शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

विक्रमी पावसामुळे ऑगस्टमध्ये मान्सून तूट संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:33 IST

या पार्श्वभूमीवर पुढील सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे मान्सूनची तूट पूर्णपणे भरून निघाली असून ७ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात जवळजवळ अडीच आठवडे पाऊस पडला नव्हता, ज्यामुळे सरासरी मान्सूनची तूट १३ टक्क्यांपर्यंत वाढली होती. परंतु शेवटच्या आठवड्यात तब्बल १४ इंच पाऊस पडला. यापैकी २८ ऑगस्टच्या सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत विक्रमी ६.२ इंच इतका पाऊस पडला.

मागील सहा दिवस व त्यापूर्वीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता ऑगस्ट महिना पावसाविनाच गेला होता. जून महिन्यात ३० इंच, जुलै महिन्यात ४८ इंच, तर ऑगस्टमध्ये ३४ इंच पाऊस नोंदला. त्यामुळे एकूण हंगामी पाऊस ११३.५ इंच असल्याचे नोंदवले गेले आहे. सप्टेंबर महिना हा पावसाळ्याचा शेवटचा महिना आहे. या महिन्यात अवघे ५ इंच पाऊस पडला तरी राज्यात हंगामी पावसाची सरासरी पार होणार आहे. 

या पार्श्वभूमीवर पुढील सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ६ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच भागांमध्ये हंगामी सरासरी पावसाचे प्रमाण पार झाले आहे. राज्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ११८.५ इंच पाऊस पडतो. पावसाळ्याच्या समाप्तीस महिना शिल्लक आहे.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊसRainपाऊस