शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कला अकादमीप्रश्नी सरकारची अडचण; कलाकारांनी व्यक्त केली नाराजी, विरोधकांकडून नव्याने टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:06 IST

मंत्री गावडे यांनी मागितला प्रकरणाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येथील कला अकादमीतील नाट्यगृहात रविवारी महत्त्वाचा नाट्यप्रयोग वीज व ध्वनीविषयक समस्येमुळे बंद करावा लागला. याचा महाराष्ट्रातील कलाकारांना कटू अनुभव आला. या विषयावरून गोवा सरकार पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य बनले आहे. राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत असून कलाकार वर्ग नाराज झाला आहे. अकादमीत सुधारणा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कला अकादमीतील नाट्यगृहात सोमवारी झालेल्या प्रकाश व्यवस्थेतील त्रुटींसंबंधी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी अहवाल मागितला आहे. कला अकादमीच्या नाट्यगृहात रविवारी 'पुरुष' या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. प्रकाश व्यवस्था बिघडली होती. त्यामुळे पडदा टाकावा लागला होता आणि नाटक १५ मिनिटे थांबवावे लागले होते. या प्रकारानंतर कला अकादमीच्या बांधकामासह मंत्री गोविंद गावडेंवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच या नाट्यगृहाला व्यवस्थापक नसल्याचे ऐकून आश्चर्य व्यक्त केले होते. कला अकादमीच्या सदस्य सचिवांना याविषयी अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे मंत्री गावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणामुळे कला अकादमीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. तर विरोधकांना टीकेचे आणखी एक निमित्त सापडले आहे.

गोव्याच्या छबीला धक्का : मनोज परब

कला अकादमीत 'पुरुष' नाटकाच्या प्रयोगावेळी प्रकाश योजनेचा जो खेळखंडोबा झाला, त्यामुळे गोव्याच्या छबीला धक्का बसू शकतो, अशी टीका रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे नेते मनोज परब यांनी केली. कला अकादमीची वास्तू ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक कलाकारांनी नाटकाचे प्रयोग केले असून, सोबत चांगल्या आठवणी घेऊन गेले आहेत. मात्र, रविवारी 'पुरुष' नाटकाच्या प्रयोगावेळी प्रकाशयोजनेचा जो घोळ झाला, ते योग्य घडले नाही, अशी टीका करून परब म्हणाले की, वरील नाटकाच्या प्रयोगासाठी म्हणे आयोजकांनी सोबत साउंड सिस्टीम आणली होती. यावरून त्यांना कला अकादमीच्या साउंड सिस्टमवर विश्वास नाही, असेच स्पष्ट होते. त्यातही जर त्यांना तेथील प्रकाशयोजनेचा बोजवारा उडेल, याची कल्पना असती तर कदाचित त्यांनी त्याही सोबत आणल्या असत्या. नाटकाच्या प्रयोगावेळी जो गोंधळ उडाला, यामुळे गोव्याच्या कला क्षेत्राबाबतच्या छबीला धक्का लागू शकतो, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : राजदीप नाईक

कला अकादमीची दुरुस्ती योग्य प्रकारे झालेली नाही. याविषयी आम्ही अनेकवेळा सांगितले आहे. पण सरकारने आमच्या मागणीकडे दुलर्क्ष केले. आता प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी कला अकादमीच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी लक्ष घालावे, अशी मागणी प्रसिद्ध नाट्यकलाकार राजदीप नाईक यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन दुरुस्ती केली. पण यात काहीच सुधारणा केलेली नाही. जनतेचे पैसे वाया गेले आहेत. या विषयी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना कलाकारांचे काहीच पडलेले नाही, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी अकादमीच्या कामातील भ्रष्टाचार शोधून काढावा : अमित पालेकर

कला व संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक कला अकादमी इमारतीचा भ्रष्टाचारामुळे विनाश झाल्याचा आरोप आपचे निमंत्रक अॅड अमित पालेकर यांनी केला आहे. भाजप सरकारने गोमंतकीय कलाकारांच्या भावना पायदळी तुडविल्या आहेत. दुरुस्ती नंतर 'ताजमहल ऑफ गोवा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कला अकादमीवर झालेल्या खर्चात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार देत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी पालेकर यांनी केली. सार्वजनिक निधीचा अपव्यय करून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे नुकसान केले गेले आहे. हे एक कला मंदिर होते, ते आता भ्रष्टाचाराच्या लोभामुळे उद्ध्वस्त झाले असून याला हे भाजप सरकार जबाबदार असल्याचेही पालेकर यांनी म्हटले आहे.

राज्याची बदनामी झाली : सिसील

कला अकादमीच्या ढिसाळ कारभारामुळे पूर्वी कलाकारांना मनस्ताप व्हायचा. आता त्यांच्यामुळे राज्याचे नावही खराब होत आहे. नुकत्याच एका दर्जेदार नाटकादरम्यान प्रकाशयोजना खराब असल्याचे समोर आले. यातून मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना त्रास झाला व अखेर पडदा टाकण्याची वेळ आली. यातून राज्याचीदेखील बरीच बदनामी झाली. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आपच्या नेत्या, तथा नृत्य कलाकार सिसील रॉड्रिग्स यांनी केली.

६० कोटी गेले कुठे?

कला अकादमी ही राज्यातील प्रतिष्ठित वास्तूंपैकी एक आहे; पण गेल्या काही वर्षांत या वास्तूला सरकारने बदनाम केले आहे. ६० कोटी रुपये खर्च करून कला अकादमीचे नूतनीकरण करण्यात आले होते. एवढे पैसे खर्च करूनदेखील यात काही मोठा बदल दिसत नाही. उलट ही वास्तू अधिक खराब झाली. यापूर्वी अनेक कलाकारांना याचा वाईट अनुभव आला. यातून अनेक आंदोलने, निषेध कलाकारांनी केला, परंतु सरकार या गोष्टी मान्य करायला तयार नाही, असेही रॉड्रिग्स यांनी सांगितले.

कला अकादमीत घडलेल्या प्रकाराबद्दल मी सध्या काहीच बोलणार नाही. या प्रकरणाचा मी सविस्तर अहवाल मागवला आहे. अहवाल मिळाल्यानंतर नेमके काय झाले ते समोर येईल. त्यानंतर या प्रकरणावर मी भाष्य करेन, कला अकादमीचे काम योग्य आणि उत्तम दर्जाचेच झाले आहे. मात्र काहीजण निरर्थक टीका करत आहेत. - गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार