शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

एनडीए सरकार सत्तेवर येणार, बिहारमध्ये बहुमताचा दावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:54 IST

लोकांकडून प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : बिहारमध्ये नितीश कुमार व टीमचे एनडीए सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. जंगल राज्य संपून विकसित बिहार साकार करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना यश आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

बिहार राज्याची निवडणूक ऑक्टोबरमध्ये घोषित होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी एनडीएचे सरकार पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार आहे. राहुल गांधी व त्यांच्या टीमने कितीही खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, तरी आज जंगलराज्य संपून त्या ठिकाणी सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळाल्याने संपूर्ण जनता पाठीशी खंबीर उभी आहे. त्यामुळे पूर्ण बहुमताने एनडीए सरकारला विजय प्राप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. 

साखळी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण बिहारमध्ये निवडणूक पूर्व प्रचारांतर्गत पटना व दरभंगा येथे दोन संमेलनामध्ये युवा व इतर लोकांना संबोधित केले. त्या ठिकाणी जो विकास झालेला आहे, तो फार मोठा असून पूर्णपणे चेहरामोहरा बदलून देणारा ठरलेला आहे. त्यामुळे पूर्णपणे जनता भाजपबरोबर असून, कोणी कितीही प्रचार खोटा केला, तरी पूर्ण बहुमताचे सरकार त्या ठिकाणी येणार, याची शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काणकोणकर हल्लाप्रकरणी कुणाचीही खैर नाही

दरम्यान, गोव्यातील काणकोणकर यांच्यावरील हल्लाप्रकरणी कुणाचीही खैर करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना दिला. कोण कुठेही असू दे, त्याचा शोध घेऊन पूर्णपणे कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकार कटाक्षाने लक्ष ठेवून असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतPoliticsराजकारण