शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खाण घोटाळा ३५ हजार कोटींचा, पण ३५ रुपयेही वसुली नाही; कॅप्टन विरियातो यांची सरकारवर टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2024 13:34 IST

चर्चेचे दिले आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील खाण व्यवसायात ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोप भाजप नेत्यांनी करून खाण व्यवसाय बंद केला; पण गेल्या १२ वर्षांत ३५ रुपये वसुली करण्यात सरकारला जमलेले नाही. संजीवनी साखर कारखाना बंद करून जागा हडप करण्याचा प्रयत्न सरकारातील नेत्यांनी केला आहे. इतर देशांतून काजू आयात केली जात असल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत, असे उद्‌गार दक्षिण गोव्याचे इंडिया आघाडीचे काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काढले.

सावर्डे मतदारसंघातील खाणी तसेच संजीवनी साखर कारखाना बंद करून इथल्या सामान्य जनतेवर अन्याय झाला आहे. त्यामुळे खाण अवलंबित व संजीवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक व कामगारांची स्थिती बिकट बनली आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी खाणी सुरू करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी दिलेले आश्वासन गेल्या १० वर्षांत पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे डबल इंजिन सरकारची गॅरंटी यावेळी गोव्यातील जनता फोल ठरविणार असल्याचे कॅप्टन फर्नाडिस यांनी सांगितले. फर्नांडिस यांनी इतर कार्यकर्त्यांसह सावर्डे मतदारसंघाचा दौरा केला. 

यावेळी तारा केरकर, सावर्डे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष जयेश पाटील, गौतम (श्याम) भंडारी, संकेत भंडारी, त्रिबेलो सौझा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही कॅप्टन फर्नाडिस यांनी दिली.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसsouth-goa-pcदक्षिण गोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४