शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लागली आनंद नाईक यांना लॉटरी; नगराध्यक्षपदासाठी चिठ्ठीने उमेदवार निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2024 09:43 IST

आज भरणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : येथील नगरपालिकेसाठी नवे नगराध्यक्ष निवडीची तारीख जवळ येताच, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यासाठी बुधवारी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची लॉटरी खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या चिठ्ठीतून रवी नाईक यांच्या गटातील आनंद नाईक यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.

वीरेंद्र ढवळीकर व आनंद नाईक यांच्यापैकी कोणीच मागे हटायला तयार नसल्याने अखेर दोघांच्या नावांच्या चिठ्ठया काढण्यात आल्या. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चिट्ठी काढली व आनंद नाईक यांना उमेदवारीची लॉटरी लागली. आता रायझिंग फोंडाचे केतन भाटीकर आता नेमकी कोणती भूमिका घेतात यावर नगराध्यक्ष निवड बिनविरोध की निवडणूक होणार, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.

अलिखित करारानुसार नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. स्थानिक भाजपच्या गटातून मिळालेल्या माहितीनुसार, रितेश यांच्यानंतर वीरेंद्र ढवळीकर यांचे नाव नगराध्यक्ष म्हणून चर्चेत होते. ते बिनविरोध निवडून येतील, असे वाटत असताना अचानक रवी नाईक यांच्या गटातून आनंद नाईक यांचे नाव पुढे आले.

पालिकेत सध्या मूळ भाजपचे असे चार नगरसेवक आहेत तर रवी नाईक यांच्या गटातील सहा नगरसेवक आहेत. नाईक भाजपात असल्याने दहा नगरसेवक भाजपचेच आहेत. तरीही प्रत्येकाची राजकीय महत्त्वाकांक्षा वेगवेगळी आहे. केतन भाटीकर यांच्या रायझिंग फोंडा गटाकडे पाच नगरसेवक असले तरी त्यांच्या गटातील एका नगरसेवकाची सध्याची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. नगरसेवक शिवानंद सावंत हल्ली भाटीकर यांच्याबरोबर कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता आहे. वीरेंद्र ढवळीकर यांना उमेदवारी न मिळाल्याने मूळ भाजपमधील काहीजण नाराज असतील. कारण रितेश यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपमध्येच दुफळी माजली होती.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार की नाही हे शेवटच्या क्षणी स्पष्ट करू अशी भूमिका केतन भाटीकर यांनी घेतली आहे. याचाच अर्थ गुरुवारी अर्ज भरताना त्यांच्या गटातून एखादा अर्ज आला तर निवडणूक होईल. निवडणूक झाल्यास शिवानंद सावंत नेमके कोणत्या गटात आहेत, हे सुद्धा स्पष्ट होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ भाजपचा गट वीरेंद्र ढवळीकर यांच्या नावावर ठाम होते, परंतु कृषीमंत्री रवी नाईक यांनी मात्र शेवटपर्यंत आनंद नाईक यांच्याच नावाचा आग्रह धरला. सध्या उपनगराध्यक्षपद मूळ भाजपकडे आहे. तूर्तास दीपा कोलवेकर यांचे हे पद हे शाबूत राहील अशी शक्यता आहे. शुक्रवारी जर निवडणूक झालीच तर प्रत्येक नगरसेवकाला महत्त्व प्राप्त होईल. अशावेळी भाटीकर यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांचे महत्त्व वाढेल.

...तर निवडणूक होईल चुरशींची

भाटीकर हे जरी मगोचे असले तरी नगरपालिकेत ते स्वतंत्रपणे राजकारण करत आहेत. रवी नाईक व त्यांच्या गटातील नगरसेवकांशी त्यांचे खास पटत नसल्याच्याही चर्चा आहेत. अशा परिस्थितीत आनंद नाईक यांचे नाव निश्चित झाले. त्यामुळे मगो सोडून भाजपमध्ये आलेल्या वीरेंद्र ढवळीकर यांना कदाचित पश्चाताप होत असेल. केतन भाटीकर यांनी जर त्यांचे उद्या वीरेंद्र यांची समजूत काढली व त्यांनाच उमेदवारी दिली तर एक राजकीय भूकंप होईल हे निश्चित. वीरेंद्र ढवळीकर यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज भरला, तर निकाल कोणाच्याही बाजूने लागू शकतो. नगरपालिकेत यापूर्वी अशी प्रकरणे घडलेली आहेत.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण