शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

दुपदरीकरण होताच मुंबई - गोवा ५ तासांत: मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:44 IST

पंतप्रधानांच्या हस्ते 'वंदे भारत' चे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : गोव्याच्या विकासाची घोडदौड सुपरफास्ट पद्धतीने सुरू आहे. 'वंदे भारत' रेल्वेमुळे यात आणखी भर पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर गोव्यातून अवघ्या पाच तासांत मुंबईत पोहोचता येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल भोपाळ येथून मुंबई-गोवा यासह पाच 'वंदे भारत' रेल्वे गाड्यांना हिरवा बावटा दाखवून त्यांचे लोकार्पण केले. यावेळी मडगाव रेल्वेस्थानकावर आयोजित सोहळ्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्यासोबत राज्यपाल पी. एस. श्रीधर पिल्लई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दिगंबर कामत, उल्हास तुयेंकर, कोकण रेल्वे महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता व इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात दळणवळणाच्या क्षेत्रात भरीव क्रांती केली आहे. आपला गोवाही केंद्र सरकारच्या साहाय्याने विकासाची घोडदौड करत आहे. सरकारने पत्रादेवी ते पोळेपर्यंत सहापदरी मार्ग तसेच आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारून लोकांना सुरळीत वाहतूक सेवा दिली आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करून २० राज्यांना थेट जोडलो गेलो आहोत. यापुढे विमानसेवेत आणखी राज्यांना जोडले जाणार आहे.

"वंदे भारत' ही सुपरफास्ट एक्स्प्रेस खास करून पर्यटक व व्यावसायिकांच्या सेवेसाठी सुरू केली आहे. या रेल्वेच्या जलदगतीने लोकांचा किमती वेळ वाचणार हेच वंदे भारत रेल्वे गाडी सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. गोव्याचा मुंबईतील लोकांकडे आधीपासून सलोख्याचा संबंध आहे या दोन्ही राज्यांतील लोक पर्यटनाबरोबर व्यवसाय व वैद्यकीय सेवेसाठी रेल्वेने ये-जा करतात. ही रेल्वे गाडी त्यांनी जास्तच सोयीस्कर ठरणार आहे, असे सावंत म्हणाले.

मडगाव रेल्वेस्थानक फाईव्ह स्टार बनविणार

मडगावचे रेल्वेस्थानक उच्च दर्जाचे आहे. सर्वोत्कृष्ट रेल्वेस्थानकाचा पुरस्कारही मडगावच्या रेल्वेस्थानकाला मिळालेला आहे. रेल्वेस्थानकावरून दिल्लीपासून कन्याकुमारी ते पाटणा, बिहार, छत्तीसगडपर्यंत रेल्वे सेवेची कनेक्टिव्हिटी जोडलेली आहे. यापुढे सरकारच्या सहकार्यान मडगावचे रेल्वेस्थानक फाईव्ह स्टार बनविणार, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. या रेल्वेस्थानक परिसरात टॅक्सी, रिक्षा, बससेवा, दुचाकी पायलट सेवा, पर्यटन टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत.

गोव्यातून चंदे भारत रेल्वे सुरू होणे हा किनारपट्टीच्या राज्याला इतर राज्यांशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. या नव्या सेवेमुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. किनारपट्टी लाभलेली राज्ये इतर राज्यांशी जोडण्याचा केंद्राचा मनोदय आहे. - रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

नव्या रेल्वे

- भोपाळ ते इंदोर (राणी कमलापती) - भोपाळ ते जबलपूर (राणी कमलापती)- रांची ते पटना (बिहार) - धारवाड ते बंगळुरू (कर्नाटक)- गोवा ते मुंबई (मडगाव)

४०० 'वंदे भारत' देशभरात धावणार

यापुढे टप्प्या-टप्प्यानी विविध राज्यांत ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेली घंटे भारत ही १८ डब्यांची विजेवर धावणारी रेल्वे आहे. यात प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा आहेत. आगामी न वर्षात देशभर ४०० वंदे भारत एक्स्प्रेस धावताना दिसतील. लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी भारत एक्स्प्रेसला स्लीपर कोच जोडण्यात येणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले

 

टॅग्स :goaगोवाVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस