शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

जेवढे पाणी वापराल आता तेवढेच बिल भरा: सुभाष फळदेसाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:05 IST

ग्राहकांच्या खिशाला यापुढे नाहक फटका नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जेवढे पाणी वापराल, तेवढेच बिल भरा, अशी नवी योजना सरकार राबवणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला यापुढे नाहक फटका बसणार नाही, अशी माहिती पेयजल खात्याचे नवे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. मंत्री फळदेसाई यांनी काल खात्याचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व साहाय्यक अभियंत्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.

एखाद्याचा फ्लॅट किंवा घर बंद असेल व त्याने पाणी वापरलेच नसेल तर सध्याच्या योजनेनुसार त्याला मीटर भाडे अगदी कमीत कमी १६ युनिटचे बिल येत असे. नवीन योजनेप्रमाणे यापुढे जेवढे पाणी वापरले असेल तेवढेच बिल येईल. उदाहरणार्थ ४ युनिट वापरले तर तेवढ्याच युनिटचे शुल्क अधिक मीटर भाडे एवढेच बिल येईल, असे फळदेसाई यांनी सांगितले. अधिकृत माहितीनुसार, ऑगस्ट २०२१ ते मे २०२५ या कालावधीत ४१.९ लाख ग्राहकांना शून्य बिले आली. सरकारी तिजोरीवर त्याचा ६५ कोटी रुपयांचा भार पडला.

मोफत पाणी योजना बंद

सरकारने ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू केलेली महिना १६ हजार लिटरपर्यंत मोफत पाण्याची योजना गेल्या १ मेपासून बंद केली. ४० टक्के लोकांना शून्य बिल येत होते, त्यांना आता बिल भरावे लागत आहे. सरकारचे असे म्हणणे आहे की, लोक चार-चार मीटर बसवून पाण्याचा दुरुपयोग करतात.

जलशुद्धीकरणासाठी प्रति लिटर सरकारला २० रुपये खर्च येतो. परंतु सरकार केवळ ४ रुपये बिल आकारते व १६ रुपये भार स्वतः उचलते. कच्च्या पाण्यावर प्रक्रिया करण्यावरच एवढा खर्च येतो. शिवाय खात्याचे अभियंते व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च वेगळा. एवढा अवाढव्य खर्च येत असल्याने मोफत पाणी देणे शक्य होत नाही.

गोव्यात अनेकांचे शहरांमध्ये असलेले फ्लॅट बंदच असतात. असे असतानाही त्यांना पाण्याचे बिल मात्र कमीत कमी १६ युनिटचेच भरावे लागत असे. या लोकांना आता दिलासा मिळणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीState Governmentराज्य सरकार