शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळा ३५ हजार कोटींचा, पण ३५ रुपयेही वसुली नाही; कॅप्टन विरियातो यांची सरकारवर टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2024 13:34 IST

चर्चेचे दिले आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील खाण व्यवसायात ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोप भाजप नेत्यांनी करून खाण व्यवसाय बंद केला; पण गेल्या १२ वर्षांत ३५ रुपये वसुली करण्यात सरकारला जमलेले नाही. संजीवनी साखर कारखाना बंद करून जागा हडप करण्याचा प्रयत्न सरकारातील नेत्यांनी केला आहे. इतर देशांतून काजू आयात केली जात असल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत, असे उद्‌गार दक्षिण गोव्याचे इंडिया आघाडीचे काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काढले.

सावर्डे मतदारसंघातील खाणी तसेच संजीवनी साखर कारखाना बंद करून इथल्या सामान्य जनतेवर अन्याय झाला आहे. त्यामुळे खाण अवलंबित व संजीवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक व कामगारांची स्थिती बिकट बनली आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी खाणी सुरू करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी दिलेले आश्वासन गेल्या १० वर्षांत पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे डबल इंजिन सरकारची गॅरंटी यावेळी गोव्यातील जनता फोल ठरविणार असल्याचे कॅप्टन फर्नाडिस यांनी सांगितले. फर्नांडिस यांनी इतर कार्यकर्त्यांसह सावर्डे मतदारसंघाचा दौरा केला. 

यावेळी तारा केरकर, सावर्डे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष जयेश पाटील, गौतम (श्याम) भंडारी, संकेत भंडारी, त्रिबेलो सौझा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही कॅप्टन फर्नाडिस यांनी दिली.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसsouth-goa-pcदक्षिण गोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४