शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कैदी सोडून जाताना डोळ्य़ात पाणी सुद्धा येतं, जेलरने सांगितले अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 20:44 IST

तुरुंगात सर्व काही वाईटच घडत असते असे मुळीच नाही. किंवा तुरुंगात पोहचणारे सगळेच कायमचे गुन्हेगार असतात असेही काही नाही. काही कैदी तर एवढे चांगले वागतात की ते शिक्षेचा काळ संपवून जेव्हा तुरुंग सोडून जात असतात तेव्हा डोळ्य़ात पाणीही येत असतं

पणजी  - तुरुंगात सर्व काही वाईटच घडत असते असे मुळीच नाही. किंवा तुरुंगात पोहचणारे सगळेच कायमचे गुन्हेगार असतात असेही काही नाही. काही कैदी तर एवढे चांगले वागतात की ते शिक्षेचा काळ संपवून जेव्हा तुरुंग सोडून जात असतात तेव्हा डोळ्य़ात पाणीही येत असतं, अशा शब्दात विठ्ठल गावस ह्या तुरुंग अधिका:याने अनुभव कथन केले व प्रेक्षकही मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले.

कोलवाळमध्ये तुरुंगअधिकारी म्हणून काम पाहणारे गावस म्हणाले, की काही कैद्यांचे तुरुंगातील वर्तन खूप चांगले असते. काहीजणांनी गुन्हा केला होता हे देखील खरे वाटत नाही. काहीवेळा काही चांगले  कैदी तुरुंग सोडून जाताना ते जाऊ नयेत असं देखील अधिका:यांना वाटतं. एवढे त्यांच्याशी नाते तयार झालेले असते. काहीवेळा कैदी तुरूंग सोडून जाताना अधिका:याच्या पायावर डोके ठेवून आपल्याला जावे असे वाटत नाही असे देखील आपुलकीने सांगतात.

गावस म्हणाले, की तुरुंगात राहून काही कैदी उच्च शिक्षण घेतात. काहीजण चित्रकला व अन्य कलांमध्ये रममाण होतात. मी स्वत: गायन करतो. मला संगीताची व भजनाची प्रचंड आवड असल्याने कैद्यांसाठीही भविष्यात तुरुगांत भजनाच्या वर्गाची व्यवस्था करावी असा विचार मनात येतो.

सत्तरी तालुक्यातील  साहित्यमंथन संस्थेतर्फे केरी-सत्तरी येथे आयोजित आम्ही घडलो, तुम्ही सुद्धा घडाना या कार्यक्रमप्रसंगी गावस बोलत होते. आपला स्वत:चा प्रवासही गावस यांनी सांगितला. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर आपल्याला आईने आणखी शिकू नको, काम कर अन्य भावंडांनाही शिकू द्या, असा सल्ला दिला होता. मात्र आपल्याला शिक्षणाची आवड होती. आपले वडील मजुरी करायचे. त्यांनीही आपल्याला पुढे शिकण्याचा सल्ला दिला. मी बारावीर्पयत शिकलो आणि मग कॉलेजमध्ये शिकण्याकरिता आर्थिक प्राप्ती व्हावी या हेतूने रोज रात्री सत्तरीतीलच एका औद्योगिक वसाहतीतील रात्रपाळीच्या कामाला जाऊ लागलो. रोज मी रात्रीच्यावेळी नोकरी करायचो व सकाळी महाविद्यालयात जायचो. अशा प्रकारे पदवीर्पयतचे शिक्षण घेतले व मग तुरुंगअधिकारी म्हणून नोकरीला लागल्याचे गावस यांनी नमूद केले.

शिक्षक संजय गावकर, मत्स्य खात्याचे अधिकारी प्रदीप गावस, राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्यासोबत एकेकाळी काम केलेले सामाजिक कार्यकर्ते गिरीश साळवे यांनीही यावेळी आपली वाटचाल व अनुभव सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणो म्हणून कणकवली येथील साहित्यिक मोहन कुंभार उपस्थित होते. लोकमतचे ब्युरो चिफ सदगुरू पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. गोवा विद्यापीठाचे कोंकणी विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पर्येकर, संयोजक नमन सावंत, कार्यक्रमाचे यजमान गणोश शेटकर, गोपिनाथ गावस, राघोबा लवू पेडणोकर, ङिालू गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाjailतुरुंग