शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

नेतृत्वहीन कॉंग्रेस आहे, सरकार नव्हे, भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 22:15 IST

गोव्यातील सरकार नेतृत्वहीन झाले नाही तर गोव्यात कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी केला. त्यामुळेच हा पक्ष अद्याप आपला अध्यक्ष निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. 

पणजी - गोव्यातील सरकार नेतृत्वहीन झाले नाही तर गोव्यात कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी केला. त्यामुळेच हा पक्ष अद्याप आपला अध्यक्ष निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काब्राल यांनी कॉंग्रेसचे राज्यपालांना दिलेले निवेदन म्हणजे फसलेला स्टंट असल्याचे सांगितले. सरकार अस्तित्वात नसल्याचा आरोप करणारा कॉंग्रेस नेते आता सरकार नेतृत्वहीन असल्याचे सांगतात. गोव्याचे सरकार नेतृत्वहीन नाही. मुख्यमंत्री आरोग्याच्या कारणास्तव विदेशात उपचार घेत असले तरी त्यांनी नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीद्वारे राज्यकारभार सुरू आहे. या उलट कॉंग्रेसची स्थिती झालेली आहे. ते गोव्यात प्रदेशाध्यक्ष ठरवू शकत नाहीत आणि आरोप मात्र सरकारवर करतात असे काब्राल यांनी सांगितले. तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीला घटनात्मक आधार नसल्याचा शांताराम नाईक यांचा दावाही त्यांनी फेटाळला. विधानसभा अधिवेशनाच्या मुद्यावर बोलताना काब्राल म्हणाले की आता अधिवेशन जुनमध्ये घेतले जाईल. त्यापूर्वी अधिवेशनाची गरज नाही. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी ७ दिवसांपूर्वीच आपण बोललो होतो. त्यांची प्रकृती सुधारत आहे. उपचारांना ते दाद देत आहेत. गोव्यात येण्या एवढी त्यांची परिस्थिती सुधारल्यानंतर ते गोव्यात परततील असेही ते म्हणाले.  माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. खाण बंदीमुळे लोकांचा रोजगार जात आहे. कंपन्याकडून कामगारांना काढणे थांबवावे. आणखी काही काळ धीर धरावा. खाण उद्योग सुरू होण्याच्या बाबतीत खूप आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस