शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पणजी पोटनिवडणुकीत दहशतीचा मुद्दा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 12:56 IST

पणजीच्या लढतीमध्ये कथित दहशतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. ताळगावसारखी दहशत आम्हाला पणजीत नको असा मुद्दा भाजपकडून मतदारांसमोर मांडला जात आहे.

पणजी : पणजीच्या पोटनिवडणुकीनिमित्ताने सुरू असलेला जाहीर प्रचार संपुष्टात येण्यास आता फक्त सहा दिवस बाकी आहेत. पणजीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशीच प्रमुख लढत आहे आणि या लढतीमध्ये कथित दहशतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. ताळगावसारखी दहशत आम्हाला पणजीत नको असा मुद्दा भाजपकडून मतदारांसमोर मांडला जात आहे.

येत्या 19 रोजी पणजीसाठी मतदान होणार आहे. पणजीतील 30 पैकी वीस-बावीस बुथ हे शिक्षित मतदारांचे आहेत. सुभाष वेलिंगकर यांच्या मते पणजीत पैशांची जादू चालत नाही. पंधरा टक्केच मतदारांवर पैशांचा प्रभाव पडतो व तोही पडला तर पडतो, असे वेलिंगकर म्हणतात. भाजपच्या काही महिला नगरसेविकांच्या मते पणजीत पैशांचा वापर सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र माजी महापौर वैदही नायक म्हणतात की- पैशांमुळे पणजीतील लोक बदलणार नाहीत, ते भाजपलाच मत देतील. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की- पैशांचा वापर भाजप करतोय की काँग्रेस पक्ष करतोय ते पणजीतील लोकांना लोकांना ठाऊक आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांमधील कथित गैरव्यवहाराचा विषय हा चर्चेत आणला आहे. गोवा सुरक्षा मंचनेही हाच मुद्दा पणजीवासियांसमोर मांडणे सुरू ठेवले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे असे चोडणकर यांनी सांगत अनेक कागदपत्रेही जाहीर करण्याचा इशारा दिला. सुरक्षा मंच तर म्हणतो की भ्रष्टाचार नाही असे भाजपचे म्हणणे असेल तर भाजपने आपल्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करावा.

भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर व एकूणच भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी पणजीतील शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी भाजपला निवडा असे आवाहन मतदारांना केले आहे. स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली पोटनिवडणूक आहे. ताळगाव मतदारसंघाची सुत्रे अनेक वर्षे मोन्सेरात यांच्याकडे आहे. ताळगावमध्ये अंतर्गत रस्ते खराब आहेत, असे भाजपच्या महिला नेत्यांचे म्हणणे आहे. पणजीतील महिलांची सुरक्षा, पणजीतील दहशतमुक्त वातावरण अशा गोष्टींचा विचार मतदारांनी करावा व मोन्सेरात यांना पराभूत करावे असा प्रचार भाजपच्या यंत्रणोने चालवला आहे. मोन्सेरात म्हणजे दहशत असे समीकरण केले गेले आहे. पणजीत 1995 सालानंतर एकदाही गँगवॉर झाले नाही, असा मुद्दा सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी नुकताच मांडला.

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकManohar Parrikarमनोहर पर्रीकरTerrorismदहशतवाद