शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

आजारी पर्रीकरांनी 7 दिवसात पर्यायी व्यवस्था न केल्यास बेमुदत उपोषण, राजन घाटेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 1:32 PM

गंभीर आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात दिवसांच्या आत पर्याय व्यवस्था करावी, अन्यथा येत्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिला आहे.

पणजी :  गंभीर आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात दिवसांच्या आत पर्याय व्यवस्था करावी, अन्यथा येत्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत गोवा सिटीझन फोरमतर्फे बोलताना घाटे म्हणाले की,  'गेले आठ महिने पर्रीकरांच्याआजारपणामुळे प्रशासन ठप्प झाले आहे. त्यांनी आपल्याकडील 32 खाती अन्य मंत्र्याकडे देण्याची गरज आहे. तसेच अधिकारही बहाल करण्याची गरज आहे. गंभीर आजारातून त्यांना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो. परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीने प्रशासन कोलमडले आहे ते पाहता आंदोलनाशिवाय पर्याय नाही' 

घाटे पुढे म्हणाले की, 'सरकार दरबारी लोकांची कोणतीही कामे होत नाहीत. खाणबंदीचा प्रश्‍न सुटलेला नाही. हे सरकार बेरोजगारांना नोकरी देऊ शकलेले नाही. प्रशासन अक्षरश: कोलमडले असून कोणाचा पायपोस कोणाला नाही. त्यामुळे पर्रीकर यांनी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. गेल्या आठ महिन्यात पर्रीकर अमेरिकेला तसेच दिल्लीला उपचार घेऊन आले. तेथून राज्यकारभार चालवला.आता ताळगावच्या खासगी निवासस्थानाहून ते कारभार हाकत आहेत.

परंतु प्रशासनात कोणतेही काम होत नाही. लोकांमध्ये यामुळे नाराजीची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून कारभार हाकायचा असतो, स्वतःच्या खासगी निवासस्थानामधून नव्हे. पर्रीकर यांना आजारपणामुळे विश्रांतीची गरज आहे. त्यांनी आपल्याकडील कारभार इतर एखाद्या मंत्र्याकडे सोपविण्याची गरज आहे. तसेच खातेवाटपही करण्याची गरज आहे.'

घाटे म्हणाले की ' या आधीही आपल्याला उपोषणासारखे आंदोलन करावे लागले आहे. 16 जुलै 2013 रोजी माहिती आयोग स्थापन करण्यासाठी मी बेमुदत उपोषण पुकारले ते सात दिवस चालले. 7 दिवसांनी तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आयोग स्थापन करण्याचे आश्वासन देऊन मला उपोषण मागे घेण्यास सांगितले. गंभीर आजारी असलेले पर्रीकर मुख्यमंत्रिपदाला न्याय देऊ शकत नाहीत. आम्हाला राजेशाही नको, लोकशाही पद्धतीने सरकार चालवा.' 

आपल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला बिगर शासकीय संघटना,  समविचारी राजकीय पक्ष कामगार, शेतकरी यांनीही पाठिंबा द्यावा असे आवाहन घाटे यांनी केले आहे. दरम्यान, 'नारी अधिकार' या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दिया शेटकर यांनी राज्यात बेकारी प्रचंड वाढल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, 'एकही नवी नोकरी गेल्या वर्षभरात निर्माण झालेली नाही. त्याआधी भाजपा नेत्यांनी नोकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात लाच घेऊन आपला प्रताप दाखवला आहे असा आरोपही  त्यांनी केला त्या म्हणाल्या की वीजमंत्री निलेश काब्राल यांनी  पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळात 10 ते 15 वर्षांसाठी कंत्राटी भरती केली आहे. या जागी कायमस्वरूपी भरती करता आली असती. सरकारचे याकडेच लक्ष नाही. गोवा आज कसिनोंच्या रूपाने जुगारी अड्डा बनला आहे, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताBJPभाजपा