शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

...अन् 'त्या' एका निर्णयानं पर्रीकरांनी देशाचे 49,300 कोटी रुपये वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 09:37 IST

संरक्षण मंत्री असताना पर्रीकरांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

नवी दिल्ली/पणजी: मनोहर पर्रीकरांच्या निधनामुळे एक सच्चा, नम्र आणि प्रामाणिक राजकारणी हरपल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे. साधेपणा कायम जपणाऱ्या आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या पर्रीकरांच्या निधनामुळे सारा देश हळहळतो आहे. पर्रीकर यांनी देशाचे संरक्षणमंत्रीपद भूषवताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र इतक्या महत्त्वाच्या पदावर असतानाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा, घोटाळ्याचा आरोप झाला नाही. किंबहुना पर्रीकर यांच्या याच गुण वैशिष्ट्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी दिली होती. काही दिवसांपूर्वीच एस-400 च्या खरेदीचं सर्वत्र कौतुक सुरू होतं. कारण एस-400 मिसाईल शिल्डमुळे शत्रूनं केलेला हल्ला हवेतल्या हवेतच हाणून पाडणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारतानं रशियाकडून अशा प्रकारच्या 5 सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना पर्रीकरांनी देशाच्या जनतेचे तब्बल 49,300 कोटी रुपये वाचवले. एस400 च्या खरेदीची, त्यामुळे वाढणाऱ्या भारताच्या सामर्थ्याची भरपूर चर्चा झाली. मात्र हा संपूर्ण करार करताना पर्रीकरांनी जो व्यवहारीपणा दाखवला, त्याची फारशी चर्चा झाली नाही. हवाई हल्ल्याची रणनिती आखताना मुख्यत्वे तीन पल्ल्यांचा विचार होता. दीर्घ, मध्यम आणि लहान टप्प्यानुसार रणनिती आखली जाते. यातील एस-400 सिस्टम दीर्घ पल्ल्यातील यंत्रणा आहे. शत्रूनं डागलेली क्षेपणास्त्रं 380 किलोमीटरवर नष्ट करण्याची क्षमता एस-400 मध्ये आहे. यामुळे शत्रूचा हल्ला खूप आधीच हवेतल्या हवेत परतून लावणं शक्य होणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी इतका मोठा निर्णय घेताना पर्रीकरांनी पुढील काळात देशाकडून होणाऱ्या संरक्षण खरेदी साहित्याच्या योजनेचा पुनर्विचार केला. हवाई दलानं 2027 पर्यंत विविध टप्प्यातील संरक्षण प्रणालींची आखणी केली होती. मात्र एस-400 खरेदीच्या निर्णयामुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या प्रणालींची कितपत आवश्यकता भासणार, हा प्रश्न निर्माण झाला. यानंतर हवाई दलाकडून तांत्रिक अभ्यास करण्यात आला. एस-400 च्या खरेदीमुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण प्रणालींची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं यातून समोर आलं. यासाठी पर्रीकरांनी संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर अनावश्यक असलेल्या लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण प्रणालींची खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्रीकरांच्या या निर्णयानं देशाचे 49,300 कोटी रुपये वाचले.  

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरDefenceसंरक्षण विभागindian air forceभारतीय हवाई दल