शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिल्लीत गाठीभेटी; गोव्यात हलचल, विश्वजीत राणे हे अमित शाह यांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 08:34 IST

दामू नाईक व बी. एल. संतोष यांच्यात चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची दिल्लीत भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर मंत्री विश्वजीत राणेही दिल्लीत असून त्यांनी गृहमंत्री अमित शाह व बी. एल. संतोष यांची भेट घेतली. यामुळे राज्यातील मंत्रिमंडळातील बदलाविषयी चर्चेला पुन्हा ऊत आला आहे.

दामू गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. संतोष यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीबद्दल दामू यांच्याकडून जाणून घेतले. यापूर्वी ते गोवा भेटीवर आले असता दामू यांनी मंत्रिमंडळ फेररचनेबाबत आपली भूमिका त्यांच्याकडे स्पष्ट केली होती. आज बैठकीत पुन्हा या विषयावर सखोल चर्चा झाली.

दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हेही दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व नंतर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनाही ते भेटले. दोघांकडे त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल बुधवारीच पार पडले आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व सरकारच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या सहा वर्षांत यशस्वी कामगिरी बजावलेली आहे.

दरम्यान, सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार पुढील महिन्यात मंत्रिमंडळातून चार जणांना डच्चू दिला जाण्याची तसेच सर्व मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवसात गोव्यातून आणखी काही मंत्री, आमदारांनाही दिल्लीत पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात बदल होणार असा बोलबाला गेली अनेक दिवस आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष पंधरा दिवसांपूर्वी गोव्यात येऊन गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दामू नाईक व इतर काही आमदारांकडून त्यांनी राजकीय स्थितीची माहिती घेतली होती.

दिल्लीहून दोन्ही नेत्यांना आमंत्रण?

गोव्याच्यादृष्टीने दिल्लीत खूप हालचाली सुरू आहेत. स्वतः पंतप्रधानांनी गोव्याच्या मंत्रिमंडळ फेररचना विषयात लक्ष घातले आहे, अशी चर्चा राजकीय गोटात आहे. मंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्लीत संतोषींशी चर्चा केली. कदाचित येत्या आठवड्यात दिल्लीहून मुख्यमंत्री सावंत व विश्वजीत राणे यांना बोलावणे जाईल. एकत्र बसून मंत्रिमंडळ फेररचनेविषयी चर्चा व निर्णय केंद्रीय नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधून आठ आमदार फुटून भाजपात गेले. त्यातील आलेक्स सिक्वेरा यांनाच मंत्रिपद देण्यात आले. परंतु त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. आता विधानसभा अधिवेशन संपल्याने घडामोडींना वेग आलेला आहे. याबाबत दामू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिल्ली भेटीबद्दल माहिती देण्यास नकार दिला.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण