शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

२०२७ मध्ये गोव्यात पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल; माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:03 IST

कळंगुट येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : राज्यात २०२७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येईल आणि भाजप सरकारच्या कुशासनापासून गोवा मुक्त होईल, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.

कळंगुट येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महिला अध्यक्षा प्रतिक्षा खलप, गटाध्यक्ष लॉरेन्स सिल्वेरा, उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर उपस्थित होते. माणिकराव ठाकरे म्हणाले की, 'गोव्यातील भाजप सरकार हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. बेरोजगारी, मोठ्या प्रमाणात केली जाणारी बेकायदेशीर भू रुपांतरे, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य सुविधेचा वाजलेला बोजवारा, सरकारचे कुशासन यामुळे गोव्यातील लोक सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे हे सरकार राज्यातून हद्दपार करण्याची गरज आहे.'

ठाकरे म्हणाले की, 'राज्यातील काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. गोव्याची ओळख, वारसा आणि भविष्य जपण्यासाठी तळागाळापासून प्रत्येकाने काम करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पक्ष संघटना मजूबत केली जाईल. गोव्यातील नागरिकांना पारदर्शक, जबाबदार, लोकाभिमुख सरकारची गरज आहे, असे सरकार केवळ काँग्रेस पक्षच देऊ शकेल. त्यामुळे २०२७च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात परत एकदा काँग्रेस सरकार स्थापन व्हावे, काँग्रेसचेच सरकार यावे, यासाठी आम्ही पक्ष म्हणून कटिबद्ध असून, त्यादिशेने कामाची सुरुवात केली आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अमित पाटकर यांच्यासह इतर वक्त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेManikrao Thakareमाणिकराव ठाकरे