शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ नंतर उत्तर गोव्यात पाणी टंचाई भासणार नाही: सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 11:39 IST

तिळारीचे पाणी पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोव्याला २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या हेतूने सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले असल्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे.

तिळारी धरणाच्या कालव्याचे दरवाजे खुले झाल्याने तेथून सोडलेले पाणी अखेर गुरुवारी सकाळी पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात पोहोचले आहे. त्यामुळे पर्वरी व साळगाव परिसराला आता पाणीपुरवठा सुरळीत होईल. कालव्यांचे दरवाजे लॉक झाल्याने पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा बुधवारी होऊ शकला नव्हता. त्यानंतर पुण्याहून आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने हे दरवाजे खुले झाले, असे त्यांनी सांगितले.

शिरोडकर म्हणाले, की तिळारी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम १३ नोव्हेंबरपासून हाती घेतले होते. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्याने आपल्या बाजूने ९ किलोमीटर कालव्यांचे दुरुस्ती काम हाती घेतले. त्यासाठी गोव्याकडे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. काम हे एक महिन्यात पूर्ण करून पाणीपुरवठा २२ डिसेंबरपासून सुरळीत केला जाणार होता. मात्र, कालव्यांचे दरवाजे लॉक झाले. त्यामुळे ते उघडता न आल्याने पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. त्यानंतर तिळारीचे पाणी सोडण्यात आले. 

गोव्यात विशेष करून उत्तर गोव्यात २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय पिळर्ण, पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांचे कामही लवकरच पूर्ण होईल असेही शिरोडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीDamधरण