शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ नंतर उत्तर गोव्यात पाणी टंचाई भासणार नाही: सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 11:39 IST

तिळारीचे पाणी पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोव्याला २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या हेतूने सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले असल्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे.

तिळारी धरणाच्या कालव्याचे दरवाजे खुले झाल्याने तेथून सोडलेले पाणी अखेर गुरुवारी सकाळी पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात पोहोचले आहे. त्यामुळे पर्वरी व साळगाव परिसराला आता पाणीपुरवठा सुरळीत होईल. कालव्यांचे दरवाजे लॉक झाल्याने पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा बुधवारी होऊ शकला नव्हता. त्यानंतर पुण्याहून आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने हे दरवाजे खुले झाले, असे त्यांनी सांगितले.

शिरोडकर म्हणाले, की तिळारी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम १३ नोव्हेंबरपासून हाती घेतले होते. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्याने आपल्या बाजूने ९ किलोमीटर कालव्यांचे दुरुस्ती काम हाती घेतले. त्यासाठी गोव्याकडे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. काम हे एक महिन्यात पूर्ण करून पाणीपुरवठा २२ डिसेंबरपासून सुरळीत केला जाणार होता. मात्र, कालव्यांचे दरवाजे लॉक झाले. त्यामुळे ते उघडता न आल्याने पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. त्यानंतर तिळारीचे पाणी सोडण्यात आले. 

गोव्यात विशेष करून उत्तर गोव्यात २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय पिळर्ण, पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांचे कामही लवकरच पूर्ण होईल असेही शिरोडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीDamधरण