शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

शेतजमिनी सुरक्षित ठेवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन, पर्यावरण रक्षणासाठी संघटित व्हावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:37 IST

पर्यावरण रक्षणासाठी सरकार आणि जनतेने एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भावी पिढ्यांसाठी राज्यातील सखल भाग, कृषी क्षेत्रे, नो डेव्हलपमेंट झोन संरक्षित करण्यावर भर दिला. पर्यावरण रक्षणासाठी सरकार आणि जनतेने एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

शनिवारी संध्याकाळी डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव येथील बहुउद्देशीय आपत्ती व्यवस्थापन चक्रिवादळ निवारा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सांगितले की, आपण गोमंतकीयांनी आपले सखल भाग, कृषी क्षेत्रे आणि नो डेव्हलपमेंट झोन नष्ट होण्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.

हवामान बदलामुळे देशाच्या किनारपट्टीवरील भाग चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींनी प्रभावित होत आहेत. ही मानवनिर्मित आपत्ती आहे. "मला वाटते की अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनता आणि सरकारने एकत्र आले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.

८५ कोटी खर्चुन ११ निवारा केंद्रे

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेते आहेत. त्यामुळे त्यांनी गोव्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा निधी दिला आहे. सुमारे ८५ कोटी रुपये खर्च करून सुमारे ११ चक्रीवादळ निवारे बांधण्यात आले आहेत आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी २५० कोटींचा वापर करण्यात आला आहे.

राज्यभर ५०० बंधारे बांधणार : शिरोडकर

जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांना २०४७ साठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन आम्ही जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि जलसंधारणासाठी बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे. लवकरच राज्यभरात आणखी ५०० बंधारे बांधण्याचा आमचा विचार आहे. दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा सुधारण्यासाठी विभाग साळावली धरणावर १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पही बांधणार आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत