शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मातृत्व-पितृत्वापासून वंचित रहाण्याचे गोव्यातील प्रमाण दहा टक्क्यांनी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 16:11 IST

राष्ट्रीय सरासरी दहा ते पंधरा टक्के असताना गोव्यातील प्रमाण 20 ते 25 टक्के. पतीची अनुपस्थिती आणि उशिरा होणारी लग्ने कारणीभूत असण्याची शक्यता

मडगाव:  मातृत्व व पितृत्वापासून वंचित असलेल्या दाम्पत्यांचे प्रमाण गोव्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा दहा टक्क्यांनी अधिक असून त्यामुळे गंभीर सामाजिक समस्या निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. उशिरा लग्न होण्याचे प्रमाण आणि नोकरीनिमित्त पतीचे पत्नीपासून दूर राहणे या गोष्टी यासाठी कारणीभूत असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार गर्भधारणोपासून वंचित असलेल्या दाम्पत्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण दहा ते पंधरा टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण 20 ते 25 टक्के एवढे जास्त आहे. यावर अजुन सखोल अभ्यास झालेला नसला तरी वरवर पहाता गोव्यातील सामाजिक लाईफस्टाईल त्याला कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

फोंडय़ातील नामांकित गायनेकॉलॉजिस्ट डॉ. जयंत कामत यांच्या मते, मिडल ईस्ट किंवा इतर देशात नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण गोव्यात बरेच मोठे आहे. लग्न झालेले पुरुष वर्षातून एकदा किंवा दोनदा घरी येतात. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नींच्या गर्भधारणेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासंदर्भात अजुनही सखोल अभ्यास झालेला नाही हेही त्यांनी मान्य केले. उशिरा लग्ने होण्याचे प्रमाणही गोव्यात अधिक असून अशा परिस्थितीत उशिरा लग्न झालेल्या महिलेची प्रजनन शक्ती कमी होण्याची शक्यताही डॉ. कामत यांनी व्यक्त केली. सर्वसाधारणरित्या महिलेची प्रजनन शक्ती वयाच्या 30व्या वर्षी कमी होऊ लागते. 35 वर्षापर्यंत या प्रजनन शक्तीत 40 टक्क्यांची घट होते. वयाच्या चाळीशीनंतर ती अधिकच कमी होते. गोव्यात सरासरी 35 ते 40 वयोगटात लग्ने होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे एकूण गर्भधारणेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या शिवाय हार्मोनमध्ये झालेले असंतुलन, लैंगिक व्याधी यासारखी कारणेही गर्भधारणा कमी करण्यास कारणीभूत ठरतात. 

गोव्यात जहाजांवर काम करणाऱ्यांचे प्रमाणही बरेच मोठे आहे. जहाजाच्या इंजिनवर अभियंते किंवा तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्यांच्या प्रजनन शक्तीवरही जास्त वेळ गरम वातावरणाशी संपर्क आल्याने विपरित परिणाम होऊ शकतो. जास्त वेळ गरम वातावरणाशी संपर्क आल्यास त्या पुरुषाच्या शुक्राणूंच्या प्रमाणात घट होऊ शकते.

डॉ. केदार फडते यांच्या मतेही गोव्यात अपत्यहीन दाम्पत्यांचे प्रमाण 20 ते 25 टक्के असून बहुतेकवेळा उशिरा लग्न झाल्यामुळे असे होऊ शकते. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे गायनॅकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. गुरुदास पेडणेकर यांनीही स्थिती गंभीर असल्याचे मान्य करताना गोव्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने अशी दाम्पत्ये लगेच वैद्यकीय उपचार करुन घेण्यास पुढे येतात. ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. देशाच्या इतर भागात अशी जागृती दिसत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Healthआरोग्यpregnant womanगर्भवती महिलाgoaगोवा