शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

सिंधुदुर्गात औद्योगिक गुंतवणुकीसाठी गोव्याच्या कारखानदारांना साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 14:34 IST

गोव्यातील कारखानदारांनी सिंधुदुर्गात गुंतवणूक करावी यासाठी काही सवलती देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे.

पणजी : गोव्यातील कारखानदारांनी सिंधुदुर्गात गुंतवणूक करावी यासाठी काही सवलती देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे. सीमेवरील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीत गोव्यातील उद्योजकांनी निदान विस्तार विभाग तरी उघडावेत, अशी शेजारी राज्याची अपेक्षा आहे. 

येथील मांडवी हॉटेलमध्ये नुकत्याच महाराष्ट्र, गोवा गुंतवणूकदारांच्या परिषदेत या विषयावर चर्चा झाली. गुंतवणूकदारांना राज्य जीएसटीचा १00 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सावंतवाडीचे आमदार तथा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, ‘ गोव्याच्या कारखान्यांमध्ये सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात लोक कामाला येतात. त्यांना त्यांच्या गावातच जर नोकऱ्यांची सोय उपलब्ध झाली तर ते सोन्याहून पिवळे ठरेल त्यासाठी महाराष्ट्र सरकार आवश्यत त्या सवलती देण्यास तयार आहे. राज्य जीएसटीच्या बाबतीत तर पूर्ण सवलत दिली जाईल. गोव्यातील कारखानदारांनी आडाळी येथे येऊ घातलेल्या औद्योगिक वसाहतीत किंवा कुडाळ अथवा सिंधुदुर्गातील अन्य औद्योगिक वसाहतींमध्ये निदान मूळ कारखान्याचे विस्तार विभाग तरी सुरु करावेत. प्रदूषण न करणारे उद्योग सिंधुदुर्गात यावेत एवढीच अपेक्षा आहे.’

या परिषदेत आडाळी औद्योगिक वसाहतीच्या वैशिष्ट्यांबरोबरच उद्योग विभागाशी संबंधित सर्व धोरणांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. दरम्यान, गोव्यातील औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांमध्ये शेजारी सिंधुदुर्ग, कारवारमधून नोकरीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. करासवाडा, म्हापसा, डिचोली, थिवी, वेर्णा औद्योगिक वसाहतींमध्ये सिंधुदुर्गातील लोक काम करतात. 

                                 ‘फॅब्रिकेशन, इलेक्ट्रॉनिक सुटे भाग जुळवणी करणारे युनिट उघडणे शक्य’गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष तथा गोव्यातील उद्योजक मांगिरीश पै रायकर म्हणाले की, ‘फार्मास्युटिकल कारखाने सिंधुदुर्गात चालवणे शक्य नाही. कारण तेथे आवश्यक ते कुशल मनुष्यबळ मिळू शकणार नाही. फॅब्रिकेशन युनिट, इलेक्ट्रॉनिक सुटे भाग जुळवणी करणारे युनिट तेथे येऊ शकतात. सिंधुदुर्ग तसेच त्याही पुढे रत्नागिरी तसेच अन्य भागात गोव्यातील कारखानदार माल पाठवतात. त्यांना वाहतुकीच्यादृष्टीने अंतर वाचविण्यासाठी सिंधुदुर्गात कारखाने किंवा विस्तार विभाग थाटण्याचा विचार करता येईल.’

सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात गोव्याच्या कारखान्यांमध्ये लोक नोकरीला येतात, याला रायकर यांनीही दुजोरा दिला. प्राप्त माहितीनुसार सावंतवाडी, वेंगुर्ले आदी भागातून गोव्याच्या कारखान्यांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्यांची विशेष व्यवस्थाही आहे. वेंगुर्ले येथून पहाटे ६.३0 वाजता खास म्हापशापर्यंत बस आहे. तसेच परतीच्या प्रवासाकरिता सायंकाळी ५.३0 वाजता एसटी बसची व्यवस्था आहे. नियमित कामाला येणाऱ्या पासधारकांची या बससाठी गर्दी असते.

 

 

टॅग्स :goaगोवाsindhudurgसिंधुदुर्ग