मिरामार येथे वाहतूक समस्या महापौरांनी हात झटकले
By Admin | Updated: May 8, 2014 01:33 IST2014-05-07T20:35:33+5:302014-05-08T01:33:27+5:30
रात्री उशिरा या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने दोनापावलाहून येणार्या म्हणजे एकेरी रस्त्यावरून गाड्या दोनापावलामार्गे काढल्या जातात. नियमाने हा रस्ता वन-वे आहे; पण मिरामार समुद्रावर भेलपुरी खाण्यासाठी जाणार्या खवय्यांना हाच रस्ता जवळचा वाटतो आणि येथूनच गाड्या काढल्या जातात. वाहतूक पोलीस नसल्यास काही पर्यटकही या रस्त्यावरूनच ये-जा करत आहेत. या प्रकारामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिरामार येथे वाहतूक समस्या महापौरांनी हात झटकले
रात्री उशिरा या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने दोनापावलाहून येणार्या म्हणजे एकेरी रस्त्यावरून गाड्या दोनापावलामार्गे काढल्या जातात. नियमाने हा रस्ता वन-वे आहे; पण मिरामार समुद्रावर भेलपुरी खाण्यासाठी जाणार्या खवय्यांना हाच रस्ता जवळचा वाटतो आणि येथूनच गाड्या काढल्या जातात. वाहतूक पोलीस नसल्यास काही पर्यटकही या रस्त्यावरूनच ये-जा करत आहेत. या प्रकारामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या पर्यटन हंगाम असल्याने रेंट अ बाईक, टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स, हॉटेलच्या गाड्या पर्यटकांना घेऊन समुद्रकिनार्यावर येत आहेत. बाईक पार्क करून ठेवण्यासाठी जास्त त्रास होत नाही; पण चारचाकी गाड्यांमुळे पार्किंगची समस्या निर्माण होते. त्यात स्थानिक नागरिकांच्या गाड्या व बस वाहतुकीचा एकच मार्ग असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले.
राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडायला सुरुवात झाली आहे. मिरामार-दोनापावला रस्ता प्रकरण न्यायालयात गेल्याने तेथील बांधकाम स्थगित ठेवण्यात आले आहे. महापौरांनी या प्रकरणातून हात झटकले असून, न्यायालयाला आयुक्तांनीच उत्तर द्यावे, असे स्पष्ट केले आहे.
(फोटो उपेंद्र देणार.