शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वाढत्या वादांमुळे गोवा सरकारची नाचक्की, अनेक मंत्री जेरीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 12:22 IST

गेल्या दीड वर्षातील विद्यमान सरकारचा अर्धा कालावधी हा मुख्यमंत्री, मंत्री व अन्य नेत्यांच्या आजारपणात वाया गेला.

पणजी : गेल्या दीड वर्षातील विद्यमान सरकारचा अर्धा कालावधी हा मुख्यमंत्री, मंत्री व अन्य नेत्यांच्या आजारपणात वाया गेला. मात्र विविध प्रकारचे नवे वाद येऊन सरकारच्या मानगुटीवर बसू लागले आहेत. या वादांमुळे सरकारची नाचक्की होत आहे. काही मंत्री तर वादांमुळे जेरीसच आले आहेत.

मार्च 2017 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपाप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर आले. त्यानंतर काही महिन्यांनी लगेच ग्रेटर पणजी पीडीएचा वाद निर्माण झाला. बाबूश मोन्सेरात यांना ग्रेटर पणजी पीडीए दिली जात असल्याने विविध एनजीओंनी थेट पर्रीकर आणि नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्यावर टीका केली. ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध तिसवाडी तालुक्यात जनआंदोलन उभे राहिले व सरकारवर आरोप झाले. त्यामुळे सरकारने आणखी नाचक्की होऊ नये म्हणून दहा गावे ग्रेटर पणजी पीडीएतून अलिकडेच वगळली. मात्र कळंगुट-कांदोळीच्या ओडीपीवरून अजून लोकांमधील असंतोष कायम आहे.

गोव्याबाहेरून गोव्यात येणारी मासळी अनेक दिवस ताजी ठेवण्यासाठी मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन वापरले जाते अशा प्रकारचा गंभीर आरोप सरकारवर झाल्यानंतर लोकांनी मासळी खाणे बंद केले. सरकार हादरले. सरकारच्या अन्न न औषध प्रशासन खात्यानेच छापा टाकून काही मासळी ताब्यात घेऊन चाचणी केली तेव्हा प्रथम फॉर्मेलिनचे अंश आढळले होते. यामुळे सरकारवर विरोधी काँग्रेस पक्षासह अनेक सामाजिक कार्यकर्ते तुटून पडले. परिणामी सरकारने पंधरा दिवसांसाठी गोव्यातील मासळी आयात बंद केली होती. आता आयात सुरू झाली तरी, अजुनही फॉर्मेलिनबाबतचा वाद शमलेला नाही. या वादात काही मंत्री जेरीस आले आहेत. हा विषय आम आदमी पक्षाने न्यायालयापर्यंत पोहचवला आहे. 

आता सरकारच्या गोमेकॉ रुग्णालयातून युवकाचे प्रेत गायब झाल्याच्या विषयाने सरकारला घाम फुटला आहे. गोव्यात प्रेत देखील सुरक्षित नाही अशा प्रकारची टीका सोशल मीडियावरून होत आहे. हळदोणे भागातील 24 वर्षीय युवकाचे प्रेत गोमेकॉच्या शवागारात होते. या शवागारात अनेक प्रेते ही बेवारस व्यक्तींचीही असतात. बेवारस व्यक्तीचे एक प्रेत जाळण्यासाठी द्यायचे सोडून त्याजागी अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे 24 वर्षीय युवकाचे प्रेत दिले गेले व मग ते जाळले गेले. ही अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना त्या 24 वर्षीय मुलाच्या कुटूंबियांची माफी मागावी लागली. तसेच तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यासह त्यांच्याविरोधात सरकारने पोलिस तक्रारही केली आहे. या प्रकरणी क्राईम ब्रँचमार्फत चौकशी केली जावी अशीही भूमिका राणे यांनी घेतली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध चालवला आहे.

मुख्यमंत्री अजून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते कधी परततील हे कुणाला ठाऊक नाही. भाजपचे दोन आमदारही रुग्णालयातच आहेत. अशास्थितीत गोव्यात प्रशासन योग्य चालण्याऐवजी नवनवे वाद अंगावर येऊ लागल्याने सरकार चारीबाजूंनी हैराण झालेले आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा