शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गोव्यात २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:09 IST

पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मुंबईच्या धर्तीवर २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

पणजी : पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मुंबईच्या धर्तीवर २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांचे मत असे आहे की, गोव्यात हा प्रयोग करता येईल. परंतु व्यावसायिकांकडून प्रस्ताव येऊ द्या, या प्रस्तावावर नंतर अभ्यास करून काय तो निर्णय घेता येईल.

गोवा जागतिक नकाशावरील पर्यटन स्थळ म्हणून धडकत आह. येथील किनारी भागात एरवीच नाईट लाईट सुरू असते. देश-विदेशातून जिवाचा गोवा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या नाईट लाईफची भुरळ पडलेली आहे. कळंगुट, बागा हणजुण यासारखे ठिकाणी नाईट लाईफ सुरू झाले आहे, कळंगुट भागातील रेस्टॉरंट, शॅक पहाटेपर्यंत उघडे असतात. तेथे मद्य पुरवठाही केला जातो.

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचा चांगला निर्णय आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आहे. येथे नाईट लाइफचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असतात. रात्रीच्या वेळी मॉल्स, मल्टिप्लेक्स उघडे ठेवल्यास पर्यटन व्यवसाय त्याचा फायदा होईल. मात्र त्याचबरोबर पोलिसांच्या गस्ती वाढवायला हव्यात. गोव्याचे नाव बदनाम होणार नाही याची काळजी घ्यावी.दुसरीकडे काहीजणांचे मत असे आहे की, सध्या तरी हे शक्य नाही.अखिल गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की रात्रीच्या वेळी मॉल्स, रेस्टॉरंट सुरू ठेवायची झाली तर आधी लोकांची रहदारी असायला हवी. बागा, कळंगुट आदी किनारी भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालतात. राजधानी पणजी शहरात कॅसिनोवर लोक येतात. त्यामुळे काहीशी वर्दळ असते, परंतु जोपर्यंत पुरेशी वर्दळ होत नाही, तोपर्यंत हे शक्य होईल असे वाटत नाही. रात्रीची आस्थापने चालू ठेवण्यासाठी सरकारने धोरण तयार करायला हवे. एखादी गोष्ट आरंभशूरपणे सुरू करणे आणि सहा महिन्यातच बंद करणे, असे होता कामा नये.धोंड यांचे राजधानी शहरात हॉटेल आहे ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे येणारे देशी पर्यटक हे पुन्हा पुन्हा गोव्याला भेट देणारे असतात. गोवा आता महागडे डेस्टिनेशन बनले आहे. भारतीय पर्यटक गुजरात, कर्नाटक, केरळ तसेच शेजारी सिंधुदुर्ग-रत्नागिरीला जातात. कोकणात चांगले किनारे आहेत. तसेच तेथे जलक्रीडाही सुरू झालेल्या आहेत.  त्यामुळे पर्यटक तेथे जातात.पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले की, पणजी शहराचा विचार केला तर रात्रीच्यावेळी केवळ कॅसिनोंमुळे शहरात वर्दळ असते. स्थानिक लोक फिरकत नाहीत. पूर्वी रात्री ८ वाजताच पणजीत सामसूम होत असे. मल्टिप्लेक्स, मॉल्स किंवा  रेस्टॉरंट तास खुले ठेवण्याचा प्रयोग केला तर तो चालेल असे वाटत नाही. पणजी मार्केट कूळ संघटनेचे सचिव धर्मेंद्र भगत म्हणाले की, आधीच स्थानिक दुकानदारांना मॉलनी जेरीस आणले आहे. रात्रीचे उशिरा मॉल चालू राहिल्यास त्याचा मोठा फटका स्थानिक दुकानदारांना बसेल. मॉलना मुभा दिली तर मग बाजारपेठेत दुकानेही रात्रीची खुली का नको? असा सवाल त्यांनी केला.