शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

गरिबांच्या कल्याणासाठीच मोदी सरकार; सी.टी. रवींचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 09:32 IST

पर्वरीतील नागरिकांशी साधला दिलखुलास संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी: गेल्या नऊ वर्षांच्या सत्ताकाळात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोककल्याणाला प्राधान्य देऊन देशहितकारक कार्य केल्याचे प्रतिपादन भाजपचे गोवा राज्य प्रभारी तसेच कर्नाटकचे माजी मंत्री सी. टी. रवी यांनी आज पर्वरी येथे केले.

भाजपच्या संपर्क से समर्थन अंतर्गत मोहिमेत सहभागी झालेले सी. टी. रवी हे सुकूर पंचायत क्षेत्रातील वेताळ महारूद्र संस्थानाजवळ आयोजित शेतकरीवर्गाच्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. त्यांच्यासमवेत पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, पर्वरी मंडळ अध्यक्ष किशोर अस्नोडकर तसेच सरपंच, पंच सदस्य व जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.

गेल्या नऊ वर्षांतील मोदी सरकारच्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सविस्तरपणे उपस्थितांना दिली. रवी यांनी पर्वरी मतदारसंघातील साई मंदिर, वेताळ महाररुद्र देवस्थानाला भेट दिली व देवतांचे आशीर्वादही घेतले. साई मंदिराचे पदाधिकारी सेल्वराज गौंडर, वेताळ महारुद्रचे अध्यक्ष व माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर यांनी रवींसह मंत्री खंवटे व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे स्वागत केले. पारंपरिक पद्धतीनेही त्यांचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत झाले. पर्वरी मतदारसंघातील काही मान्यवरांच्या देखील रवी यांनी, मंत्री खंवटे व प्रदेशाध्यक्ष तानावडे व अन्य पक्ष पदाधिकारी वर्गासमवेत वैयक्तिक भेटी घेतल्या.

यावेळी त्यांनी विविध स्तरांतील मान्यवरांशी संवाद साधला व मोदी सरकारच्या कार्याची माहिती पुस्तिका त्यांना भेटविली. पीएनटी वसाहत, सुकूर पंचायत कार्यक क्षेतील काही मान्यवरांना ते भेटले. त्यात अॅड. जगन्नाथ मुळगावकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. सिडनी पिंटो, इब्राहीम आगा आदींचा समावेश होता. खरगे गावच्या स्वयंसेवी गट सदस्यांच्या बैठकीतही त्यांनी मार्गदर्शन केले.

स्टार्टअपद्वारे उद्योगाला बळकटी : सी. टी. रवी

केंद्रातील मोदी सरकारने भारताला आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योगक्षेत्राला बळकटी दिली. कृषिप्रधान भारतातील बळीराजाच्या समृद्धी योजनांना प्राधान्य दिले, आरोग्य क्षेत्रात जनतेला आरोग्यविम्याचे सुरक्षाकवच उपलब्ध केले. पर्यटन समृद्धीसाठी देखो अपना देश संकल्पनेखाली देशी पर्यटन वृद्धीला महत्त्व दिल्याचे सी. टी. रवी यांनी सांगितले.

मोदींनी शेतकऱ्यांचे हित जपले : खंवटे

पर्यटनमंत्री खंवटे यांनी मोदी सरकारच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या नऊ वर्षातील नेत्रदीपक कामगिरीमुळेच आज भारत जगात अव्वल होण्याच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे हित मोदी सरकारने जोपासल्याचे सांगून गोवा सरकारही शेतकऱ्यांच्या हितासाठी समर्पित असल्याचे ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण