शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

महायुतीस कॉँग्रेस अनुकूल

By admin | Updated: November 15, 2015 01:41 IST

मडगाव : कॉँग्रेस पक्ष महायुतीच्या विरोधात नाही; मात्र गोवा प्रदेश कॉँग्रेस भाजपशी संधान बांधलेल्या व भाजपची बी टीम

मडगाव : कॉँग्रेस पक्ष महायुतीच्या विरोधात नाही; मात्र गोवा प्रदेश कॉँग्रेस भाजपशी संधान बांधलेल्या व भाजपची बी टीम असलेल्या पक्षांशी तसेच अपक्षांशी महायुती करणार नाही. कॉँग्रेस गोव्यातील धर्मनिरपेक्ष लोकांशी महायुती करून येणाऱ्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देण्यास सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन गोवा प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी येथे केले. येथे कॉँग्रेसने आयोजिलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात सहिष्णुतेची शपथ या सभेत घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन, रवी नाईक, प्रतापसिंग राणे व दिगंबर कामत हे कॉँग्रेसचे पाच माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच खासदार शांताराम नाईक, आमदार चंद्रकांत कवळेकर, पांडुरंग मडकईकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी आमदार फिलीप नेरी रॉड्रिगीस, मोती देसाई, सुभाष फळदेसाई आदी मान्यवरही उपस्थित होते. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष किमान पन्नास टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. निवडणुकीत उतरण्यास तयार असलेल्यांनी लोकसंपर्क साधून आपली शक्ती सिद्ध करावी, असे फालेरो यांनी सांगितले. जुन्याजाणत्यांनी पक्षात नवी जान फुंकण्यास मदत करावी, असे फालेरो म्हणाले. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आपल्याकडे जादूची छडी नाही; मात्र सर्वांनी एकत्रित काम केल्यास भाजपची मक्तेदारी आपण सहज तोडू शकतो. गोव्यात व भारतात असहिष्णुता वाढीस लागण्यास भाजपचे सरकार जबाबदार आहे. परदेशात जाऊन महात्मा गांधींच्या शांतीचा उपदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात मात्र मौनव्रत घेऊन बसल्याची टीका फालेरो यांनी केली. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे खाण उद्योगात असलेल्या सुमारे नव्वद हजार लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. भाजपने राज्यातील लोकांची फसवणूक केलेली आहे. या राज्यातील प्रत्येक माणसावर सुमारे एक लाखाचे कर्ज काढून भाजप राज्य चालवीत असल्याची टीका फालेरो यांनी केली. गोव्याची व देशाची आर्थिक स्थिती दयनीय झालेली असून देशाला व राज्याला वाचविण्यासाठी मतदारांनी आपल्या चुकीची दुरुस्ती करून कॉँग्रेसला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन फालेरो यांनी केले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे म्हणाले की रात्र वैऱ्याची आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन खोटारडेपणाने सत्ता हासील केलेल्यांना हरविण्याची वेळ आलेली आहे. लोकपाल, लोकायुक्तसाठी छाती पिटणारे आता गप्प का? भाजप सरकारने कुंभकर्णाची झोप घेतलेली असून दक्षिण गोव्यातील लोकहितार्थ आपण सुरू केलेले जिल्हा इस्पितळ प्रकल्प, कदंब वाहतूक प्लाझा व गैरपारंपरिक ऊर्जा प्लाझा सारखे प्रकल्प भाजप सरकारने शीतपेटीत टाकल्याचा आरोप मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केला. गोमंतकीयांमधे असलेली ठिणगी पेटविण्याची वेळ आलेली आहे. लोकविरोधी सरकारला घरी पाठविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यावा, असे आवाहन कामत यांनी केले. या वेळी बाबू आजगावकर व इतरांचीही भाषणे झाली. कॉँग्रेस पक्षाने असहिष्णुतेच्या विरोधात शपथ घेतली. विकासाच्या विरोधात असलेल्या असहिष्णुतेच्या विरोधात लढा देण्याची व गोव्याच्या संस्कृतीच्या व मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देण्याची शपथ या वेळी घेण्यात आली. (प्रतिनिधी)