शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

“पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही”: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 08:18 IST

तिरंगा यात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय असून हा लढा अद्याप संपलेला नाही. जोपर्यंत संपूर्ण दहशतवादाचा बीमोड होत नाही तोपर्यंत भारतीय सैनिक त्यासाठी लढत राहतील. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही. पाक पुरस्कृत दहशतवाद ठेचून काढताना दहशतदाद्यांना पाकिस्तानात घुसून चारीमुंड्या चीत करत त्यांचे तळ उदध्वस्त केले. भारतीय सैनिकांनी देशाची ताकद जगाला दाखवून दिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

साखळी शहरात शनिवारी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा उपस्थितांनी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी साखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पंचायतींचे प्रतिनिधी, भाजप कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

... तोवर गप्प बसणार नाही

दहशतवादाच्या विरोधात आमची लढाई असून दहशतवाद पूर्ण ठेचून काढेपर्यंत भारत गप्प बसणार नाही. दहशतवाद संपविणे हेच आमचे उद्दिष्ट असून आम्ही कोणाच्या धर्म व देशाच्या विरोधात नाही, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी बोलताना म्हणाले.

देश, धर्माविरुद्ध नव्हे तर दहशतवादाच्या विरोधात

मुख्यमंत्री म्हणाले, आमचा लढा हा कोणा देशाविरुद्ध किंवा धर्माविरुद्ध नसून दहशतवादी ताकद नेस्तनाबूद करणे हा आमच्या देशाचा संकल्प आहे. त्या कार्यात शूरवीरांना आमचा सलाम. भारतीय सैनिकांचा जोश वाढवण्यासाठी या तिरंगी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी खंबीर उभा आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारणOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPOK - pak occupied kashmirपीओके