शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

घरे कायदेशीर कराच; सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:04 IST

राज्यातील सुमारे एक लाख बेकायदा घरे कायदेशीर करून देण्याचा संकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.

राज्यातील सुमारे एक लाख बेकायदा घरे कायदेशीर करून देण्याचा संकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. १९७२ साली गोव्यात जमिनींचा सर्व्हे झाला होता. ७२ सालापूर्वी उभारण्यात आलेली आणि सर्व्हे प्लानमध्ये दाखविली गेलेली घरे कायदेशीर करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. वास्तविक ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासन कशा प्रकारे करते, ते पाहणे खूप महत्त्वाचे ठरेल. घोषणा अनेक होत असतात. राज्यकर्ते अनेक वचने देतात. मात्र नोकरशाही तांत्रिक खुस्पटेच काढत असते. अनेक अधिकारी हे फाइल्सचा फुटबॉल करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखादा मामलेदार किंवा उपजिल्हाधिकारी रजेवर गेला किंवा एखादा हेडक्लार्क रुसून बसला तर फाइल लवकर निकाली निघतच नाही. लोकांचे अर्जदेखील गहाळ होतात. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी कसोटी लागणार आहे. 

घरे कायदेशीर करण्याच्या नावाखाली सरकार आणखी कोणते पराक्रम करून ठेवते, ते देखील पहावे लागेल. गोव्यात जमिनींच्या मालकी हक्कांच्या खूप कटकटी आहेत. भाटकार, मुंडकार, कूळ किंवा कोमुनिदाद संस्था यांच्याशी निगडित अनेक तंटे आहेत. गुंतागुंतीचे विषय पूर्वीच सोडविले जायला हवे होते. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी व सरकारांनी जमिनींचा व घरांचा मालकीहक्क व त्याच्याशी संबंधित प्रश्न सोडवायला हवा होता. काँग्रेस सरकारच्या काळात राणे सरकारनेही प्रश्न सोडवला नाही आणि त्यानंतर पर्रीकर सरकारलाही हा विषय हाताळता आला नाही. आता न्यायालयच बेकायदा बांधकामांच्या विरोधात उभे ठाकले आहे. अतिक्रमणे वाढल्याने ती मोडण्याचे आदेश विविध स्तरांवरील न्यायालयांकडून येऊ लागले आहेत. मात्र यात गरीब व मध्यमवर्गीय माणूस भरडला जातो.

मुख्यमंत्री सावंत यांनी लोकांना घरे कायदेशीर करून देण्याची दिलेली ग्वाही ऐतिहासिक आहे. या कामात मुख्यमंत्र्यांना यश आले व पन्नास हजार घरे जरी कायदेशीर झाली, तरी इतिहासात त्यांचे नाव कायम राहील. न्यायालयाने कारवाई करायला सांगितले तरी पन्नास हजार किंवा एक लाख घरे पाडता येणार नाहीत, तसे झाले तर हाहाकार उडेल असे सरकारला वाटते. बहुतेक मंत्री, आमदारही धास्तावले आहेत. कारण २०२७साली विधानसभा निवडणूक आहे. अगोदरच सरकारी नोकऱ्यांच्या विषयावरून सगळीकडे ओरड आहे. 

२०१२ साली खनिज खाणी बंद झाल्यानंतर तो धंदा हवा तसा नव्याने उभा राहिलेला नाही. बेरोजगारी वाढतेय. अशावेळी लाखभर घरे बेकायदा ठरवून पाडली तर कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. गरीब व मध्यमवर्गीयांनी मग जायचे कुठे? मुळात यापुढे एकही बेकायदा बांधकाम उभे राहू नये म्हणून सरकारला काळजी घ्यावी लागेल. आता घरे कायदेशीर करून देण्यासाठी तसेच लोकांना सनदा वगैरे देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला उत्साह नोंद घेण्यासारखा आहे. मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगलाच आहे. फक्त काही कामचुकार तर काही आपमतलबी सरकारी अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांना दबाव ठेवावा लागेल. घर कायदेशीर व्हावे म्हणून लोकांचे अर्ज आल्यानंतर लगेच त्यावर प्रक्रिया होतेय की नाही हे पहावे लागेल. मुख्यमंत्री जर सातत्याने प्रशासनाच्या मागे लागले तरच ते काम होऊ शकेल. धनिकांचीच मोठमोठी बांधकामे कायदेशीर झाली व गरिबांची घरे मात्र तशीच बेकायदा राहिली असेदेखील घडू नये. 

अनेकदा ग्रामपंचायती, पालिका संस्था वगैरे लोकांना पिळतात. स्वतःचे घर बांधण्यासाठी पुढे आलेल्या माणसाला परवानेच लवकर दिले जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात तरी लोक कुणाला न विचारताच घर बांधून टाकतात. कृषी जमिनीचे बिगर शेत जमिनीत रूपांतरही झालेले नसते. पंचायती घर क्रमांक देतात, लाइट, पाणी कनेक्शन मिळते, त्यामुळे लोक बिचारे घरांचा विस्तार करत राहिले. रस्त्यांना टेकून ही घरे उभी राहिली. त्यावेळी वाहतूक कमी होती. वाहनांची संख्या कमी होती. लोकांची अनधिकृत घरे कायदेशीर होत असतील, तर कुणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. घर कायदेशीर झाले म्हणजे ते आपल्या मालकीचे झाले असे लोकांना समजता येईल काय? घरांच्या मालकीहक्काचा प्रश्न कायम राहू नये. तोदेखील निकालात निघावाच.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत