शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

वाढत्या वादांमुळे गोवा सरकारची नाचक्की, अनेक मंत्री जेरीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 12:22 IST

गेल्या दीड वर्षातील विद्यमान सरकारचा अर्धा कालावधी हा मुख्यमंत्री, मंत्री व अन्य नेत्यांच्या आजारपणात वाया गेला.

पणजी : गेल्या दीड वर्षातील विद्यमान सरकारचा अर्धा कालावधी हा मुख्यमंत्री, मंत्री व अन्य नेत्यांच्या आजारपणात वाया गेला. मात्र विविध प्रकारचे नवे वाद येऊन सरकारच्या मानगुटीवर बसू लागले आहेत. या वादांमुळे सरकारची नाचक्की होत आहे. काही मंत्री तर वादांमुळे जेरीसच आले आहेत.

मार्च 2017 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपाप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर आले. त्यानंतर काही महिन्यांनी लगेच ग्रेटर पणजी पीडीएचा वाद निर्माण झाला. बाबूश मोन्सेरात यांना ग्रेटर पणजी पीडीए दिली जात असल्याने विविध एनजीओंनी थेट पर्रीकर आणि नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्यावर टीका केली. ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध तिसवाडी तालुक्यात जनआंदोलन उभे राहिले व सरकारवर आरोप झाले. त्यामुळे सरकारने आणखी नाचक्की होऊ नये म्हणून दहा गावे ग्रेटर पणजी पीडीएतून अलिकडेच वगळली. मात्र कळंगुट-कांदोळीच्या ओडीपीवरून अजून लोकांमधील असंतोष कायम आहे.

गोव्याबाहेरून गोव्यात येणारी मासळी अनेक दिवस ताजी ठेवण्यासाठी मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन वापरले जाते अशा प्रकारचा गंभीर आरोप सरकारवर झाल्यानंतर लोकांनी मासळी खाणे बंद केले. सरकार हादरले. सरकारच्या अन्न न औषध प्रशासन खात्यानेच छापा टाकून काही मासळी ताब्यात घेऊन चाचणी केली तेव्हा प्रथम फॉर्मेलिनचे अंश आढळले होते. यामुळे सरकारवर विरोधी काँग्रेस पक्षासह अनेक सामाजिक कार्यकर्ते तुटून पडले. परिणामी सरकारने पंधरा दिवसांसाठी गोव्यातील मासळी आयात बंद केली होती. आता आयात सुरू झाली तरी, अजुनही फॉर्मेलिनबाबतचा वाद शमलेला नाही. या वादात काही मंत्री जेरीस आले आहेत. हा विषय आम आदमी पक्षाने न्यायालयापर्यंत पोहचवला आहे. 

आता सरकारच्या गोमेकॉ रुग्णालयातून युवकाचे प्रेत गायब झाल्याच्या विषयाने सरकारला घाम फुटला आहे. गोव्यात प्रेत देखील सुरक्षित नाही अशा प्रकारची टीका सोशल मीडियावरून होत आहे. हळदोणे भागातील 24 वर्षीय युवकाचे प्रेत गोमेकॉच्या शवागारात होते. या शवागारात अनेक प्रेते ही बेवारस व्यक्तींचीही असतात. बेवारस व्यक्तीचे एक प्रेत जाळण्यासाठी द्यायचे सोडून त्याजागी अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे 24 वर्षीय युवकाचे प्रेत दिले गेले व मग ते जाळले गेले. ही अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना त्या 24 वर्षीय मुलाच्या कुटूंबियांची माफी मागावी लागली. तसेच तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यासह त्यांच्याविरोधात सरकारने पोलिस तक्रारही केली आहे. या प्रकरणी क्राईम ब्रँचमार्फत चौकशी केली जावी अशीही भूमिका राणे यांनी घेतली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध चालवला आहे.

मुख्यमंत्री अजून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते कधी परततील हे कुणाला ठाऊक नाही. भाजपचे दोन आमदारही रुग्णालयातच आहेत. अशास्थितीत गोव्यात प्रशासन योग्य चालण्याऐवजी नवनवे वाद अंगावर येऊ लागल्याने सरकार चारीबाजूंनी हैराण झालेले आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा