संमत होणे आवश्यक आहे. २०१२ साली पर्रीकर मुख्यमंत्री असताना कायदा आयोगाचे अध्यक्ष या नात्याने मी कृषी जमीन व जलस्रोत संवर्धन विधेयक त्यांना दिले होते. गेली १२ वर्षे ते शीतपेटीत आहे. या विधेयकात कृषी जमिनींबाबत व्यापक तरतुदी होत्या. भू सुधारणा कायदा अस्तित्वात आहे. तो प्रभावी व्हायला हवा. १९७६ साली कुळांना कसत असलेल्या जमिनीचे मालकी हक्क दिले. या जमिनी विकण्यास तेव्हाही प्रतिबंध करण्यात आला. भू-सुधारणा विधेयक आणखी काही कड़क दुरुस्त्या करून अंमलात आणता येईल, असेही ते म्हणाले.

- राज्यात भात लागवडीखालील जमीन क्षेत्र घटत चालले आहेत. लोक शेतजमीन बिगर शेती वापरासाठी विकत आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारने हा कायदा आणला आहे.

- महसूल खात्याच्या अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी मंगळवारपासून (दि. १८) लागू झाल्याचे अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाagricultureशेती