शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आरजीची नवी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 10:26 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीने जवळजवळ दहा टक्के मते प्राप्त केली होती.

रिव्होल्यूशनरी गोवन्स हा पक्ष आपली स्वत:ची वेगळी वाट चालू पाहत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यातील दोन्ही जागा आरजी लढेल, असे मनोज परब यांनी परवाच जाहीर केले. आरजी लोकसभा निवडणुकीवेळी कुणासोबत युती करणार नाही हे स्पष्ट झाले. आरजीचा दावा आहे की त्या पक्षाने गोमंतकीयांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे आरजी स्वतंत्रपणे २०२४ च्या निवडणुकीवेळी आपले उमेदवार उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघात उभे करणार आहे. आरजीचा विश्वास कोणत्याच स्थानिक किंवा राष्ट्रीय पक्षावर नाही. त्यामुळे युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आरजीने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले तर काँग्रेसला की भाजपला फटका बसेल हे सांगण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीने जवळजवळ दहा टक्के मते प्राप्त केली होती. नेमकेपणाने सांगायचे तर आरजीला ९३ हजार २५५ म्हणजे ९.४५ टक्के मते मिळाली. आम आदमी पक्षाला गोव्यात ६४ हजार ६३५ म्हणजे ६.८ टक्के मते मिळवता आली. तृणमूल काँग्रेसला ४९ हजार ४८० (५.२ टक्के), म.गो. पक्षाला ७२ हजार २६९ (७.६ टक्के) आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला फक्त १७ हजार ४७७ म्हणजे १.८ टक्के एवढी मते लोकांनी दिली. भाजपने ३३ टक्के, तर कॉंग्रेसने २३.५ टक्के मतांपर्यंत मजल मारली होती. आरजी, आप, तृणमूल या तीन पक्षांची मते एकत्र केली तर ती २१ टक्के होतात.

काँग्रेसला सतत वाटत आले आहे की, तृणमूल किंवा आरजीने प्राप्त केलेली मते ही आपली हक्काची मते आहेत. वास्तविक तसे समजणे हे अर्धसत्य आहे. आता काँग्रेसची कोणतीच मते ही हक्काची राहिलेली नाहीत. ख्रिस्ती धर्मीयांनी काँग्रेसची साथ २००० सालापासून सोडण्यास आरंभ केला. काँग्रेसच्या सासष्टीतील नेत्यांनी चर्च संस्थेचादेखील अपेक्षाभंग केल्याने ख्रिस्ती मतदार काँग्रेसपासून दूर जाऊ लागला. आता तर भाजपमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त ख्रिस्ती धर्मीय आमदार असतात. या आमदारांसोबतही ख्रिस्ती मतदार आहेतच. ख्रिस्ती धर्मीय मतदारांची मते आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजी, कॉंग्रेस व भाजप अशा सर्वच पक्षांना कमी-अधिक प्रमाणात मिळतात. काँग्रेसला अजूनही त्यापैकी जास्त मते मिळतात. मात्र, हिंदू मते ही कॉंग्रेस व भाजपमध्ये जास्त विभागून जात आहेत. अन्य छोट्या पक्षांना ही मते जास्त प्रमाणात अजून मिळवता आलेली नाहीत. 

तरीही गेल्या विधानसभा निवडणुकीत आरजीने हिंदू मतदारसंघांमध्येदेखील बऱ्यापैकी मते प्राप्त करून दाखवली आहेत. सत्तरी तालुक्यात देखील आरजीला मते मिळतात व तिसवाडी आणि सासष्टीतदेखील मते मिळतात. यामुळेच यापुढे लोकसभा निवडणूक स्वबळावर आरजी पक्ष लढू पाहतोय, भाजपविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी एकच सर्वमान्य उमेदवार उभा करावा असा प्रयत्न कदाचित काँग्रेस पक्ष करून पाहील. मात्र, तसे कधीच शक्य होणार नाही. कॉंग्रेसमध्येच उत्तर गोव्यात व दक्षिणेत प्रत्येकी तीन इच्छुक उमेदवार आहेत. ज्यांना तिकीट मिळत नाही, ते बंड करत असतात. लोकसभा निवडणुकीवेळी आरजीला स्वतःची शक्ती दाखवावी लागेल. आरजी व आम आदमी पक्षाचे कसेच पटत नाही. तसेच आरजी व काँग्रेसचेही संबंध कायम ताणलेले असतात. 

आरजीने गेल्या विधानसभा निवडणुकीत आपले नुकसान केले असे काँग्रेसला वाटते. मात्र, आरजीचा दावा असा आहे, की आरजीमुळे भाजपचेही उमेदवार काही मतदारसंघात पराभूत झाले आहेत. आरजीला भाजपनेच पुढे काढले होते असा दावा मुळीच करता येत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीने प्रभावी कामगिरी केली, म्हणून आता लोकसभा निवडणुकीवेळीही तशीच प्रभावी कामगिरी करता येईल असे सध्या म्हणता येत नाही. आरजीला लोकसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात मते प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. आरजीमध्ये फूट पाडण्याचाही प्रयत्न काहीजण करत आहेत. मनोज परब यांनीदेखील त्या अर्थाचे विधान अलीकडेच केले होते. आरजीचे उमेदवार जर लोकसभा निवडणुकीवेळी जास्त प्रमाणात मते प्राप्त करण्यात यशस्वी ठरले, तरच गोमंतकीयांमध्ये हा पक्ष आता रुजला असे म्हणता येईल.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण