शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नोकऱ्यांचाच पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 08:16 IST

सध्या गोवा सरकार गाजरांचा पाऊस पाडू लागले आहे.

गाजर खाणे आरोग्यास खूप उपयुक्त. त्यात फायबर असते. सध्या गोवा सरकार गाजरांचा पाऊस पाडू लागले आहे. हे गाजर मात्र वेगळे. नोकऱ्यांच्या गाजराकडे युवकांनी जरा सांभाळून व सतर्क राहूनच पाहावे. स्वर्गीय मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना त्यावेळच्या भाजप सरकारने पाच वर्षांत पन्नास हजार नोकऱ्या देऊ असे जाहीर केले होते. खासगी क्षेत्रात पन्नास हजार नोकऱ्या निर्माण करण्यासाठी मुळात अनेक नवे उद्योग यावे लागतात किंवा असलेल्या मोठ्या उद्योगांचा विस्तार व्हावा लागतो. सरकारचे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ मोठ्या प्रमाणात प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर करत असते. पर्रीकरही प्रस्ताव मंजूर करायचे व आता विद्यमान मुख्यमंत्री सावंत हेही आयपीबीसमोर येणारे अर्ज मंजूर करतात. मात्र, उद्योग प्रत्यक्षात किती उभे राहतात? पंचतारांकित हॉटेलांसह काही प्रकल्प उभे राहिले तसेच सिप्लासह अन्य काही उद्योगांचा विस्तारही झाला. मात्र गोमंतकीयांना तिथे नोकऱ्या मिळाल्या का? 

कोणत्याही उद्योगात ८० टक्के गोंयकार असायला हवेत, असा नियम आहे. या नियमाचे पालन न केलेल्या उद्योगांविरुद्ध सरकारने कोणती कारवाई केली तेही जाहीर झाले तर बरे होईल. मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी साखळीत रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर जाहीर केले की, पुढील पाच वर्षांत दोन लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. सरकार खासगी क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या देणार आहे. शिक्षित गोंयकार युवकांना जोपर्यंत चांगल्या दर्जाची व चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही, तोपर्यंत दोन लाख नोकऱ्यांची घोषणा म्हणजे गाजरच ठरेल. पेडण्यात मोपा विमानतळ साकारल्यानंतर पेडणेवासीयांना व एकूणच गोमंतकीयांना हजारो नोकऱ्या मिळतील असे राज्यकर्ते सांगत होते. मात्र, आता विमानतळावर चांगल्या दर्जाची व घसघशीत वेतन देणारी नोकरी कुणाला मिळाली आहे? मुख्यमंत्री सावंत हे गेल्याच आठवड्यात विमानतळाला भेट द्यायला गेले होते. तिथे पत्रकारांनी त्यांना नोकऱ्यांविषयी विचारले असता पेडणेतील लोकांना बाराशे नोकऱ्या विमानतळावर मिळाल्या असल्याचा दावा त्यांनी केला. 

प्रत्यक्षात लोक सांगतात की, विमानतळाकडील झाडांना पाणी घालणे, बागेची निगा राखणे वगैरे कामे स्थानिकांना मिळाली आहेत. मात्र उच्च दर्जाच्या पदांवर परप्रांतीय काम करू लागले आहेत. गोंयकारांना सुरक्षा रक्षक वगैरेंचे काम दिले जाते. मात्र पदवीधर, डिप्लोमाप्राप्त तसेच विविध व्यावसायिक महाविद्यालयांच्या पदव्या असलेले गोंयकार युवा-युवती बेरोजगार आहेत. त्यांना सुयोग्य नोकऱ्या मिळायला हव्यात, म्हणून सावंत सरकार गंभीरपणे काही करत नाही. मध्यंतरी मजूर खात्याकडून रोजगार मेळावे घेतले गेले. लाखो रुपये खर्चून जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले. हजारो युवा-युवतींनी प्रतिसाद दिला होता. त्यापैकी किती जणांना नोकऱ्या मिळाल्या हे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले तर बरे होईल.

पर्यटन क्षेत्रात वगैरे रोजगार संधी खूप आहेत. मात्र, स्थानिक तरुण फसवला जात आहे. त्याला नोकरी मिळत नाही व कोणताच मंत्री याबाबत गंभीरपणे उपाययोजनाही करत नाही. सरकारी नोकऱ्या तर काही मंत्री, आमदार विकू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अशा मंत्र्यांना फैलावर घेण्याची गरज आहे. पूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकऱ्यांचा एका माजी राजकारण्याने लिलावच पुकारला होता. आता बांधकाम खात्यात नव्याने भरती सुरू झाली आहे. आताही बरेच काही ऐकू येत आहे.

अनेक कुटुंबांमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मुलांना नोकरी नाही. यापूर्वी काही युवकांनी लाखो रुपये सरकारी नोकरीसाठी मोजले. त्यांचीही फसवणूक झालेली आहे. खासगी क्षेत्रात येत्या पाच वर्षांत मुख्यमंत्री दोन लाख सोडा पण पन्नास हजार नोकऱ्या निर्माण करू शकले तरी ते त्यांचे यश ठरेल. त्यासाठी गंभीर व प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. अजून खाण धंदा पूर्णपणे सुरू झालेला नाही. बेकारी वाढलेलीच आहे. महागाईचा भस्मासुरही थैमान घालतोय. अशावेळी सरकारने बेरोजगार युवकांसोबत भावनिक खेळ करू नये. नोकऱ्यांच्या केवळ आशेवर त्यांना ठेवू नये. प्रत्यक्ष चांगल्या नोकऱ्या गोंयकारांना मिळवून द्याव्यात.

टॅग्स :goaगोवाjobनोकरीPramod Sawantप्रमोद सावंत