शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

२०२७ मध्ये गोव्यात पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल; माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:03 IST

कळंगुट येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : राज्यात २०२७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येईल आणि भाजप सरकारच्या कुशासनापासून गोवा मुक्त होईल, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.

कळंगुट येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महिला अध्यक्षा प्रतिक्षा खलप, गटाध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा, उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर उपस्थित होते. माणिकराव ठाकरे म्हणाले की, 'गोव्यातील भाजप सरकार हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. बेरोजगारी, मोठ्या प्रमाणात केली जाणारी बेकायदेशीर भू रुपांतरे, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य सुविधेचा वाजलेला बोजवारा, सरकारचे कुशासन यामुळे गोव्यातील लोक सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे हे सरकार राज्यातून हद्दपार करण्याची गरज आहे.'

ठाकरे म्हणाले की, 'राज्यातील काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. गोव्याची ओळख, वारसा आणि भविष्य जपण्यासाठी तळागाळापासून प्रत्येकाने काम करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पक्ष संघटना मजूबत केली जाईल. गोव्यातील नागरिकांना पारदर्शक, जबाबदार, लोकाभिमुख सरकारची गरज आहे, असे सरकार केवळ काँग्रेस पक्षच देऊ शकेल. त्यामुळे २०२७च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात परत एकदा काँग्रेस सरकार स्थापन व्हावे, काँग्रेसचेच सरकार यावे, यासाठी आम्ही पक्ष म्हणून कटिबद्ध असून, त्यादिशेने कामाची सुरुवात केली आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अमित पाटकर यांच्यासह इतर वक्त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेManikrao Thakareमाणिकराव ठाकरे