शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मनोहर पर्रीकर सरकारने दुखवले ग्रामसभांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 12:59 IST

एरव्ही तळागाळातील लोकांच्या सबलीकरणाची भाषा बोलणा-या गोवा सरकारने गोवा पंचायत राज कायद्यानुसार स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना आणि ग्रामसभांना कमी लेखण्याचा प्रयत्न नुकताच केल्यामुळे ग्रामसभा दुखावल्या गेल्या आहेत.

पणजी : एरव्ही तळागाळातील लोकांच्या सबलीकरणाची भाषा बोलणा-या गोवा सरकारने गोवा पंचायत राज कायद्यानुसार स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना आणि ग्रामसभांना कमी लेखण्याचा प्रयत्न नुकताच केल्यामुळे ग्रामसभा दुखावल्या गेल्या आहेत. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर या दोन्ही नेत्यांनी केलेल्या विधानांबाबत काही पंचायती, सरपंच तसेच ग्रामसभा आणि विरोधीपक्ष तिखट प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.

राज्यातील नद्यांचे कथित राष्ट्रीयीकरण व कोळसा हाताळणी याविरुद्ध गोव्यात चळवळ सुरू आहे. गोवा अगेन्स्ट कोल या एनजीओकडून या चळवळीचे नेतृत्व केले जात आहे. एनजीओने केलेल्या लोकप्रबोधनानंतर किनारी भागांतील अनेक पंचायतींनी नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ग्रामसभांमध्ये ठराव घेतले. मांडवी, जुवारी, शापोरा आदी नद्यांचे आम्हाला राष्ट्रीयीकरण झालेले नको आहे, अशी भूमिका ग्रामसभांमध्ये मांडून तसे ठराव संमत करण्यास पंचायत सचिव व सरपंचांना भाग पाडले गेले.

यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर व पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी मिळून भाजपाच्या ताब्यातील सर्व पंचायतींचे सरपंच, पंच, नगरसेवक यांची बैठक घेतली व नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करू नये, असे आवाहन केले. मुळात नद्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले नाही तर नद्यांना राष्ट्रीय महत्त्व दिले गेले आहे व त्यामुळे नद्यांची मालकी गोवा सरकारकडेच राहील, असे विधान पर्रीकर यांनी केले. ग्रामसभांमध्ये घेतले गेलेले ठराव अर्थहीन ठरतात, रद्दबातल ठरतात अशी विधाने पंचायत मंत्री गुदिन्हो व मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केले. यामुळे विरोधी काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष आणि काही एनजीओंनी तसेच काही पंचायतींनी सरकारवर टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना व ग्रामसभांना सरकार सोयीनुसार आता खूप कमी लेखत आहे, अशी टीका आपने केली आहे. 

त्यानंतर सरकारच्या पंचायत खात्याने नुकतेच एक परिपत्रक जारी केले व ग्रामसभांनी कार्यक्रम पत्रिकेवर असलेले विषय वगळता ग्रामसभांमध्ये अन्य विषय चर्चेसाठी घेऊ नयेत, अशी सूचना केली. यावरही एनजीओंनी टीका केली आहे. पंचायतींचा व ग्रामसभांचा आवाज सरकार दडपून टाकू पाहत आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे.  मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की पंचायत क्षेत्रांमध्ये हजारो लोकसंख्या असते पण ग्रामसभांमध्ये केवळ 30-40 लोकं उपस्थित राहतात. हे 30-40 लोक पूर्ण पंचायत क्षेत्राचे भवितव्य ठरवू शकत नाहीत.

पंचायत मंत्री गुदिन्हो म्हणाले, की आपण ग्रामसभांना कमी लेखलेले नाही. तथापि, जे ठराव मांडले गेले, ते ठराव सदोष आहेत. काँग्रेसने अगोदर आपले वक्तव्य नीट समजून घ्यावे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपा