शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबार ठरतोय हितकारक; मुख्यमंत्र्यांच्या लोकसंपर्कातून विकासाला चालना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2025 07:52 IST

प्रश्नांचे निराकरण

विशांत वझे, लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची पाच वर्षांची वाटचाल पूर्ण करून पुढील वाटचाल अतिशय नियोजनबद्ध व्हावी, यासाठी सातत्याने सर्वच बाबतीत सुवर्णमध्य साधत दिलेले योगदान महत्त्वपूर्ण म्हणायला हवे. त्यांचा जनता दरबार हा दिवसेंदिवस लोकप्रिय, तसेच समस्या निवारण दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. लोकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबाराला मोठे यश आले आहे.

सतत जनतेचा संपर्कात राहणारा मुख्यमंत्री अशी ख्याती त्यांनी प्राप्त केली आहे. दररोज सकाळी तासभर ते लोकांना भेटतात. त्या व्यतिरिक्त दर शनिवार, रविवार रवींद्र भवनात लोकांना नियमित भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. यादरम्यान लोकांची मोठी गर्दी असते. लोकसंपर्कातून लोकांचे प्रश्न समजून येतात, तसेच बऱ्याच वेळा तत्काळ प्रश्न सोडवण्याची किमया मुख्यमंत्री साधत आलेले आहेत. लोकही यामुळे समाधानी आहेत.

लोकांचे अनेक तन्हेचे प्रश्न असतात. वेगवेगळ्या समस्या समजून घेत मुख्यमंत्री यावर तोडगा काढतील, अशा प्रकारचा विश्वास जनतेत वृद्धिंगत झाल्याने दरबाराला मोठी गर्दी होत असते. तातडीने लोकांचे प्रश्न सोडवणे यावर मुख्यमंत्री भर देत असतात. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. रोजगार, सामाजिक प्रश्न, घरगुती प्रश्न, बदली व इतर समस्या व प्रश्नांबरोबरच अगदी विवाह जुळवणी व इतर प्रश्नही लोक घेऊन येतात, असे जनता दरबारात दिसून आलेले आहेत.

मुख्यमंत्री किती व्यस्त असले, तरी लोकांना भेटल्याशिवाय जात नाही. त्यामुळे लोकांना पूर्ण विश्वास बसलेला असून बहुतेक प्रश्नांना सातत्याने मार्ग काढण्यात जनता दरबाराच्या माध्यमातून यश मिळाल्याने एक प्रकारे जनता दरबार लोकप्रिय ठरलेला आहे.

नववर्षानिमित्त शुभेच्छा 

लोकांना आपल्या प्रश्नाचे निराकरण होणे गरजेचे असते. त्यामुळेच ते लोक आपल्याकडे वेगवेगळे प्रश्न घेऊन येत असतात. जनता दरबाराच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा होत असल्याने, तसेच तातडीने वेगवेगळे अर्ज निकालात काढण्यात येत असल्याने निश्चितपणे लोकांचा विश्वास वाढत चाललेला आहे. लोकसंपर्कात राहणे मला खूप आवडते. त्यातून स्नेहभावही वाढतो व लोकांचे प्रश्नही समजून येत असतात. त्यामुळेच आपण व्यस्त वेळातही लोकांना भेटतो. तसेच जनता दरबारात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोक मला भेटायला येत असतात. लोकांनी यापुढेही आपले प्रश्न माझ्यासमोर मांडावेत. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करीत राहीन. नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत