शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

भटक्या कुत्र्यांचे १०० टक्के लसीकरण करा; पशुसंर्वधन मंत्र्यांचे मिशन रेबीजच्या अधिकाऱ्यांना सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2024 16:08 IST

मिशन रेबीज तर्फे बुधवारपासून दिवार बेटावर दुसरी विशेष मोहीम सुरू केली आहे.

नारायण गावस,पणजी: राज्यात वाढत्या भटक्या कुत्र्यांचा पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आढावा घेतला आणि रेबीज विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी १०० टक्के कुत्र्यांना लसीकरण करण्याच्या सुचना मिशन रेबीज अधिकाऱ्यांना दिल्या आहे.  मिशन रेबीज तर्फे बुधवारपासून दिवार बेटावर दुसरी विशेष मोहीम सुरू केली आहे.आतापर्यंत त्यांनी ८७८ कुत्र्यांचे लसीकरण केले असून ते शुक्रवार संध्याकाळपर्यंत सुरू  राहणार आहे.  राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे मिशन रेबीजतर्फे त्यांना लसीकरण सुरु आहे. सर्व भटक्या कुत्र्यांना लसीकरण दिले जाते. त्यामुळे राज्यात रेबीज संख्या कमी झाली आहे. गेली अनेक वर्ष मिशन रेबजीकडून ही माेहिम राज्यभर राबविली जात आहे. त्यामुळे राज्यात भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले आहे. 

मिशन रेबीजचे संचालक डॉ. मुरुगन पिल्लई म्हणाले, सर्व लसीकरण, शिक्षण आणि पाळत ठेवणे पथके कार्यरत आहेत. दिवार बेटावर कुत्र्यांची संख्या खूपच जास्त अंदाजे १५०० आहे जी त्या बेटावरील मानवी लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत विषम आहे. या बेटावर  २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ५ हजार आहे आणि आता ६ हजार असू शकते. पण कुत्र्यांची संख्या वाढत आहे.  काही लाेकांनी बाहेरुन आणून या बेटावर कुत्र्यांच्या पिलांना बेटावर टाकले असावे  किंवा सोडून दिले असावे  किंवा कुत्र्यांना येथे अधिक खाद्य मिळते म्हणून त्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होते.

टॅग्स :goaगोवा