शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'त्या' एका निर्णयानं पर्रीकरांनी देशाचे 49,300 कोटी रुपये वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 09:37 IST

संरक्षण मंत्री असताना पर्रीकरांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

नवी दिल्ली/पणजी: मनोहर पर्रीकरांच्या निधनामुळे एक सच्चा, नम्र आणि प्रामाणिक राजकारणी हरपल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे. साधेपणा कायम जपणाऱ्या आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या पर्रीकरांच्या निधनामुळे सारा देश हळहळतो आहे. पर्रीकर यांनी देशाचे संरक्षणमंत्रीपद भूषवताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र इतक्या महत्त्वाच्या पदावर असतानाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा, घोटाळ्याचा आरोप झाला नाही. किंबहुना पर्रीकर यांच्या याच गुण वैशिष्ट्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी दिली होती. काही दिवसांपूर्वीच एस-400 च्या खरेदीचं सर्वत्र कौतुक सुरू होतं. कारण एस-400 मिसाईल शिल्डमुळे शत्रूनं केलेला हल्ला हवेतल्या हवेतच हाणून पाडणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारतानं रशियाकडून अशा प्रकारच्या 5 सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना पर्रीकरांनी देशाच्या जनतेचे तब्बल 49,300 कोटी रुपये वाचवले. एस400 च्या खरेदीची, त्यामुळे वाढणाऱ्या भारताच्या सामर्थ्याची भरपूर चर्चा झाली. मात्र हा संपूर्ण करार करताना पर्रीकरांनी जो व्यवहारीपणा दाखवला, त्याची फारशी चर्चा झाली नाही. हवाई हल्ल्याची रणनिती आखताना मुख्यत्वे तीन पल्ल्यांचा विचार होता. दीर्घ, मध्यम आणि लहान टप्प्यानुसार रणनिती आखली जाते. यातील एस-400 सिस्टम दीर्घ पल्ल्यातील यंत्रणा आहे. शत्रूनं डागलेली क्षेपणास्त्रं 380 किलोमीटरवर नष्ट करण्याची क्षमता एस-400 मध्ये आहे. यामुळे शत्रूचा हल्ला खूप आधीच हवेतल्या हवेत परतून लावणं शक्य होणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी इतका मोठा निर्णय घेताना पर्रीकरांनी पुढील काळात देशाकडून होणाऱ्या संरक्षण खरेदी साहित्याच्या योजनेचा पुनर्विचार केला. हवाई दलानं 2027 पर्यंत विविध टप्प्यातील संरक्षण प्रणालींची आखणी केली होती. मात्र एस-400 खरेदीच्या निर्णयामुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या प्रणालींची कितपत आवश्यकता भासणार, हा प्रश्न निर्माण झाला. यानंतर हवाई दलाकडून तांत्रिक अभ्यास करण्यात आला. एस-400 च्या खरेदीमुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण प्रणालींची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं यातून समोर आलं. यासाठी पर्रीकरांनी संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर अनावश्यक असलेल्या लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण प्रणालींची खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्रीकरांच्या या निर्णयानं देशाचे 49,300 कोटी रुपये वाचले.  

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरDefenceसंरक्षण विभागindian air forceभारतीय हवाई दल