शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: काँग्रेसचा सवाल; भारतावर चिनी आक्रमण होत असताना सोहळे कसले करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 15:52 IST

गोव्यात विद्यार्थ्यांना शिकायला नेटवर्क नाही मग भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीला ते कसे मिळते?

मडगाव : चीन सीमेवर लढताना भारतीय सैनिकांना बलिदान द्यावे लागते. देशाच्या सीमेचे व आपल्या सैनिकांचे रक्षण करणे भाजपला जमत नाही, परंतु मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची वर्षपुर्ती करुन उत्सव साजरे करण्याची भाजपची कृती निषेधार्ह आहे. लोकांना व खास करुन विद्यार्थ्याना गोव्यात नेटवर्क मिळत नसताना, भाजपच्या रॅलीला नेटवर्क कसा मिळतो व कोण देतो हे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी लोहिया मैदानावर बोलताना केली. 

गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती तर्फे आज ७५वा क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, दक्षिण गोवा जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस, विठू मोरजकर, दीपक खरंगटे, फिडोल पेरेरा, लाॅयोला फर्नांडिस, नगरसेवक अविनाश शिरोडकर, पराग रायकर व इतर हजर होते. 

केंद्र व राज्यातील भाजप सरकारची चुकीच्या धोरणांमुळे आज गोव्याच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यातच कोरोना लाॅकडाऊनमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असुन, सरकारकडुन आज प्रत्येक गोमंतकीय आर्थिक मदतीची वाट पाहत आहे. भाजप सरकारने केवळ घोषणा व रॅली आयोजित करुन उत्सव साजरे न करता लोकांना रोख मदत देण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

सरकारने आता गोव्यातील मोबाईल नेटवर्क सेवा सुधारण्यावर भर द्यावा जेणेकरुन त्याचा फायदा लोकांना व खास करुन विद्यार्थ्याना ॲानलाईन शिक्षणासाठी मिळेल. भाजपने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपुर्ती निमीत्त केद्रिय मंत्री नितीन गडकरींची व्हर्चुअल रॅली आयोजित करून उत्सव साजरा करण्याच्या भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या  घोषणेचा चोडणकर यांनी   निषेध केला आहे व सदर रॅली रद्द करुन, त्या रॅलीवर येणार लाखो रुपयांचा खर्च गरजवंताना द्यावा अशी मागणी काॅंग्रेस अध्यक्षानी केली आहे. 

या संकटकाळात शेतकरी व बागायतदारांना त्वरीत मदत करण्याची गरज आहे. लोकांना दिलासा मिळेल अशी योजना व काम सरकारने हाती घेणे गरजेचे असताना भाजप रॅली करण्यात लाखो रुपये खर्च करीत आहे. सरकारने जबाबदारीने वागणे व लोकांना आत्मविश्वास देणे गरजेचे असुन, मोटार सायकल पायलट, टॅक्सीवाले, गाडा व्यापारी व सामान्य माणसांना आज सर्वाधीक झळ बसल्याचे त्यानी सांगीतले. 

मुख्यमंत्री मोबाईल टाॅवरचे कारण सांगुन लोकांना दोष देतात ते चुकीचे असुन, मागील ८ वर्षात भाजपने केलेल्या गैरकारभारामुळे व चुकीच्या धोरणामुळेच आज ही परिस्थीती निर्माण झाली आहे हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे. सरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करुन खर्च कपातीचे कारण देणाऱ्या मुख्यमंत्र्यानी आपली मंत्रीमंडळ संख्या कमी करुन योग्य पायंडा घालावा अशी मागणी चोडणकर यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा