शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२०२४ नंतर उत्तर गोव्यात पाणी टंचाई भासणार नाही: सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 11:39 IST

तिळारीचे पाणी पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोव्याला २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या हेतूने सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले असल्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे.

तिळारी धरणाच्या कालव्याचे दरवाजे खुले झाल्याने तेथून सोडलेले पाणी अखेर गुरुवारी सकाळी पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात पोहोचले आहे. त्यामुळे पर्वरी व साळगाव परिसराला आता पाणीपुरवठा सुरळीत होईल. कालव्यांचे दरवाजे लॉक झाल्याने पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा बुधवारी होऊ शकला नव्हता. त्यानंतर पुण्याहून आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने हे दरवाजे खुले झाले, असे त्यांनी सांगितले.

शिरोडकर म्हणाले, की तिळारी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम १३ नोव्हेंबरपासून हाती घेतले होते. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्याने आपल्या बाजूने ९ किलोमीटर कालव्यांचे दुरुस्ती काम हाती घेतले. त्यासाठी गोव्याकडे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. काम हे एक महिन्यात पूर्ण करून पाणीपुरवठा २२ डिसेंबरपासून सुरळीत केला जाणार होता. मात्र, कालव्यांचे दरवाजे लॉक झाले. त्यामुळे ते उघडता न आल्याने पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. त्यानंतर तिळारीचे पाणी सोडण्यात आले. 

गोव्यात विशेष करून उत्तर गोव्यात २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय पिळर्ण, पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांचे कामही लवकरच पूर्ण होईल असेही शिरोडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीDamधरण