शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

...तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही : टी. राजासिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 09:22 IST

सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केल्यास भारताला हिंदु राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : देश आणि धर्म यांसाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत. हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही जन्माला आलो आहोत. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथे राज्यकर्ते धर्मांधांचे लांगुलचालन करत आहे. गोरक्षण करणाऱ्या हिंदूवर गुन्हे नोंदवले जातात. बंगालप्रमाणे तेलंगाणामध्येही हिंदूवर अत्याचार चालू आहेत, असे प्रतिपादन 'तेलंगणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केले.

ते 'वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा'त 'तेलंगणा येथील हिंदुद्रोही सरकारची दडपशाही, तसेच हिंदु राष्ट्राचा संघर्ष या विषयावर बोलत होते. ते पुढे म्हणाले 'मला हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदूनी निवडून दिले आहे. अनेक राज्यांत हिंदूंच्या हत्या होत असून येणाऱ्या संकटांविषयी हिंदू अनभिज्ञ आहेत. स्वतःच्या रक्षणासाठी हिंदू युवक आणि युवती यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तरच हिंदू स्वतःचे आणि धर्माचे रक्षण करू शकतील. असेही ते म्हणाले.

सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केल्यास भारताला हिंदु राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही. हिंदू राष्ट्रासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणायला हवा, अशीही भूमिका त्यांनी मांडली. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील संकल्प हिंदु राष्ट्र अभियाना'चे अध्यक्ष कमलेश कटारिया यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी अमरावती येथील श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांच्या हस्ते डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण' (खंड १ ) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती' या 'ई-बुक'चे प्रकाशन करण्यात आले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा