शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अॅप ओळखणार गुन्हेगार; पोलिस महासंचालकांची माहिती, व्हेरिफिकेशन प्रक्रिया होणार सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:26 IST

राज्याचे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पर्यटन राज्य असल्याने देश-विदेशांतील लोकांची गोव्यात सतत ये-जा असते. त्यामुळे देशात इतर ठिकाणी गुन्हे करून आलेले कुख्यात गुन्हेगार येथे आढळले आहेत. तसेच राज्यात अनेकदा अतिरेकीही राहून गेल्याचे दिसून आले आहे. मात्र, असे घडू नये यासाठी गोवापोलिसांकडून एक विशेष मोबाइल अॅप उपलब्ध केले जाणार आहे. या अॅपवर कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र अपलोड केल्यास त्याची पूर्ण माहिती मिळेल. यातून पोलिस यंत्रणाही अलर्ट राहणार आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी ही माहिती दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, भाडेकरू पडताळणी प्रभावीपणे केल्याने लपून बसलेले गुन्हेगार सापडत आहेत. आता भाडेकरू तपासणी या अॅपद्वारेच होईल.

महासंचालक म्हणाले की, 'सर्व भाडेकरूंना विशिष्ट आयडी क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे यातून सर्व भाडेकरूंचा एक डेटाबेस पोलिसांकडे तयार होईल. तो गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.' जमीन बळकाव प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित सतत जामिनावर सुटत आहेत हे चित्र योग्य आहे का ? या प्रश्नावर महासंचालक म्हणाले की, संशयिताला जामीन देणे हा न्यायालयाचा विषय असल्यामुळे त्यावर बोलू इच्छित नाही. आतापर्यंत १२ प्रकरणांत आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते गँगवॉर नसल्याचा दावा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी फातोर्डा येथे झालेल्या कार अडवून झालेल्या मारामारीच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले होते. मात्र, ते गँगवॉर नसल्याचा दावा अलोक कुमार यांनी केला. त्यांच्या मते फातोर्डा येथील हल्ला हा वैयक्तिक कारणांमुळे होता. ते गँगवॉर नव्हते. कारण, ज्या ग्रुपने हा प्रकार केला, तो फार अधिक काळ त्या ठिकाणी कार्यरत नव्हता. तसेच तो ग्रुप संघटित असल्याचे आणि एका विशिष्ट हेतूने प्रेरित असल्याचे आढळून आलेले नाही.

पोलिसांविरुद्ध तक्रारी

लोकांकडून पोलिसांविरुद्धही तक्रारी आहेत, याची आपल्याला कल्पना असल्याचे महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले. यामध्ये वाहतूक पोलिसांबाबत अधिक तक्रारी आहेत. त्यासाठी कॅशलेस व्यवहाराची पद्धत लागू करण्यात आली आहे. यामुळे गैरप्रकार थांबले नसले तरी तक्रारी कमी झाल्या आहेत, असे डीजीपी म्हणाले. आतापर्यंत गैरप्रकारात अडकल्यामुळे अनेक पोलिसांना निलंबित आणि बडतर्फही करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस