शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

२०२४ नंतर उत्तर गोव्यात पाणी टंचाई भासणार नाही: सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 11:39 IST

तिळारीचे पाणी पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोव्याला २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या हेतूने सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले असल्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे.

तिळारी धरणाच्या कालव्याचे दरवाजे खुले झाल्याने तेथून सोडलेले पाणी अखेर गुरुवारी सकाळी पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात पोहोचले आहे. त्यामुळे पर्वरी व साळगाव परिसराला आता पाणीपुरवठा सुरळीत होईल. कालव्यांचे दरवाजे लॉक झाल्याने पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा बुधवारी होऊ शकला नव्हता. त्यानंतर पुण्याहून आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने हे दरवाजे खुले झाले, असे त्यांनी सांगितले.

शिरोडकर म्हणाले, की तिळारी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम १३ नोव्हेंबरपासून हाती घेतले होते. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्याने आपल्या बाजूने ९ किलोमीटर कालव्यांचे दुरुस्ती काम हाती घेतले. त्यासाठी गोव्याकडे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. काम हे एक महिन्यात पूर्ण करून पाणीपुरवठा २२ डिसेंबरपासून सुरळीत केला जाणार होता. मात्र, कालव्यांचे दरवाजे लॉक झाले. त्यामुळे ते उघडता न आल्याने पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. त्यानंतर तिळारीचे पाणी सोडण्यात आले. 

गोव्यात विशेष करून उत्तर गोव्यात २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय पिळर्ण, पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांचे कामही लवकरच पूर्ण होईल असेही शिरोडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीDamधरण