शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दिल्लीत गाठीभेटी; गोव्यात हलचल, विश्वजीत राणे हे अमित शाह यांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 08:34 IST

दामू नाईक व बी. एल. संतोष यांच्यात चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची दिल्लीत भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर मंत्री विश्वजीत राणेही दिल्लीत असून त्यांनी गृहमंत्री अमित शाह व बी. एल. संतोष यांची भेट घेतली. यामुळे राज्यातील मंत्रिमंडळातील बदलाविषयी चर्चेला पुन्हा ऊत आला आहे.

दामू गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. संतोष यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीबद्दल दामू यांच्याकडून जाणून घेतले. यापूर्वी ते गोवा भेटीवर आले असता दामू यांनी मंत्रिमंडळ फेररचनेबाबत आपली भूमिका त्यांच्याकडे स्पष्ट केली होती. आज बैठकीत पुन्हा या विषयावर सखोल चर्चा झाली.

दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हेही दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व नंतर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनाही ते भेटले. दोघांकडे त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल बुधवारीच पार पडले आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व सरकारच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या सहा वर्षांत यशस्वी कामगिरी बजावलेली आहे.

दरम्यान, सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार पुढील महिन्यात मंत्रिमंडळातून चार जणांना डच्चू दिला जाण्याची तसेच सर्व मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवसात गोव्यातून आणखी काही मंत्री, आमदारांनाही दिल्लीत पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात बदल होणार असा बोलबाला गेली अनेक दिवस आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष पंधरा दिवसांपूर्वी गोव्यात येऊन गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दामू नाईक व इतर काही आमदारांकडून त्यांनी राजकीय स्थितीची माहिती घेतली होती.

दिल्लीहून दोन्ही नेत्यांना आमंत्रण?

गोव्याच्यादृष्टीने दिल्लीत खूप हालचाली सुरू आहेत. स्वतः पंतप्रधानांनी गोव्याच्या मंत्रिमंडळ फेररचना विषयात लक्ष घातले आहे, अशी चर्चा राजकीय गोटात आहे. मंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्लीत संतोषींशी चर्चा केली. कदाचित येत्या आठवड्यात दिल्लीहून मुख्यमंत्री सावंत व विश्वजीत राणे यांना बोलावणे जाईल. एकत्र बसून मंत्रिमंडळ फेररचनेविषयी चर्चा व निर्णय केंद्रीय नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधून आठ आमदार फुटून भाजपात गेले. त्यातील आलेक्स सिक्वेरा यांनाच मंत्रिपद देण्यात आले. परंतु त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. आता विधानसभा अधिवेशन संपल्याने घडामोडींना वेग आलेला आहे. याबाबत दामू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिल्ली भेटीबद्दल माहिती देण्यास नकार दिला.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण