शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

म्हादई 'प्रवाह'चे वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 14:29 IST

प्रवाह म्हणजे 'म्हादई प्रागतिक नदी प्राधिकरणला' आपली मान्यता दिली.

राजेंद्र पां. केरकर, पर्यावरणवादी

कर्नाटकातल्या विधानसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर येऊन पोचलेल्या असताना केंद्रीय मंत्रिमंडळाने म्हादई प्रवाह म्हणजे 'म्हादई प्रागतिक नदी प्राधिकरणला' आपली मान्यता दिली. ती या प्रश्नी संबंधित गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांत कल्याण आणि सौहार्दाची भावना प्रस्थापित करण्याला प्राधान्य देत असल्याचे सांगत. २००२ साली गोवा सरकारने शेजारचे कर्नाटक राज्य आपल्या जीवनदायिनी असणाऱ्या म्हादई आणि तिच्या उपनद्यांना मलप्रभेच्या पात्रात वळवण्यासाठी प्रकल्प प्रस्ताव पुढे रेटत असल्याने या प्रश्नी लवादाची नियुक्ती करण्याची मागणी केली.

याविषयीची दिवास्वप्ने गोव्यातल्या सत्ताधारी आणि म्हादई जलविवाद लवादाची मागणी करण्याऐवजी गोवा सरकारने १९९९ साली अधिसूचित करण्यात आलेल्या सत्तरी तालुक्यातल्या म्हादई अभयारण्याला ढालीसारखे कसे वापरता येईल याचा ऊहापोह पर्यावरण कार्यकत्यांनी केला होता. परंतु, म्हादई अभयारण्याची अधिसूचना कशी रद्द करता येईल किंवा त्यातले जंगलक्षेत्र कसे वगळता येईल याचा पाठपुरावा करण्यात आपल्या सरकारने बराच मोठा कालावधी वाया घालवला. शेवटी लोह, मँगनिजसारखे खनिजच नव्हे, तर तेथील तृणपात्याचे उच्चाटन करण्याला सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने स्पष्ट केले. असे असतानादेखील म्हादई अभयारण्याच्या प्रस्तावाला कसे शीतपेटीत ठेवता येईल याविषयीची दिवास्वप्ने गोव्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पाहिली.

त्यामुळे म्हादई अभयारण्य आणि तेथील पट्टेरी वाघाच्या नैसर्गिक अधिवासाबरोबर प्रदेशनिष्ठ जैविक संपदेच्या अस्तित्वाच्या मुद्द्यांना महत्त्व देण्याऐवजी गोवा सरकारने म्हादई जलविवाद लवादाची मागणी आंतरराज्य जलविवाद कायदा १९५६ द्वारे केली. परंतु तत्कालीन केंद्र सरकारने कर्नाटकातल्या खासदारांच्या संख्येवर डोळा ठेवून लवादाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याकारणाने गोव्याने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आणि शेवटी न्यायालयाच्या आदेशानंतर २०१३ मध्ये लवाद नियुक्त करण्यात आले.

या लवादाने २०१४ पासून २०१८ पर्यंत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांनी सादर केलेले म्हादई प्रश्नाचे विविध मुद्दे आणि पुरावे पाहिल्यानंतर आपला अंतिम निवाडा १४ ऑगस्ट २०१८ रोजी दिला. म्हादई आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रात १८८ टीएमसी फिट पाणी असल्याचे मान्य करून लवादाने तिन्ही राज्यांचा पाण्याचा वाटा निश्चित केला; परंतु तिन्ही राज्यांनी आपणाला म्हादई आणि कर्नाटकातल्या भीमगड अभयारण्याच्या वास्तवाकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यासंदर्भात भंडाफोड करण्याची नितांत गरज होती. याउलट राज्य सरकार कर्नाटक आणि केंद्राने म्हादई प्रश्नातल्या दंडेलीसमोर नांगी टाकत आहे, ही खेदजनक बाब आहे.

गोवा सरकारने हल्लीच जी हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती, त्यासंदर्भात सुनावणी झाली तेव्हा कर्नाटकाच्या वरिष्ठ वकिलाने म्हादई बचाव अभियानाच्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या स्थळी बांधकाम करत नसल्याचे आणि रीतसर परवाने मिळाल्यानंतर पुढील पावले उचलणार असल्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे गोव्याला तूर्त दिलासा मिळाला असे जे सांगण्यात येते, खरंतर तेच अनाकलनीय ठरलेले आहे. एका बाजूला प्रकल्पाच्या अहवालाला तांत्रिक मान्यता, तर दुसऱ्या बाजूला प्राधिकरणाच्या स्थापनेला मान्यता दिल्या कारणाने कळसा-भांडुरा प्रकल्याद्वारे कर्नाटकाची धरणे आणि बंधाऱ्यांच्या उभारणीची सिद्धता पूर्ण झाल्याचे अधोरेखित झालेले आहे. म्हादई प्राधिकरण अस्तित्वात आल्यावरती कर्नाटकाला लवादाने पाण्याचा जो वाटा दिलेला आहे. तेवढाच पावसाळी मौसमात कालव्यातून आणि पाइपमधून नेला जाईल यावरती देखरेख केली जाणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या वाट्याला जे पाणी आलेले आहे त्यापेक्षा अधिक पाणी दोन्ही राज्यांनी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला रोखण्याची जबाबदारी प्राधिकरणावर असणार आहे.

यापूर्वी कर्नाटकाने रीतसर केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय त्याचप्रमाणे राष्ट्रीय वन्यजीव सल्लागार त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या कळसा नाल्याच्या आणि मलप्रभा नदीच्या उगमावरती घाला घालून उघड्या आणि भुयारी कालव्यांचे कामकाज पूर्ण केलेले आहे. त्यामुळे नव्याने अस्तित्वात येणाऱ्या म्हादई प्राधिकरणामार्फत कर्नाटकाच्या म्हादई आणि तिच्या उपनद्यांतल्या पाण्याला आगामी काळात पळवून देण्यासाठी जी षडयंत्रे राबवली जाणार त्यांना रोखण्याची जबाबदारी असणार. प्राधिकरणाचे अध्यक्ष, सदस्य, सचिव आणि उर्वरित दोन सदस्य केंद्र सरकार नियुक्त करणार असल्याने ते सत्ताधाऱ्यांच्या की निःपक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडणार, यावरती आगामी आणि भविष्यातली पाण्याची लढाई निश्चित होणार आहे. गोव्यासाठी आगामी आणि भविष्यकाळ प्रतिकूल ठरणार नाही या दृष्टीने पूर्वतयारी करणे महत्त्वाचे आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा