शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

मनोहर पर्रीकर सरकारने दुखवले ग्रामसभांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 12:59 IST

एरव्ही तळागाळातील लोकांच्या सबलीकरणाची भाषा बोलणा-या गोवा सरकारने गोवा पंचायत राज कायद्यानुसार स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना आणि ग्रामसभांना कमी लेखण्याचा प्रयत्न नुकताच केल्यामुळे ग्रामसभा दुखावल्या गेल्या आहेत.

पणजी : एरव्ही तळागाळातील लोकांच्या सबलीकरणाची भाषा बोलणा-या गोवा सरकारने गोवा पंचायत राज कायद्यानुसार स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना आणि ग्रामसभांना कमी लेखण्याचा प्रयत्न नुकताच केल्यामुळे ग्रामसभा दुखावल्या गेल्या आहेत. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर या दोन्ही नेत्यांनी केलेल्या विधानांबाबत काही पंचायती, सरपंच तसेच ग्रामसभा आणि विरोधीपक्ष तिखट प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.

राज्यातील नद्यांचे कथित राष्ट्रीयीकरण व कोळसा हाताळणी याविरुद्ध गोव्यात चळवळ सुरू आहे. गोवा अगेन्स्ट कोल या एनजीओकडून या चळवळीचे नेतृत्व केले जात आहे. एनजीओने केलेल्या लोकप्रबोधनानंतर किनारी भागांतील अनेक पंचायतींनी नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ग्रामसभांमध्ये ठराव घेतले. मांडवी, जुवारी, शापोरा आदी नद्यांचे आम्हाला राष्ट्रीयीकरण झालेले नको आहे, अशी भूमिका ग्रामसभांमध्ये मांडून तसे ठराव संमत करण्यास पंचायत सचिव व सरपंचांना भाग पाडले गेले.

यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर व पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी मिळून भाजपाच्या ताब्यातील सर्व पंचायतींचे सरपंच, पंच, नगरसेवक यांची बैठक घेतली व नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करू नये, असे आवाहन केले. मुळात नद्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले नाही तर नद्यांना राष्ट्रीय महत्त्व दिले गेले आहे व त्यामुळे नद्यांची मालकी गोवा सरकारकडेच राहील, असे विधान पर्रीकर यांनी केले. ग्रामसभांमध्ये घेतले गेलेले ठराव अर्थहीन ठरतात, रद्दबातल ठरतात अशी विधाने पंचायत मंत्री गुदिन्हो व मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केले. यामुळे विरोधी काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष आणि काही एनजीओंनी तसेच काही पंचायतींनी सरकारवर टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना व ग्रामसभांना सरकार सोयीनुसार आता खूप कमी लेखत आहे, अशी टीका आपने केली आहे. 

त्यानंतर सरकारच्या पंचायत खात्याने नुकतेच एक परिपत्रक जारी केले व ग्रामसभांनी कार्यक्रम पत्रिकेवर असलेले विषय वगळता ग्रामसभांमध्ये अन्य विषय चर्चेसाठी घेऊ नयेत, अशी सूचना केली. यावरही एनजीओंनी टीका केली आहे. पंचायतींचा व ग्रामसभांचा आवाज सरकार दडपून टाकू पाहत आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे.  मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की पंचायत क्षेत्रांमध्ये हजारो लोकसंख्या असते पण ग्रामसभांमध्ये केवळ 30-40 लोकं उपस्थित राहतात. हे 30-40 लोक पूर्ण पंचायत क्षेत्राचे भवितव्य ठरवू शकत नाहीत.

पंचायत मंत्री गुदिन्हो म्हणाले, की आपण ग्रामसभांना कमी लेखलेले नाही. तथापि, जे ठराव मांडले गेले, ते ठराव सदोष आहेत. काँग्रेसने अगोदर आपले वक्तव्य नीट समजून घ्यावे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपा