शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नाही, सरकार दोषी; दीड महिना समस्येने छळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2023 10:37 IST

गोव्यातील विद्यमान सरकारला संवेदनशील म्हणून घेण्याचा अधिकारच राहिलेला नाही.

गोव्यातील विद्यमान सरकारला संवेदनशील म्हणून घेण्याचा अधिकारच राहिलेला नाही. बार्देश तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना पूर्ण अपयश आले आहे. तिळारीच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या पर्वरी व साळगाव मतदारसंघाला गेले दीड महिना पाणी समस्येने खूप छळले आहे. कळंगुट-कांदोळीच्या थोड्या भागासह शिवोलीतही लोकांना खूप त्रास झाला. बार्देशात खासगी टँकरचे दर बाराशे ते दीड हजार रुपये झाले. 

टँकर माफियांनी लोकांना पिळले, मात्र सरकारी यंत्रणेला याचे काहीही पडून गेलेले नाही. हर घर जल आपण पोहोचवले असे सांगून सावंत सरकार केंद्र सरकारकडून शाबासकी घेत असते. मात्र तिळारीचे पाणी आले किंवा नाही आले तरी, बार्देश तालुक्यातील विविध गावांना कायमच तळमळावे लागते, जे गोवा सरकार फसव्या विकासापोटी स्वतःची पाठ एरवी थोपटून घेत असते, त्या सरकारमधील सर्व मंत्र्यांनी काही दिवस पर्वरी व साळगावमध्ये राहून पाहिले तर बरे होईल. तेथील युवा, महिला तसेच वृद्ध नागरिक व घरातील आजारी व्यक्तींना पाण्याविना कोणते हाल सोसावे लागतात ते पंचतारांकित जीवन जगणाऱ्या राजकारण्यांना कळून येईल. 

सोशल मीडियावरून लोक सरकारला शिव्या देत आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते नावापुरते थोडे टैंकर गावांमध्ये पाठविते, पण ते पुरेसे नाही. लोक बिचारे आपल्या घामाकष्टाचे पैसे मोजतात आणि खासगी टैंकर बोलवितात. टँकर माफियांनी आपले दर वाढविले आहेत. जो टैंकर पूर्वी आठशे रुपयांना मिळायचा, तो आता संकट काळात बार्देशात बाराशे ते दीड हजार रुपये मागतो, काही आजी-माजी पंचांचेही टैंकर आहेत. त्यांनी दुष्काळग्रस्त स्थितीचा गैरफायदा घेण्याची संधी सोडली नाही.

तिळारी धरणातून अस्नोड्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पाला होणारा कच्च्या पाण्याचा पुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. एकदा पाणी सोडले की अस्नोडा प्रकल्पात पोहोचण्यासाठी तीन दिवस लागतात. पर्वरीत पाणी पोहोचण्यासाठी सहा दिवस लागतात. सरत्या वर्षाला निरोप देताना पर्वरी व साळगाव मतदारसंघातील लोकांच्या डोळ्यांत पाणीच असेल. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून तरी नियमितपणे नळाला पाणी येऊ दे अशी प्रार्थना लोक करतील.

साळगाव किंवा पर्वरी हे राजधानी पणजीपासून अगदी जवळ असलेले मतदारसंघ आहेत. शहरीकरण झाले, लोकवस्ती वाढली. परप्रांतीय मजुरांची संख्या दोन्हीकडे अफाट आहे. रोज नवी बांधकामे उभी राहत आहेत. नव्या बिल्डरांकडून डोंगरफोड वगैरे करून मोठे प्रकल्प उभे केले जात आहेत. काही पंच, सरपंचांची चांदीच झाली आहे. नवनव्या प्रकल्पांना वीज व पाणी रोज कुठून पुरवणार हे सरकार स्पष्टपणे सांगू शकत नाही. काही वेळा न्यायालयांचे आदेश येतात, निबंध येतात. मात्र बांधकाम खाते सर्वांनाच पाणी कनेक्शन देत असते. नळाला धड तीन तास देखील नीट पाणी येत नाही तेव्हा लोक ओरड करतात. महिलांनी गेल्या पंधरा दिवसांत सरकारला खूप शाप दिले आहेत. आमदार रोहन खंवटे किंवा केदार नाईक यांच्या हातातही स्थिती राहिलेली नाही. कालवे दुरुस्तीसाठी घेतले जातात तेव्हा तिळारी धरणाचे पाणी बार्देशात येणे बंद होते. मात्र एरवीही कधी खंडित वीजपुरवठ्यामुळे तर कधी अन्य काही कारणाने पर्वरी व बार्देशात पाण्यासाठी रड असतेच. ही रडकथा गोवा सरकारसाठी लज्जास्पद आहे. 

विकासाच्या गप्पा सांगणाऱ्या, मोदी गॅरंटीचे रथ फिरविणाऱ्या गोव्यातील सर्व मंत्र्यांना जनतेने पाणी व वीज प्रश्नाबाबत जाब विचारण्याची गरज आहे. मूलभूत गरजाही जर सरकार भागवू शकत नसेल तर लोकांनी काय करायचे, हा प्रश्न येतोच. केवळ सोहळे करत राहायचे, कंत्राटे द्यायची, सरकारी तिजोरीतून आपल्याच बगलबच्च्यांसाठी व कार्यकर्त्यासाठी पैसे खर्च करायचे हा गेल्या आठ वर्षांतला नवा कार्यक्रम झाला आहे. हे कुठे तरी थांबायला हवे. 

रस्त्यांवर खड्डे खोदताना काही वेळा जलवाहिन्या फोडल्या जातात, वीज केबल्स तोडले जातात. म्हापशात भूमिगत वीजवाहिनीच्या कामावेळी धुळेर भागातील जलवाहिनी फोडली गेली. यामुळे गेले तीन दिवस त्या भागातील जलपुरवठ्यावर संक्रांत आली, सार्वजनिक बांधकाम खाते संबंधित कंत्राटदारांवर कधीच काही कारवाई करत नाही, पूर्वी कदंब पठारावर हमखास वीज केबल तोडले जायचे, लोक गप्प राहून परिणाम भोगतात. याचा अर्थ सरकारने वेगळा काढू नये.

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी