शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सभापतींसह 'त्या' ८ आमदारांना नोटीस; अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 15:09 IST

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणणे मांडण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आठ फुटीर काँग्रेस आमदारांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सभापती रमेश तवडकर यांच्यासह आठजणांना नोटीस बजावली आहे. तसेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपले म्हणणे मांडण्याचा आदेशही दिला आहे.

या आठ आमदारांविरुद्ध अपात्रता याचिकेवर सुनावणी घेण्यास सभापती टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. चोडणकर यांची ही याचिका न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती एस. व्ही. एन भट्टी यांनी कामकाजात दाखल करून घेत प्रतिवादी असलेले सभापती तवडकर यांच्यासह आठही फुटीरांना नोटीस बजावली आहे. गेल्या महिन्यात १७ सप्टेंबरला चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर स्पेशल लिव्ह पिटीशन सादर केले होते.

याआधी २०१९ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, तसेच अन्य नऊ मिळून दहा आमदार फुटले तेव्हाही तत्कालीन सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे चोडणकर यांनी त्या दहाजणांविरुद्ध अपात्रता याचिका सादर केली होती. परंतु, त्यावेळी सभापती पाटणेकर यांनी वेळकाढू धोरण अवलंबिल्याने चोडणकर यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता आधी उच्च न्यायालयात सभापती व फुटीर आमदारांविरुद्ध याचिका सादर केली. परंतु, तेथे दिलासा न मिळाल्याने ते सर्वोच्च न्यायालयात गेले.

गिरीश चोडणकर यांच्यावतीने अॅड. अभिषेक मनु सिंघवी, मोहम्मद अली खान, ओंकार होडा व उदय भाटिया हे वकील काम पाहत आहेत. आठ फुटीर आमदारांविरुद्ध काँग्रेसचे नेते डॉम्निक नोरोन्हा, तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचीही सभापतींकडे अपात्रता याचिका आहे.

११ महिने अपात्रता याचिका ठेवली प्रलंबित

गिरीश चोडणकर यांचे वकील अॅड. सिंघवी यांनी अपात्रता याचिका प्रकरणात सुप्रीम कोर्टात असा युक्तिवाद केला की, सभापती रमेश तवडकर यांच्याकडे गेले ११ महिने अपात्रता याचिका प्रलंबित आहे. आपल्या अशिलास यापूर्वी सभापतींकडील अपात्रता याचिकेबद्दल वाईट अनुभव आहे. सभापती घटनात्मक कर्तव्य बजावण्यास विसरले आहेत. त्यामुळे त्यांना आपली अपात्रता याचिका हाताळण्याचे कडक निर्देश द्यावेत. तसेच सभापतींनी ही याचिका कशी हाताळणार याचा रोड मॅप द्यावा.

काय आहे प्रकरण

१४ सप्टेंबर २०२२ रोजी आमदार दिगंबर कामत, आमदार मायकल लोबो, संकल्प आमोणकर, आलेक्स सिवचेरा, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, केदार नाईक व रुडॉल्फ फर्नाडिस हे आठ काँग्रेसचे आमदार फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षच भाजपात विलीन केला. मूळ पक्ष अस्तित्वात असताना फुटीर आमदार पक्ष विलीन करू शकत नाहीत. घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा भंग झालेला आहे, असा दावा करून गिरीश यांनी या आठही आमदारांविरोधात सभापतींकडे अपात्रता याचिका सादर केलेली आहे. परंतु, ही याचिका अजून सभापतींनी सुनावणीस घेतलेली नाही.

 

टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय