शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मगोपची तिरकी चाल, गोवा सरकारमध्ये स्फोटक वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 11:31 IST

गोव्यातील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या मगो पक्षाने सत्तेत राहूनच गोवा विधानसभेच्या सभापतींच्या निर्णयाविरुद्ध व दोन माजी आमदारांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका सादर केल्याने सरकारमध्ये खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देभाजपाने स्वीकारलेल्या धोरणाला मगोपने कायदेशीर आव्हान दिले आहे. मगोपने केंद्रीय निवडणूक आयोगाला व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही याचिकेत प्रतिवादी केले आहे.मगोपने उचललेल्या या पाऊलावर सरकारमधील अन्य मंत्री व भाजपाचे काही असंतुष्ट आमदारही लक्ष ठेवून आहेत.

पणजी - गोव्यातील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या मगो पक्षाने सत्तेत राहूनच गोवा विधानसभेच्या सभापतींच्या निर्णयाविरुद्ध व दोन माजी आमदारांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका सादर केल्याने सरकारमध्ये खळबळ माजली आहे. मगोपने केंद्रीय निवडणूक आयोगाला व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही याचिकेत प्रतिवादी केले आहे. ही निव्वळ कायदेशीर याचिका नव्हे तर ती राजकीय याचिका असल्याचे सरकारमध्ये मानले जात आहे.

पक्षांतर बंदी कायद्यात दुरुस्ती व्हावी असे मगो पक्षाला अपेक्षित आहे. अलिकडेच विरोधी काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते भाजपामध्ये गेले. दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना भाजपाने पक्षात प्रवेश दिला व दोन महत्त्वाची सरकारी महामंडळेही दिली. भाजपाकडून सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांचे महत्त्व कमी केले जात असल्याची मगोपची भावना बनली. मगोपचे दोन आमदार गोव्यातील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री आहेत. मात्र आपल्या निर्णयाचा कोणता राजकीय परिणाम होईल याची पर्वा न करता मगोपने उच्च न्यायालयास आता याचिका सादर केली आहे. दोन्ही नेत्यांनी आमदारकीचे राजीनामे दिल्लीहून गोव्यात पाठवून दिले व सभापतींनी ते स्वीकारले. सभापतींचा हा निर्णय बेकायदा ठरतो किंवा नियमबाह्य ठरतो, असा दावा मगोपने केला आहे. तसेच राजीनामे स्वीकारण्याचा सभापतींचा हा निर्णय रद्दबादल ठरवावा आणि गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुका सोपटे आणि शिरोडकर यांना लढविण्यास परावृत्त करावे, अशी भूमिका मगोपने घेतली आहे.

मगोपने आपल्या दोन सदस्यांमार्फत ही याचिका न्यायालयाला सादर केली आहे. एकंदरीत भाजपाने स्वीकारलेल्या धोरणाला मगोपने कायदेशीर आव्हान दिले आहे. मगोपची स्थापना गोवा मुक्तीनंतर 1963 च्या सुमारास झाली व त्यावेळपासून आतार्पयत मगोपच्या तिकीटावर 123 उमेदवार निवडून आले व आमदार झाले. मात्र आमदार झाल्यानंतर आतापर्यंत त्यापैकी 35 जण पक्षातून फुटले व अन्य पक्षांमध्ये गेले. एकंदरीत मगोपलाच फाटाफुटीच्या राजकारणाचा जास्त फटका बसला व त्यामुळे मगोप न्यायालयात गेल्याचे एका नेत्याने लोकमतला सांगितले. मगोपने उचललेल्या या पाऊलावर सरकारमधील अन्य मंत्री व भाजपाचे काही असंतुष्ट आमदारही लक्ष ठेवून आहेत. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणManohar Parrikarमनोहर पर्रीकर