शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: काँग्रेसचा सवाल; भारतावर चिनी आक्रमण होत असताना सोहळे कसले करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 15:52 IST

गोव्यात विद्यार्थ्यांना शिकायला नेटवर्क नाही मग भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीला ते कसे मिळते?

मडगाव : चीन सीमेवर लढताना भारतीय सैनिकांना बलिदान द्यावे लागते. देशाच्या सीमेचे व आपल्या सैनिकांचे रक्षण करणे भाजपला जमत नाही, परंतु मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची वर्षपुर्ती करुन उत्सव साजरे करण्याची भाजपची कृती निषेधार्ह आहे. लोकांना व खास करुन विद्यार्थ्याना गोव्यात नेटवर्क मिळत नसताना, भाजपच्या रॅलीला नेटवर्क कसा मिळतो व कोण देतो हे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी लोहिया मैदानावर बोलताना केली. 

गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती तर्फे आज ७५वा क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, दक्षिण गोवा जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस, विठू मोरजकर, दीपक खरंगटे, फिडोल पेरेरा, लाॅयोला फर्नांडिस, नगरसेवक अविनाश शिरोडकर, पराग रायकर व इतर हजर होते. 

केंद्र व राज्यातील भाजप सरकारची चुकीच्या धोरणांमुळे आज गोव्याच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यातच कोरोना लाॅकडाऊनमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असुन, सरकारकडुन आज प्रत्येक गोमंतकीय आर्थिक मदतीची वाट पाहत आहे. भाजप सरकारने केवळ घोषणा व रॅली आयोजित करुन उत्सव साजरे न करता लोकांना रोख मदत देण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

सरकारने आता गोव्यातील मोबाईल नेटवर्क सेवा सुधारण्यावर भर द्यावा जेणेकरुन त्याचा फायदा लोकांना व खास करुन विद्यार्थ्याना ॲानलाईन शिक्षणासाठी मिळेल. भाजपने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपुर्ती निमीत्त केद्रिय मंत्री नितीन गडकरींची व्हर्चुअल रॅली आयोजित करून उत्सव साजरा करण्याच्या भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या  घोषणेचा चोडणकर यांनी   निषेध केला आहे व सदर रॅली रद्द करुन, त्या रॅलीवर येणार लाखो रुपयांचा खर्च गरजवंताना द्यावा अशी मागणी काॅंग्रेस अध्यक्षानी केली आहे. 

या संकटकाळात शेतकरी व बागायतदारांना त्वरीत मदत करण्याची गरज आहे. लोकांना दिलासा मिळेल अशी योजना व काम सरकारने हाती घेणे गरजेचे असताना भाजप रॅली करण्यात लाखो रुपये खर्च करीत आहे. सरकारने जबाबदारीने वागणे व लोकांना आत्मविश्वास देणे गरजेचे असुन, मोटार सायकल पायलट, टॅक्सीवाले, गाडा व्यापारी व सामान्य माणसांना आज सर्वाधीक झळ बसल्याचे त्यानी सांगीतले. 

मुख्यमंत्री मोबाईल टाॅवरचे कारण सांगुन लोकांना दोष देतात ते चुकीचे असुन, मागील ८ वर्षात भाजपने केलेल्या गैरकारभारामुळे व चुकीच्या धोरणामुळेच आज ही परिस्थीती निर्माण झाली आहे हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे. सरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करुन खर्च कपातीचे कारण देणाऱ्या मुख्यमंत्र्यानी आपली मंत्रीमंडळ संख्या कमी करुन योग्य पायंडा घालावा अशी मागणी चोडणकर यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा