कणकुंबीला ‘माउली’ पावली
By Admin | Updated: May 25, 2014 01:55 IST2014-05-25T01:23:55+5:302014-05-25T01:55:37+5:30
कणकुंबीला ‘माउली’ पावली

कणकुंबीला ‘माउली’ पावली
डिचोली : माउली मंदिराच्या परिसराला पूर्वपदावर आणण्यासाठी कर्नाटकाने काम सुरू केलेले आहे. मात्र, पावसाळ््यापूर्वी हे काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. कर्नाटकाने कणकुंबी येथे दि. २ आॅक्टोबर २००६ पासून कळसा कालव्याच्या कामास सुरुवात केली. या कामाचे दुष्परिणाम कणकुंबीतील शेतजमिनीला, त्याचप्रमाणे लोकांना भोगावे लागले. त्याचबरोबर येथील ग्रामदेवी माउलीच्या मंदिरावरही संकट कोसळले. माउली मंदिराच्या परिसरात कालव्याचे कामकाज पाहणारे कंत्राटदार अजित कुमार यांना येथील ग्रामस्थांनी घेराव घातला होता. त्या वेळी ग्रामस्थांना लवकरात लवकर मंदिर दुरुस्तीचे काम हाती घेतो, असे लेखी आश्वासन दिले होते; परंतु त्याची पूर्तता करण्यासाठी कर्नाटक निरावरी निगमने दिरंगाई केल्याने शेवटी लोकांनी आक्रमक भूमिका घेतली. निगमचे व्यवस्थापकीय संचालक आर. रुद्रय्या कणकुंबी येथे आले, तेव्हा माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते किरण गावडे आणि माउली मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बबन दळवी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने रुद्रय्या यांची भेट घेऊन निगमच्या कामकाजामुळे मंदिराची दुरवस्था झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत मंदिराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल व असे झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर येतील, असा इशारा दिला. त्याचबरोबर शिष्टमंडळाचा रागरंग पाहता व्यवस्थापकीय संचालकाने कंत्राटदार अजित कुमार यांना मंदिराचा परिसर पूर्वपदावर आणण्याचे काम हाती घेण्याची सूचना केली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून हे काम सुरू झालेले आहे. (प्रतिनिधी)