शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 2:03 PM

शिवरायांमुळे अनेक मंदिरे वाचली

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली, धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनी पोर्तुगीजांना रोखले, असे उद्‌गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले. येथील शिवजयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी झाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती, धर्मांना घेऊन पुढे गेले. त्यांची प्रत्येक कृती आचरणात आणण्यासारखी आहे. गोव्यात पोर्तुगीज राजवट असताना मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती. शिवाजी महाराज त्याकाळी गोव्यात आले नसते तर उरलेली मंदिरेही उद्ध्वस्त झाली असती. सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले नार्वे येथील सप्तकोश्वर मंदिर पुन्हा बांधले आणि पोर्तुगीजांना यापुढे धर्मपरिवर्तन तसेच मंदिरे उद्ध्वस्त करता येणार नाहीत, असे खडसावून सांगितले. त्यामुळेच आमची मंदिरे वाचली.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मच्छिमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार कार्लस फेरेरा, दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सरपंच स्वप्निल चोडणकर, सोनिया पेडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष किशोर अस्नोडकर, तिन्ही पंचायतीचे उपसरपंच, पंच सदस्य, पर्यटन खात्याचे संचालक सुनील आंचिपाका आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

रामलल्ला अयोध्येतील मंदिरात कधी विराजमान होणार, याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून होती. लोकांच्या इच्छेनुसार रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीतून विकसित भारत २०४७ पाहण्यासाठी आजचा युवक साक्षीदार होणार आहेत. नवभारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शिवशाही, शिवराज्य आणि रामराज्य आणण्यासाठी लोकांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी खासदार तानावडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सरपंच चोडणकर यांनी स्वागत केले. यावेळी शिवशाहीर नंदेश उमप, मूर्तिकार प्रशांत खेडेकर आणि जोसेफ लोपीस यांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवशाहीर नंदेश आणि साथी कलाकारांनी शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रम सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. अनावरण सोहळ्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. मिरवणुकीत पर्वरीवासीयांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतShivjayantiशिवजयंती