शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जॅक सिक्वेरा कॅथोलिक म्हणूनच त्यांच्यावर अन्याय, चर्चिल आलेमाव यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 17:02 IST

पन्नास वर्षापूर्वी गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवणा-या ओपिनियन पोल म्हणजेच जनमत कौलाच्यावेळी विलिनीकरण विरोधी भूमिका घेतलेले युनायटेड गोअन्स पार्टीचे अध्यक्ष जॅक सिक्वेरा यांचा पुतळा गोवा विधानसभेच्या आवारात उभारावा की नाही याबद्दल वेगवेगळ्या पक्षात मतभेद

- सुशांत कुंकळयेकर मडगाव - पन्नास वर्षापूर्वी गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवणा-या ओपिनियन पोल म्हणजेच जनमत कौलाच्यावेळी विलिनीकरण विरोधी भूमिका घेतलेले युनायटेड गोअन्स पार्टीचे अध्यक्ष जॅक सिक्वेरा यांचा पुतळा गोवा विधानसभेच्या आवारात उभारावा की नाही याबद्दल वेगवेगळ्या पक्षात मतभेद असताना सिक्वेरा हे कॅथोलिक असल्यामुळेच आजवर त्यांच्यावर अन्याय झाला असा आरोप गोव्यातील राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी केला आहे. त्यामुळे आता या वादाला धार्मिक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मंगळवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आलेमाव म्हणाले, जर सिक्वेरा कॅथोलिक नसते तर आतार्पयत त्यांचा पुतळा विधानसभा आवारात उभा झाला असता. ते कॅथोलिक असल्यामुळेच त्यांच्या नावाला मगो पक्षाकडून विरोध होत आहे. सिक्वेरा यांचे गोव्यासाठीचे योगदान मोठे असून सध्या गोव्यात बांधलेल्या तिस:या मांडवी पुलाला सिक्वेरा यांचे नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी मागच्यावर्षी गोवा फॉरवर्ड पक्षाने सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा आवारात उभारावा अशी मागणी केली होती. या मागणीला मगोकडून विरोध झाला होता. आता पुन्हा एकदा हा वाद ऐरणीवर आला असून गोवा सुरक्षा मंचानेही सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा आवारात उभारण्यास विरोध केला आहे.सत्ताधारी पक्षाचा घटक असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी 16 जानेवारी रोजी जनमतकौल विजय दिन साजरा करताना मेरशी येथे डॉ. सिक्वेरा यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करताना जनमत कौल दिन हा गोवा मुक्ती दिनापेक्षाही अधिक महत्वाचा असे वक्तव्य केल्यानंतर गोव्यात पुन्हा या विषयावरुन राजकीय वाद निर्माण झाला होता. मगो व गोवा सुरक्षा मंच या दोन्ही पक्षांनी सरदेसाई यांनी गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला असा दावा करुन सरदेसाई यांनी त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली होती. काल सोमवारी सरदेसाई यांनी या दोन्ही पक्षांना उत्तर देताना हे पक्ष राष्ट्रवादाच्या नावाखाली अजुनही महाराष्ट्रवाद चालवितात असा आरोप करुन माफी मागण्यास नकार दिला होता. हा वाद अजुन शमलेला नसतानाच आलेमाव यांनी मंगळवारी या वादाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.जनमत कौलाच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास गोवा मुक्तीनंतर गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण करावे अशी मागणी एका गटाकडून केली जात होती तर दुसरा गट या विलिनीकरणाला विरोध करत होता. विलिनीकरणवाद्यांचे नेतृत्व मगो पक्ष करत होता तर काँग्रेस व युनायटेड गोअन्स हे दोन्ही पक्ष या विलिनीकरणाला विरोध करत होते. या मागणीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने 1967 साली गोव्यातील लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे ठरविण्यासाठी जनमत कौल घेतला होता. 16 जानेवारी 1967 रोजी त्याचा निकाल लागला होता. त्यावेळी गोमंतकीयांनी विलिनीकरणाला विरोध करुन गोव्याचा संघप्रदेशाचा दर्जा कायम ठेवला होता. डॉ. सिक्वेरा हे या लढय़ातील एक महत्वाचे नेते होते. गोव्यातील पहिल्या दोन विधानसभेच्या कार्यकाळात डॉ. सिक्वेरा हे विरोधी पक्ष नेतेही होते. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण