शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दुपदरीकरण होताच मुंबई - गोवा ५ तासांत: मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:44 IST

पंतप्रधानांच्या हस्ते 'वंदे भारत' चे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : गोव्याच्या विकासाची घोडदौड सुपरफास्ट पद्धतीने सुरू आहे. 'वंदे भारत' रेल्वेमुळे यात आणखी भर पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर गोव्यातून अवघ्या पाच तासांत मुंबईत पोहोचता येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल भोपाळ येथून मुंबई-गोवा यासह पाच 'वंदे भारत' रेल्वे गाड्यांना हिरवा बावटा दाखवून त्यांचे लोकार्पण केले. यावेळी मडगाव रेल्वेस्थानकावर आयोजित सोहळ्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्यासोबत राज्यपाल पी. एस. श्रीधर पिल्लई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दिगंबर कामत, उल्हास तुयेंकर, कोकण रेल्वे महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता व इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात दळणवळणाच्या क्षेत्रात भरीव क्रांती केली आहे. आपला गोवाही केंद्र सरकारच्या साहाय्याने विकासाची घोडदौड करत आहे. सरकारने पत्रादेवी ते पोळेपर्यंत सहापदरी मार्ग तसेच आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारून लोकांना सुरळीत वाहतूक सेवा दिली आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करून २० राज्यांना थेट जोडलो गेलो आहोत. यापुढे विमानसेवेत आणखी राज्यांना जोडले जाणार आहे.

"वंदे भारत' ही सुपरफास्ट एक्स्प्रेस खास करून पर्यटक व व्यावसायिकांच्या सेवेसाठी सुरू केली आहे. या रेल्वेच्या जलदगतीने लोकांचा किमती वेळ वाचणार हेच वंदे भारत रेल्वे गाडी सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. गोव्याचा मुंबईतील लोकांकडे आधीपासून सलोख्याचा संबंध आहे या दोन्ही राज्यांतील लोक पर्यटनाबरोबर व्यवसाय व वैद्यकीय सेवेसाठी रेल्वेने ये-जा करतात. ही रेल्वे गाडी त्यांनी जास्तच सोयीस्कर ठरणार आहे, असे सावंत म्हणाले.

मडगाव रेल्वेस्थानक फाईव्ह स्टार बनविणार

मडगावचे रेल्वेस्थानक उच्च दर्जाचे आहे. सर्वोत्कृष्ट रेल्वेस्थानकाचा पुरस्कारही मडगावच्या रेल्वेस्थानकाला मिळालेला आहे. रेल्वेस्थानकावरून दिल्लीपासून कन्याकुमारी ते पाटणा, बिहार, छत्तीसगडपर्यंत रेल्वे सेवेची कनेक्टिव्हिटी जोडलेली आहे. यापुढे सरकारच्या सहकार्यान मडगावचे रेल्वेस्थानक फाईव्ह स्टार बनविणार, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. या रेल्वेस्थानक परिसरात टॅक्सी, रिक्षा, बससेवा, दुचाकी पायलट सेवा, पर्यटन टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत.

गोव्यातून चंदे भारत रेल्वे सुरू होणे हा किनारपट्टीच्या राज्याला इतर राज्यांशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. या नव्या सेवेमुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. किनारपट्टी लाभलेली राज्ये इतर राज्यांशी जोडण्याचा केंद्राचा मनोदय आहे. - रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

नव्या रेल्वे

- भोपाळ ते इंदोर (राणी कमलापती) - भोपाळ ते जबलपूर (राणी कमलापती)- रांची ते पटना (बिहार) - धारवाड ते बंगळुरू (कर्नाटक)- गोवा ते मुंबई (मडगाव)

४०० 'वंदे भारत' देशभरात धावणार

यापुढे टप्प्या-टप्प्यानी विविध राज्यांत ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेली घंटे भारत ही १८ डब्यांची विजेवर धावणारी रेल्वे आहे. यात प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा आहेत. आगामी न वर्षात देशभर ४०० वंदे भारत एक्स्प्रेस धावताना दिसतील. लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी भारत एक्स्प्रेसला स्लीपर कोच जोडण्यात येणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले

 

टॅग्स :goaगोवाVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस