शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

लोकसभा निवडणूक: विजयच्या भूमिकेविषयी उत्सुकता, कोणाला पाठिंबा हे गुलदस्त्यातच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 08:25 IST

सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येत्या लोकसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता आहे. गोवा फॉरवर्ड लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, तसेच 'इंडिया' आघाडीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णयही आपण अजून घेतलेला नाही, असे सरदेसाई यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, त्यांचा कल काँग्रेसपासून दूर राहण्याकडेच असल्याचा संदेश लोकांपर्यंत जात असल्याने या पार्श्वभूमीवर 'लोकमत'च्या या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, काँग्रेसपासून अंतर ठेवण्याचा प्रश्नच नाही. विरोधकांच्या 'इंडिया' युतीकडून आमच्याकडे अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. राजकारणात आजची स्थिती उद्या बदलू शकते.

लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवून प्रादेशिक पक्षांनी दिवे लावले, असे याआधी घडलेले नाही. शिवाय लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीसाठी तेवढा निधीही छोट्या पक्षांकडे नसतो. काही प्रादेशिक पक्ष याला अपवाद आहेत हा भाग वेगळा; परंतु गोवा फॉरवर्ड काही लोकसभा लढवणार नसल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. 

मध्यंतरी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आरजीला काँग्रेससोबत घेण्याच्या ज्या हालचाली केल्या त्यावरही सरदेसाई नाराज आहेत. काँग्रेसमध्ये विजयचे दक्षिणेतील तिकिटोच्छुक विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन किंवा एल्विस गोम्स, तसेच गिरीश चोडणकर यांच्याशीही पटत नाही. दुसरीकडे मडगावला झालेल्या 'अयोध्या अभियान'मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसला, अभियानच्या तयारीत ते आघाडीवर होते. अलीकडे मुख्यमंत्र्यांवर कडक टीका करण्याच्या भानगडीतही ते पडत नाहीत.

भाजपला वाटते की, विजय हे येत्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी भाजपला मदत करतील, तर काँग्रेसला असे वाटते की, भाजपसोबत जाणे विजय यांना परवडणारे नाही. सरदेसाई निवडणुकीच्या अखेरच्या क्षणी काय भूमिका घेतील, हे उत्कंठेचे ठरले आहे.

काँग्रेसपासून दोन हात लांब

पर्रीकरांच्या निधनानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनले व जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या दहा आमदारांना फोडून सरदेसाई व फॉरवर्डच्या तत्कालीन अन्य दोन मंत्र्यांना डिच्चू देण्यात आला. सरदेसाई हे नंतर काँग्रेसशी संधान बांधतील, अशी अटकळ होती; परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना अटकाव केला. फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीत जागा वाटपात फातोड्र्याची केवळ एक जागा गोवा फॉरवर्डला दिली. काँग्रेसने ज्या पद्धतीने कारभार चालवला आहे आणि ज्या प्रकारे त्यांचे आठ आमदार फुटले हे पाहता काँग्रेससोबत इंडिया आघाडीत जाण्यास तेवढे अनुकूल नसल्याचेही त्यांच्या काही विधानांवरून जाणवते. 

टॅग्स :goaगोवा