मिरी १000 रु. किलो, मसाला महागला
By Admin | Updated: May 7, 2014 17:57 IST2014-05-06T18:31:13+5:302014-05-07T17:57:23+5:30
राज्यातील बाजारपेठांत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याबरोबरच मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. यंदा गोव्यात तसेच इतर राज्यांत मिरीचे पीक घटल्यामुळे त्याचा फटका बाजारपेठेला बसला आहे.

मिरी १000 रु. किलो, मसाला महागला
मिरची, कोथंबीरच्या दरातही वाढ
पणजी : राज्यातील बाजारपेठांत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याबरोबरच मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे.
यंदा गोव्यात तसेच इतर राज्यांत मिरीचे पीक घटल्यामुळे त्याचा फटका बाजारपेठेला बसला आहे. पणजीतील काही दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी मिरी २०० रुपये किलो होती. दोन महिन्यांपूर्वी तर ६०० रुपये किलो होती; पण सध्या बाजारात मिरीचे दर १ हजार रुपये प्रति किलो झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच पटीने वाढल्याने त्याचा परिणाम मसाल्याच्या दरवाढीवर झाला आहे. याशिवाय बाजारामध्ये मिरची, कोथंबीरच्या दरातही वाढ झाली आहे.
बाजारात भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. टोमॅटो १२ रुपयावरून १६ रुपये किलो झाले आहेत. कांदा १६ रुपयावरून २० रुपये प्रती किलो झाला आहे. वांगी २५ रुपये प्रती किलो, गाजर २५ रुपये प्रती किलो, बटाटे २२ रुपयावरून २६ रुपये प्रति किलो, फुलकोबी १० रुपये प्रती किलो वरून ३० रुपये प्रती किलो. गर्मीमुळे लिंबूचे दर वाढले असून २० रुपयाला ४ ते ५ अशा प्रकारे विकले जात आहेत. भेंडी ३० रुपये प्रती किलो, पापडी ४० रुपये प्रती किलो होती ती आता १०० रुपये प्रती किलो तर आले ६० रुपयावरून १४० रुपये प्रती किलो झाले आहे. लसूण १०० रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. (प्रतिनिधी)
कडधान्य, साखर, तेल, तूप व इतर वस्तूचे दर स्थिर असल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा लाभला आहे.