शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

 होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनी गुंतवणूक करावी, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 8:29 PM

होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनीही गुंतवणूक करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे. ‘होमियोपॅथी औषध नियमन : जागतिक हातमिळवणी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. 

पणजी - होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनीही गुंतवणूक करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे.  ‘होमियोपॅथी औषध नियमन : जागतिक हातमिळवणी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. केंद्रीय आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव रोशन जग्गी, सेंट्रल कौन्सिल फॉर रीसर्च इन होमियोपॅथीचे (सीसीआरएच)डॉ. राज. के. मनचंदा, फ्रान्समधील इसीएचच्या अध्यक्षा डॉ. हेलेन रेनॉक्स, सीसीआरएचचे उप सरसंचालक डॉ. अनिल खुराना यावेळी उपस्थित होते. तीन दिवस ही आंतरराष्ट्रीय परिषद चालणार असून  होमियोपॅथी औषध क्षेत्रातील क्रांती, नियमन तसेच या क्षेत्रासमोर असलेली आव्हाने याबाबत व्यापक चर्चा या परिषदेत होणार आहे.  या परिषदेत २0 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून यात जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, अर्जेंटिना, आॅस्ट्रेलिया, जपान, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, श्रीलंका आदी राष्ट्रांचा समावेश आहे.

 मंत्री नाईक पुढे म्हणाले की, ‘ होमियोपॅथी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार कटिबध्द आहे आणि त्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. होमियोपॅथी डॉक्टरना तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी नजीकच्या काळात संसदेत कायदा दुरुस्त्या येणार आहेत. होमियोपॅथी औषधे प्रदर्शनात लावता येतील. विक्री खुली होईल. औषध विक्रेत्यांना ही औषधे विकण्यासाठी स्वतंत्र परवाना घ्यावा लागणार नाही.’

ते म्हणाले की,‘भारतात जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. अँटिबायोटिक्स औषधांमुळे आरोग्याला बाधा पोचत असल्याने लोक होमियोपॅथीकडे वळत असून पर्यायी उपचार पध्दती म्हणून ती लोकप्रिय ठरत आहे. संसर्गजन्य रोगही होमियोपॅथीने बरा होऊ शकतो.’

 २ लाख होमियोपॅथी डॉक्टर 

संयुक्त सचिव रोशन जग्गी म्हणाले की,‘ होमियोपॅथी उपचार पध्दतीमध्ये आता लोकांचा अधिकाधिक विश्वास निर्माण होत आहे आणि ही उपचारपध्दती लोकप्रियही होत आहे. भारतात सुमारे २ लाख नोंदणीकृत होमियोपॅथी डॉक्टर आहेत. सुमारे ६00 कंपन्या होमियोपॅथी औषधांचे उत्पादन करीत आहेत. हे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे त्यामुळे याचा अधिकाधिक वापर करुन या उपचार पध्दतीत नाविन्य आणायला हवे. होमियापॅथी उपचार आता पारंपरिक पध्दतीनेच करुन किंवा जो काही वारसा मिळाला आहे त्या पध्दतीनेच करुन चालणार नाही. या क्षेत्रापुढेही नवी आव्हाने आहेत. अधिकाधिक संशोधन व्हायला हवे आणि शास्रीय अधिष्ठानही लाभले पाहिजे. ही परिषद त्यादृष्टिने व्यापक चर्चेसाठी योग्य व्यासपीठ ठरेल.’

टॅग्स :goaगोवा